Saturday, May 16

लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Social Content in Savitribai Phule’s Poetry : सावित्रीबाई फुले यांच्या कवितेतील सामाजिक आशय – NNL

Social Content in Savitribai Phule’s Poetry : सावित्रीबाई फुले यांच्या कवितेतील सामाजिक आशय – NNL

नांदेड, लेख
सावित्रीबाई फुले म्हणजे आमच्या सांस्कृतिक महामाता. या देशातील तमाम दीन दलित अस्पृश्य शुद्रातिशुद्रांना माणूस म्हणून जगण्याचा अर्थ शिकविणारी विश्वशिक्षिका. मेलेल्या कोट्यावधी देहांमध्ये प्राण फुंकणारी ही सावित्री म्हणजे सावित्रीमाई. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले. ज्या महामातेला ज्या ज्योतिबांनं शिकवलं. धर्म नावाच्या क्रुर व्यवस्थेच्या विरोधात शिक्षणाचं शस्र करुन उभं केलं. अज्ञान अंधश्रद्धेच्या काळ्याकुट्ट दलदलीत पिढ्यानपिढ्या खितपत पडलेल्या ज्यांचं जगणं जनावरांपेक्षाही हीनदीन होतं, अशांना उजेडाची वाट दाखवणारा महात्मा फुले. ते महात्मा नव्हेत तर शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्मावा अशी अपेक्षा न ठेवता आधी स्वतःच्या घरात क्रांतीची सावित्रीज्योत पेटवणारे ते क्रांतिबा. निव्वळ बोलके नव्हे तर कर्ते सुधारक क्रांतिबा ज्योतिबा फुले. या दांपत्याने मानवी जीवनाच्या प्रगतीचे महाद्वार ज्याने कायमस्वरूपी उघ...
Co. Gangadhar Gayakwad ; जिथे सर्व पर्याय संपतात, तिथे आमचा शोध सुरु होतो; नांदेडचा निडर अवलिया कॉम्रेड गंगाधर गायकवाड -NNL

Co. Gangadhar Gayakwad ; जिथे सर्व पर्याय संपतात, तिथे आमचा शोध सुरु होतो; नांदेडचा निडर अवलिया कॉम्रेड गंगाधर गायकवाड -NNL

नांदेड, लेख
जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा तहसील,समाज कल्याण, जिल्हा परिषद,पंचायत समिती,फॉरेस्ट, आरटीओ,कामगार कार्यालय तसेच पोलीस खाते असो वा इतर कार्यालये, अडल्या नडल्या साठी कॉम्रेड गंगाधर गायकवाड म्हणजे एक सर्व समावेशक गुणकारी औषध आहे. त्यांनी अनेक जाती धर्मातील अडचणीत सापडलेल्या पीडितांना मदत केली आणि करत आहेत. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नांदेड तालुका सचिव व सीटू कामगार संघटनेचे सरचिटणीस म्हणून काम पाहतात.त्यांची आजपर्यंतची वाटचाल खडतर आणि संघर्षशील आहे. त्यांनी आजपर्यंत कधी तडजोड केली नाही. तसे ते मुळचे माहूर तालुक्यातील वझरा शेख फरीद गावचे.परंतु त्यांचे बालपण नांदेड मध्येच गेले. किनवट येथे आठवी नववीत असताना शासकीय वसतिगृहात ते एसएफआय या विध्यार्थी संघटनेचे सभासद झाले.नंतर अखिल भारतीय किसान सभा,डीवायएफआय,सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) संघटनेत काम करू लागले. अशातच ते १९९४-९५ दरम...
Invention of folk culture Malegaon Yatra : लोकसंस्कृतीचा आविष्कार माळेगाव यात्रा  -NNL

Invention of folk culture Malegaon Yatra : लोकसंस्कृतीचा आविष्कार माळेगाव यात्रा -NNL

नांदेड, लेख
दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी माळेगाव यात्रा लोहा तालुक्यातील माळेगाव येथे दरवर्षी मार्गशिष महिन्यात भरते. यावर्षी ही यात्रा रविवार 29 डिसेंबर ते 2 जानेवारी 2025 या पाच दिवसाच्या कालावधीत भरणार आहे. गेल्या काही वर्षात नांदेड व लातूर जिल्हा प्रशासनाने यामध्ये आपला सहभाग वाढवला आहे. नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती आणि माळेगाव ग्रामपंचायत या यात्रेचे आयोजन करते. महाराष्ट्राची वैभवसंपन्न परंपरा जपणारी व मराठवाडयाचे ऐतिहासिक महत्व जतन करणारी श्रीक्षेत्र खंडोबारायाची ही यात्रा नांदेड ते लातूर महामार्गावरील माळेगाव या गावी भरते. माळेगाव येथे मुख्य मंदिरात खंडोबा आणि म्हाळसा यांचे चांदीचे मुखवटे आहेत. हजारो वर्षापूर्वीच्या हेमाडपंथी मंदिरातील महादेवाचे रुप म्हणजे खंडोबा याठिकाणी दर्शनासाठी विराजमान आहेत. लाकडी देवघर चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे. श्रीक्षेत्र म...
Rashtrasant Gadgebaba : लोकशिक्षणाचा कर्मयोगी – राष्ट्रसंत गाडगेबाबा -NNL

Rashtrasant Gadgebaba : लोकशिक्षणाचा कर्मयोगी – राष्ट्रसंत गाडगेबाबा -NNL

नांदेड, लेख
बुद्ध, कबीर, फुले व आंबेडकर या महामानवांचा उपदेश व तत्त्वज्ञान जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत बहुजन समाजातील अशिक्षिक जनतेपर्यंत आपल्या कीर्तनाद्वारे सांगणारे, अज्ञानी, भोळ्या भाबड्या शोषित, पिडित व तळागाळात खितपत पडलेल्या जनतेच्या व्यथा, वेदनांना आपल्या कीर्तनाद्वारे वाचा फोडणारे, धार्मिक रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड, देवधर्म, विषमता, अनिष्ट प्रथा, जातीभेद, हिंसा व हुंडा पद्धती यावर आसूड ओढणारे हीन-दीन, पददलित जनतेला प्रबोधनाचा डोस पाजून माणूसपण मिळवून देणारे कर्मयोगी, वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा म्हणजे डेबूजी झिंगराजी जानोरकर हे होत. डेबूचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी परीट घराण्यात झाला. वडील झिंगराजीचा मृत्यू झाल्यानंतर मातोश्री सखुबाई डेबूला घेऊन मुर्तिजापूर तालुक्यातील दापूरा या गावी भावाकडे रहावयास गेल्या. मामा चंद्रभानजीकडे डेबू लहानाचा मोठा ...
Government Hospitals and Treatment : मराठवाड्यात शासकीय रुग्णालये व उपचार रामभरोसे -NNL

Government Hospitals and Treatment : मराठवाड्यात शासकीय रुग्णालये व उपचार रामभरोसे -NNL

नांदेड, लेख
देवाचा प्रसाद ग्रहण करत असताना अगदी भक्तीभावाने घेतला जातो. तसेच डोळे बंद करून विश्वासाने गोळ्या औषधी ही खाण्यात येतात. देवाच्या प्रसादावर जेवढा विश्वास ठेवण्यात येतो , तेवढाच विश्वास डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांवर ठेवल्या जातो. परंतु जर गोळ्या - औषधीच बनावट असतील तर किंवा त्यामुळेच जीवाला धोका आहे, असे समजल्यावर त्या माणसांची काय अवस्था होईल ? याचा नुसता विचार जरी केला तरी जिवाचा थरकाप उडतो. मराठवाड्यातील बीड, नांदेड, धाराशिव व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचे उघडकीस आले आहे. मराठवाड्यातील शासकीय रुग्णालयात बनावट औषधी व गोळ्यांचा पुरवठा करून रुग्णांसाठी त्याचा वापरही झाल्याचे उघडकीस आले आहे. नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून मे २०२३ मध्ये न्यूक्लास ६२५ या गोळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या गोळ्यांचा अहवाल ऑक्टोबर २०२४ म...
The support of ‘Ladaki’ to the drowning : बुडत्याला ‘लाडकी’ चा आधार -NNL

The support of ‘Ladaki’ to the drowning : बुडत्याला ‘लाडकी’ चा आधार -NNL

नांदेड, लेख
महाराष्ट्रातील विधानसभेचा एकदाचा निकाल लागला आणि नवे सरकार जुन्या सहकार्‍यांसह सत्तारुढ झाले. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार गट), शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा गट), समाजवादी पक्ष, रासपा, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांनी निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. लोकसभेला राज्यात शिंदे सेना व भाजपाला चांगलाच फटका बसला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (उबाठा) गटात उत्साहत निर्माण झाला होता. या उत्साहाला जरांगे फॅक्टरची हवा भरल्याने महाविकास आघाडीचा बलून खूपच आकाशी गेला होता. परंतु महायुतीने कंबर कसून विधानसभेच्या तयारीला लागल्याने महाविकास आघाडी व महायुतीत चांगलीच चुरस निर्माण झाली. महायुतीने आपल्या कार्याचा, राबवलेल्या धोरणांत्मक योजनांचा पाढा वाचण्याकरीता शासन आपल्या दारी मोहीमेच्या माध्...
6th December: The day that heralds the great nirvana of living : सहा डिसेंबर : जगण्याचे महानिर्वाण मांडणारा दिवस -NNL

6th December: The day that heralds the great nirvana of living : सहा डिसेंबर : जगण्याचे महानिर्वाण मांडणारा दिवस -NNL

मुंबई, नांदेड, लेख
सहा डिसेंबर हा दिवस म्हणजे आंबेडकरी चळवळीच्या निर्वाणाचा दिवस. चळवळीचं अखिल निर्वाण मांडणारा दिवस. निर्वाण म्हणजे संपणे नव्हे. मृत्यू तर नव्हेच नव्हे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. म्हणजे बाबासाहेब आम्हाला कायमचे सोडून गेले असा अर्थ घेऊन आम्ही तो अत्यंत दुःखाचा दिवस म्हणून कँडल मार्च काढून, रक्तदान करुन साजरा करतो. हे करु नये हा काही मुद्दा नाही. बाबासाहेब नावाचा महामानव सुख दुःखाच्या पार पार पलिकडे पोहोचलेला असतो. म्हणजे ते सगळे काही संवेदनाहीन असते असे नव्हे. तर ते आंबेडकरी जगण्याचंच निर्वाण मांडत असतं. धम्म चळवळीचं निळं क्षितीज तुमच्यासमोर कलंडवून ठेवतं. अकुशल कर्मापासून किंवा तत्सम घटकांपासून ते मुक्ती देणारं ठरतं. ही मुक्ती आंबेडकरी विचार, भूमिका, दिशा आणि तुमचं कार्यकर्तृत्व ते ठरवत असते. म्हणून तो दुःखाचा दिवस नाही. तो रुदनाचाही दिवस ...
Guru Tegh Bahadur ; गुरु तेगबहादुर यांचे धर्मरक्षणार्थ हौतात्म्य – NNL

Guru Tegh Bahadur ; गुरु तेगबहादुर यांचे धर्मरक्षणार्थ हौतात्म्य – NNL

लेख, नांदेड
भारत देशावर अनेकवेळा परकीय आक्रमण झालेत आणी येथील धर्म आणी संस्कृतिवर मोठे संकट व्यापले गेले. हिन्दू धर्मासोबतच इतर जातिधर्मांचेही अतुलनीय असे नुकसान झाले. देशावर परकीय शासक अनेक शतकं राजपाट करीत गेले आणी याभूमितील संतान गुलामगिरित सापडली. अशा वेळी सतराव्या शतकात शीख धर्माचे नववे गुरु श्री तेगबहादुर यांनी राष्ट्रातील धर्म आणी संस्कृतीच्या रक्षणार्थ व्यापक अशी जनजागरूकता केली. तर काश्मीरी पण्डितांचे धर्म वाचवण्यासाठी गुरु तेगबहादुर यांनी स्वतःचे बलिदान दिले. जगात अशा प्रकारच्या बलिदानाचा इतिहास इतत्र कुठे सापडणे शक्यच नाही. गुरु तेगबहादुर यांचे जन्म 21 एप्रिल सन 1621 रोजी अमृतसर येथे झाले. त्यांच्या वडिलांचे नाव गुरु हरगोबिंद साहिब (सहावे गुरु) आणी आईंचे नाव नानकी असे होते. त्यांचे वास्तविक नाव त्यागमल ठेवण्यात आले होते. पण तेरा वर्ष वय असतांना त्यांनी मोघलाविरोधात युद्धात सहभाग घेतला आण...
Marathwada gave strength to Mahayuti : मराठवाड्याने दिले महायुतीला बळ -NNL

Marathwada gave strength to Mahayuti : मराठवाड्याने दिले महायुतीला बळ -NNL

नांदेड, मुंबई, लेख
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे महायुतीने निर्विवाद यश मिळविले. त्याच धर्तीवर मराठवाड्याने देखील महायुतीला चांगलेच बळ दिले. समाजातील प्रत्येक घटकाने महायुतीला साथ देत त्यांनाच स्वीकारले. लोकसभा निवडणुकीच्या काळात जी परिस्थिती होती ती परिस्थिती मराठवाड्यातील मतदारांनी पूर्णपणे पुसून टाकली. मराठवाड्यात लाडकी बहीण ही योजना यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. मतदानाच्या वाढलेल्या टक्क्यात महिलांची मतदानाची टक्केवारी जास्त होती. यामुळे देखील मराठवाड्यातून महायुतीला भरभरून मतदान झाले. मराठवाड्यातून पेटलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनाची दखलही बेदखल झाल्यात जमा आहे . कारण मनोज जरांगे फॅक्टर या निवडणुकीच्या निमित्ताने पूर्णपणे संपल्यात जमा आहे. मराठवाड्यातील ठळक घडामोडीत बीड जिल्ह्यातील परळी येथून धनंजय मुंडे यांचा झालेला विक्रमी विजय पंकजा मुंडे यांच्या पराभवाचा वचपा काढणारा ठरला. तसेच मराठवाड्यातील पूर...
Are there any guardians for the farmers? : शेतकर्‍यांना कोणी वाली आहे का? -NNL

Are there any guardians for the farmers? : शेतकर्‍यांना कोणी वाली आहे का? -NNL

नांदेड, लेख
जगाचा पोशिंदा म्हणजे बळीराजा! एकेकाळी शेतकरी ‘राजा’ माणूस होता. शेतकर्‍यांच्या घरी रोजच दिवाळी अन् दसरा असायचा. शेतकर्‍यांच्या घरी खंडीभर ज्वारी ऐन पावसाळ्यात पडून राहायची. अडले- नडले शेतमजूर, कष्टकरी, रोजंदार लोक अडचणीच्या वेळी शेतकर्‍यांकडे हात पसरायचे, तेंव्हा शेतकरी उदार अंतःकरणाने पायली- दोन पायली (पाच किलो) ज्वारी सढळ हाताने वाटून टाकायचे, एवढे ऐश्वर्य शेतकर्‍याच्या घरी रहायचे. आज दिवस बदललेत, उलट परिस्थिती झाली आहे. आज शेतकर्‍यांनाच मुलभूत गरजांसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते आहे. कारण पाऊसकाळ पूर्वीप्रमाणे राहिला नाही. पाणी पातळी खोल गेल्यामुळे सिंचनाखालील जमीन देखील कोरडी झाली आहे. कोरडवाहू आणि बागायतदार दोन्ही प्रकारचे शेतकरी आज चिंतातूर झाले आहेत. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाच्या दुष्टचक्रामुळे अनेक शेतकरी अठरा विश्व दारिद्य्राला कंटाळून, सततच्या नापिकीला कंटाळून ग...
error: Content is protected !!