Wednesday, May 13

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Himayatnagar Accident : हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Himayatnagar Accident : हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर| शहराजवळील हिमायतनगर–सिरंजनी रोडवर शनिवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुचाकी व आयशर ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय धान्य गोदामातून कोठा व एकंबा गावाकडे रेशनचे धान्य घेऊन जाणारा आयशर ट्रक (MH26-7776) सिरपल्ली–सिरंजनी मार्गावरून येणाऱ्या दुचाकीला (MH29-AZ 4538) एचपी गॅस गोडाऊनसमोर जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील गणेश सदाशिव जाधव (वय ५५, रा. सिरपल्ली) यांचा जागीच मृत्यू झाला. तर शंकर विठ्ठल वानखेडे (वय ४०, रा. सिरपल्ली) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की दुचाकी ट्रकच्या पुढील भागात अडकून पडल्याचे दृश्य घटनास्थळी दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती ग...
एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र
धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १०१.७७ टीएमसी अधिकचा पाणीसाठा मुंबई| राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०१.७७ टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. गतवर्षी हा साठा ५५१.८६ टीएमसी होता. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या अनियमतेतमुळे पुढील वर्षी टंचाईचा मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सादरीकरणाद्वारे राज्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा आणि एल-निनो प्रभावामुळे संभाव्य परिणामांची माहिती दिली. एल-निनोच्या प्रभावामुळे पाणीसाठ्यात २०१४ मध्ये १२ टक्के तर २०१५ मध्ये सुमारे १४ टक्के घट झाली होती. त्यामुळे दोन्ही वर्षी पाणीटंचाई निर्माण झाली होती. १५ ऑक्टोबर २०१४ रोजी ८७२ टीएमसी...
Himayatnagar railway station : हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील विकासकामांवर प्रश्नचिन्ह; प्रवाशांना मूलभूत सुविधांचा अभाव

Himayatnagar railway station : हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील विकासकामांवर प्रश्नचिन्ह; प्रवाशांना मूलभूत सुविधांचा अभाव

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार | शहरातील रेल्वे स्थानकावर कोट्यावधीच्या निधीतून सुरु असलेली विकासकामे अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेक त्रुटींमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदार व रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानकावरील दुसऱ्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर अद्याप रेल्वे कोच पोझिशन दर्शविणारे डिजिटल डिस्प्ले बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कोणती गाडी कोणत्या ठिकाणी थांबणार, याची माहिती प्रवाशांना मिळत नाही. याशिवाय पिण्याच्या पाण्याचीही मोठी समस्या निर्माण झाली असून, प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एक नंबर प्लॅटफॉर्मवर जुन्या बांधकामाला नवीन स्वरूप देण्यात आल्याचे दिसून येते, तर दुरुस्तीच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याची तक्रार आहे. छतामधून पाणी गळत असल्याचेही ...
Stop the bad work : “निकृष्ट काम थांबवा नाहीतर आंदोलन!” — राष्ट्रवादीचा इशारा

Stop the bad work : “निकृष्ट काम थांबवा नाहीतर आंदोलन!” — राष्ट्रवादीचा इशारा

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या नाली बांधकामातील कथित भ्रष्टाचारावर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने थेट अॅक्शन घेत काम बंद पाडले. वारंवार तक्रारी करूनही ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम सुरूच ठेवल्याने संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी धडक देत ठेकेदाराला जाब विचारला. तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी यापूर्वीच संबंधित अभियंता देशपांडे यांना काम थांबवण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून “अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम करू” असे आश्वासन दिले. मात्र, काही दिवसांतच पुन्हा त्याच पद्धतीने थातुरमातुर काम सुरू झाल्याचे समोर आले. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीने पुन्हा घटनास्थळी जाऊन काम थांबवले आणि “अभियंता स्वतः उपस्थित राहून दर्जेदार काम केले तरच काम सुरू होईल, अन्यथा आंदोलन छेडू,” असा थे...
Bring back the Mundhe! “मुंढे परत आणा!” : नांदेडमध्ये दिव्यांगांचा संतप्त एल्गार, अंदाज समितीलाही घेराव

Bring back the Mundhe! “मुंढे परत आणा!” : नांदेडमध्ये दिव्यांगांचा संतप्त एल्गार, अंदाज समितीलाही घेराव

महाराष्ट्र, नांदेड
नांदेड| “आम्हाला दिखाऊ कारभार नको, मुंढेंसारखा कडक आणि प्रामाणिक अधिकारी हवा!”—अशा घोषणांनी बुधवारी नांदेडचे वातावरण दणाणून गेले. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या अचानक झालेल्या बदलीच्या निषेधार्थ सकल दिव्यांग संघटनांनी थेट रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. कडक उन्हातही हातात मागण्यांचे फलक, तोंडात घोषणांचा आवाज आणि मनात तीव्र संताप—अशा वातावरणात आंदोलन पार पडले. विशेष म्हणजे, नांदेड दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळ अंदाज समितीलाही आंदोलकांनी घेराव घालत जाब विचारला. “कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला हटवून कोणाचा फायदा केला?” असा थेट सवाल करत आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांच्या वतीने अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मुंढे यांची बदली त्वरित रद...
राज्यातील सर्व वृत्तपत्रांना 150 टक्के दरवाढ द्यावी व पत्रकारावरील अन्याय थांबवावे – व्हॉईस ऑफ मीडिया

राज्यातील सर्व वृत्तपत्रांना 150 टक्के दरवाढ द्यावी व पत्रकारावरील अन्याय थांबवावे – व्हॉईस ऑफ मीडिया

मुंबई, महाराष्ट्र
देऊळगाव राजा l राज्यातील वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असून जनतेपर्यंत शासनाच्या योजना निर्णय आणि धोरणे पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करीत आहे गेल्या काही वर्षात वृत्तपत्र उद्योगावर आर्थिक दृष्ट्या मोठा ताण निर्माण झाला आहे.आम्ही अनेक वेळा व्हाट्सअप मीडियाच्या वतीने या संदर्भात निवेदन दिले,आंदोलन केले पण त्याचा काही फायदा झाला नाही. तरी राज्यातील सर्व वृत्तपत्रांना दीडशे टक्के दरवाढ देणे तसेच जाहिरात व प्रशासकीय धोरणाबाबत विविध मागण्यांना मान्यता आणि पत्रकारावर होणारे अन्याय थांबवावे करिता देऊळगाव राजा तहसील कार्यालय येथे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना व्हॉईस ऑफ मीडिया देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद आहे की सन 2019 पासून आस्थागायत कागद,प्रिंटिंग मटेरियल, केमिकल्स, वीज, मनुष्यब...
Rayalaseema Express : रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढवण्याची मागणी

Rayalaseema Express : रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढवण्याची मागणी

तेलंगणा, नांदेड, महाराष्ट्र, हिंगोली
नांदेड/हिंगोली| नांदेड परिसरातील बालाजी भक्तांना थेट तिरुपतीला जाण्यासाठी सुलभ रेल्वे सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देत ही मागणी लावून धरली आहे. सध्या नांदेड–तिरुपती प्रवासासाठी थेट रेल्वेची सुविधा मर्यादित असल्याने भक्तांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील हजारो भाविक दरवर्षी तिरुपतीला जातात. मात्र, थेट रेल्वे उपलब्ध नसल्याने वेळ आणि खर्च दोन्ही वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर रायलसीमा एक्सप्रेसचा परभणीपर्यंत विस्तार केल्यास या भागातील भाविकांना मोठा दिलासा मिळेल, तसेच व्यापारी व सर्वसामान्य प्रवाशांनाही याचा फायदा होणार आहे. स्थानिक नागरिक...
Support : हिंदवी स्वराज्य संघटनेचा जाहीर पाठिंबा

Support : हिंदवी स्वराज्य संघटनेचा जाहीर पाठिंबा

नांदेड, महाराष्ट्र
हदगांव, गौतम वाठोरे | हिमायतनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य शिवस्मारकासाठी जागा निश्चित करण्याच्या मागणीसाठी मुन्ना शिंदे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला दिवसेंदिवस विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून, हिंदवी स्वराज्य या अराजकीय सामाजिक संघटनेनेही जाहीर पाठिंबा दिला आहे.या संदर्भात संघटनेच्या वतीने अधिकृत पत्र जारी करण्यात आले असून, त्यामध्ये मुन्ना शिंदे यांच्या मागणीला न्याय देण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या स्मारकासाठी सुरू असलेले हे आंदोलन लोकशाही मार्गाने अत्यंत महत्त्वाचे असून, आम्ही या उपोषणाला पूर्ण पाठिंबा देत आहोत, असे मत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जाधव पाटील हरडफकर यांनी व्यक्त केले. या पाठिंबा पत्रावर तालुका अध्यक्ष योगेश पाटील खडकीकर, भीमराव मनमदे आणि अमोल शिंदे ...
Chif Minister Fadnavis : दत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदनजी भारती महाराज यांना मुख्यमंत्री फडणवीस यांची श्रद्धांजली

Chif Minister Fadnavis : दत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदनजी भारती महाराज यांना मुख्यमंत्री फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई | माहूर (जि. नांदेड) येथील श्री दत्त शिखर संस्थानच्या गादीचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती (मालक) महाराज यांना देवाज्ञा झाल्याची बातमी अत्यंत दुःखद असून, त्यांच्या निधनाने अध्यात्म, सेवा आणि परंपरेचा एक मोठा दीपस्तंभ हरपल्याची भावना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात दत्तभक्ती, धर्मसंवर्धन आणि समाजसेवेसाठी अखंड कार्य केले. त्यांच्या साधेपणातच महानता दडलेली होती. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे असंख्य भक्तांना आध्यात्मिक दिशा मिळाली होती. माहूर गड व दत्त शिखर संस्थानची गौरवशाली परंपरा त्यांनी अत्यंत निष्ठेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने जपली. त्यांच्या कार्यामुळे संस्थानची ओळख अधिक व्यापक झाली होती. त्यांच्या जाण्याने केवळ संस्थेचेच नव्हे, तर संपूर्ण भक्तपरिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, ...
Passed away : दत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदनजी भारती महाराज यांना श्रद्धांजली

Passed away : दत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदनजी भारती महाराज यांना श्रद्धांजली

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड/माहूर | नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत श्री मधुसूदनजी भारती (मालक) महाराज यांना देवाज्ञा झाल्याची बातमी संपूर्ण परिसरासाठी अत्यंत दुःखद ठरली आहे. त्यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्रातील एक मोठा दीपस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) यांनीही आपल्या भावना व्यक्त करत महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी म्हटले आहे की, “माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत श्री मधुसूदनजी भारती महाराज यांना देवाज्ञा झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या जाण्याने आध्यात्मिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे. गेल्याच आठवड्यात मी त्यांचे दर्शन घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती.” पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “महाराजांनी आपल्या जीवनकार्यात केवळ भक्तीचा मार्ग दाखवला नाही, तर सेवा व मानवतेचीही ...
error: Content is protected !!