Wednesday, May 13

लातूर

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

dynamic administration : गतिमान प्रशासनाचा ‘मराठवाडा पॅटर्न’

dynamic administration : गतिमान प्रशासनाचा ‘मराठवाडा पॅटर्न’

नांदेड, लातूर, लेख
महाराष्ट्र शासनाने राबवलेला '१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम' राज्याच्या प्रशासकीय इतिहासातील एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरला आहे. प्रशासकीय कामाची पुनर्रचना, संपूर्ण डिजिटायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर या त्रिसूत्रींवर आधारलेल्या या कार्यक्रमाने प्रशासनाचा चेहरामोहरा बदलून टाकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात काल (२८ मार्च) पार पडलेला गौरव सोहळा हा याच 'डिजिटल क्रांती'चा साक्षीदार होता. २४ तास उपलब्ध असणाऱ्या डिजिटल सुविधांमुळे आता सरकारी कार्यालयांमधील रांगा कमी होताना दिसतील, 'किमान शासन, कमाल सुशासन' सूत्र मराठवाड्याने खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरवले आहे. लातूर: कल्पकता आणि तंत्रज्ञानाचा वापर - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली लातूरने ई-प्रशासनात अभूतपूर्व झेप घेतली आहे. १७९.२५ गुणांसह राज्यात...
Nanded News : नांदेड परिक्षेत्रात ‘गुटखा’विरोधी धडक मोहीम; ९ आरोपी जेरबंद, ८.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nanded News : नांदेड परिक्षेत्रात ‘गुटखा’विरोधी धडक मोहीम; ९ आरोपी जेरबंद, ८.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली
नांदेड| प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून, अवघ्या काही दिवसांतच मोठी कारवाई करत ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ८ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते ३१ मार्च दरम्यान ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गुटखा विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करत विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. या दरम्यान एकूण ५ गुन्हे नोंदवून ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू तसेच इतर संबंधित पदार्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारेही काही कारवाया यशस्वी झा...
Thunderstorm and hailstorm warning : राज्यात 17 ते 20 मार्चदरम्यान वादळी पाऊस व गारपीटीचा इशारा

Thunderstorm and hailstorm warning : राज्यात 17 ते 20 मार्चदरम्यान वादळी पाऊस व गारपीटीचा इशारा

कृषी, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, मराठवाडा, मुंबई, लातूर, हिंगोली
मुंबई| राज्यात 17 ते 20 मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 17 मार्च रोजी राज्यातील दक्षिण भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता अधिक असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः तेलंगणा व कर्नाटक सीमेलगतच्या भागांमध्ये हवामानाचा अधिक प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. 18 ते 20 मार्च दरम्यान या वादळी पावसाची व्याप्ती आणि तीव्रता वाढण्याची शक्यता असून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. 21 मार्चपासून हवामान स्थिर होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. दरम्यान, रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे ...
Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

नांदेड, करियर, लातूर
कंधार, सचिन मोरे| उच्च माध्यमिक मंडळाच्या १२ वीच्या परीक्षेला दिनांक १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात होत आहे. परीक्षा ऐन तोंडावर आल्या असताना मंडळाने शहरात दोन परीक्षा केंद्रावर ८९५ मुले- मुली परीक्षा देणार होते. त्यांना प्रवेशपत्र वाटपही करण्यात आली आहे. अशा वेळी लातूर विभागीय मंडळाने ५ फेब्रुवारीला एक आदेश परित करून कंधार शहरात तिसऱ्या परीक्षा केंद्राला मान्यता देऊन या केंद्रावर १६५ विद्यार्थ्याच्या परीक्षेची व्यवस्था केल्याने ऐन परीक्षेच्या तोंडावर १६५ विद्यार्थ्यांची धावपळ होणार असल्याचे चित्र कंधार शहरात निर्माण झाले असून या प्रकारामुळे शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला असून शिक्षण विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. बारावी परीक्षेसाठी शहरात श्री शिवाजी कॉलेज नवरंगपूरा व श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पानभोसी रोड कंधार असे दोन परीक्षा केंद्र आहेत....
DIG Team Action In Latur City : लातूर शहरातील मटका बुक्कीवर DIG पथकाचा धडक छापा १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १.४१ लाखांची रोकड जप्त

DIG Team Action In Latur City : लातूर शहरातील मटका बुक्कीवर DIG पथकाचा धडक छापा १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १.४१ लाखांची रोकड जप्त

क्राईम, नांदेड, लातूर
नांदेड/लातूर | लातूर शहरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायावर नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक (DIG) श्री. शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून १ लाख ४१ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. DIG शहाजी उमाप यांनी अवैध जुगार व मटका व्यवसायावर आळा घालण्यासाठी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक लातूर शहरात पाठविले होते. सदर पथकाने दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी शाहू चौक ते गंजगोलाई रोडवरील गोजमगुंडे कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या मटका बुक्कीवर छापा टाकला. या कारवाईत विजय उद्धवराव लांडगे (रा. उमरगा बोरी, ता. जि. लातूर) या मटका बुकी चालकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून नगदी १,४१,००० रुपये, ३ मोबाईल फोन असा एकूण १,७५,१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. बुक्कीमधून जप्त...
Maharashtra News : महाराष्ट्र नवीन जिल्हे : २२ जिल्हे व ८१ तालुके निर्मितीचा प्रस्ताव, यादी जाहीर

Maharashtra News : महाराष्ट्र नवीन जिल्हे : २२ जिल्हे व ८१ तालुके निर्मितीचा प्रस्ताव, यादी जाहीर

महाराष्ट्र, नांदेड, पुणे, मराठवाडा, मुंबई, यवतमाळ, लातूर, विदर्भ
मुंबई, प्रतिनिधी| महाराष्ट्र राज्यात सध्या ३६ जिल्हे आणि ३५८ तालुके कार्यरत आहेत. मात्र वाढती लोकसंख्या, विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र आणि प्रशासकीय कामांचा वाढता ताण लक्षात घेता, राज्यात नवीन जिल्हे व तालुके निर्माण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात २२ नवीन जिल्हे आणि ८१ नवीन तालुके निर्माण करण्याबाबत प्रशासकीय स्तरावर गंभीर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नवीन जिल्हे व तालुक्यांच्या निर्मितीमागील मुख्य उद्देश म्हणजे प्रशासन अधिक गतिमान करणे, नागरिकांना शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे आणि सर्वांगीण विकासाला चालना देणे हा आहे.  नवीन जिल्ह्यांची गरज का भासते? महाराष्ट्रातील काही जिल्हे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यंत मोठे आहेत. अनेक ठिकाणी जिल्ह्याच्या टोकाच्या भागातून मुख्यालय गाठण्यासाठी नागरिकांना ८ ते १० तासांचा...
Voting for elections : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान

Voting for elections : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान

नांदेड, परभणी, मुंबई, राजकीय, लातूर
मुंबई| राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731; तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली. येथील सह्याद्री अतिथिगृहात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले की, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि...
Himaytnagar news : लातूर नवोदय विद्यालयातील चिमुकलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी हिमायतनगरात सोमवारी रास्ता रोको आंदोलण

Himaytnagar news : लातूर नवोदय विद्यालयातील चिमुकलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी हिमायतनगरात सोमवारी रास्ता रोको आंदोलण

क्राईम, नांदेड, लातूर
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| लातूर नवोदय विद्यालयातील चिमुकलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अन्यथा मातंग समाज तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड–किनवट राष्ट्रीय महामार्गावरील चौकात सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ठीक १२ वाजता भव्य बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत शिक्षण घेणाऱ्या मातंग समाजाच्या हुशार विद्यार्थिनी कुमारी अनुष्का हिचा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. विद्यालयातील वसतिगृहात पलंगाला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. मात्र हा मृत्यू अभ्यासाच्या तणावामुळे झाला की नियोजनबद्ध घातपात आहे, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्ट व लेखी उत्तर देण्यात आलेले नाही. या प्रकरण...
Lokshahi Din cancelled : निवडणूक आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द

Lokshahi Din cancelled : निवडणूक आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द

नांदेड, लाइफस्टाइल, लातूर
नांदेड| राज्य  निवडणूक आयोगाचे पत्र 15 डिसेंबर 2025 अन्वये राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 2025-26 जाहिर झाला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात 15 डिसेंबर 2025 पासून महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजेच 16 जानेवारी   2026 पर्यत आचारसंहिता अंमलात राहील. त्यामुळे माहे जानेवारी 2026 या महिन्यात पहिल्या सोमवारी म्हणजेच 5 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. मानसिक आरोग्य कायद्याचा लाभ रुग्णांना द्या : न्या. जाधव - मानसिक आजार ही केवळ वैद्यकीय समस्या नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे. 'मानसिक आरोग्य कायदा-2017' चा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवून त्यांचे हक्क जपले पाहिजेत,’ असे आवाहन जिल्हा न्यायाधीश एस. व...
Unique Latur Pattern : अनोखा लातूर पॅटर्न : ‘वेळ अमावस्या’-मातीशी नाळ जोडणारा लोकोत्सव!

Unique Latur Pattern : अनोखा लातूर पॅटर्न : ‘वेळ अमावस्या’-मातीशी नाळ जोडणारा लोकोत्सव!

लातूर, लेख
मराठवाड्याचे ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळी लातूरच्या कृषी संस्कृतीला तंतोतंत लागू पडतात. ते म्हणतात, "काळ्या आईची कुशी, पिकं जोमाने डुलती, माझ्या राजाचं हे रान, जणू हिरवं सोनं..." या ओळींचा खरा प्रत्यय लातूरच्या 'वेळ अमावस्येला' येतो. हा केवळ एक सण नाही, तर हा मातीशी नाळ जोडणारा एक महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तावेज आहे. मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येला सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत संपूर्ण लातूर जिल्हा शेतात असतो, निसर्गाच्या ऋणाचा हा उत्सव मोठ्या उत्साहात येथे साजरा केला जातो.  येळवस, दर्शवेळ किंवा वेळ अमावस्या अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सणाची परंपरा तब्बल सातशे वर्षांची आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचा हा भाग पूर्वी निझाम राजवटीत असल्याने येथे कानडी भाषेचा प्रभाव आजही जाणवतो. कानडीत 'वेल्ली' म्हणजे पीक. पिकांची पूजा म्हणून हा शब्द रूढ झाला असावा. तसेच...
error: Content is protected !!