Wednesday, May 13

लातूर

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Mahatma Gandhi Jayanti : महात्मा गांधी जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व अभिवादन

Mahatma Gandhi Jayanti : महात्मा गांधी जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व अभिवादन

लातूर, राजकीय
लातूर| गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री,लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी लातूर शहरातील महात्मा गांधी चौक येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हा.चेअरमन विजय देशमुख, माजी उपमहापौर कैलास कांबळे, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके, सी.ए.प्रकाश कासट, इम्रान सय्यद, व्यंकटेश पुरी, अमित जाधव, सुरेश चव्हाण, राम स्वाम...
Chief Minister Devendra Fadnavis : सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत; दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत; दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, महाराष्ट्र, लातूर
लातूर| राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे. पिकांचे नुकसान झाले असून जमीन खरडून गेली आहे. या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल. तसेच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संजय बनसोडे, आमदार रमेश कराड, आमदार राणा जगजितसिंह ...

entry in Maharashtra Book of Records : शाळंची पाखरं या बालकाव्यसंग्रहाने नोंदवला विक्रम: महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद

करियर, लातूर
लातूर| लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. उन्मेष मारोती शेकडे यांच्या ‘शाळंची पाखरं’ या बालसाहित्य कलाकृतीने राज्य विक्रम (State Record) बालमनाचा शोध घेणारा पंचाक्षरी काव्यसंग्रह म्हणून भारतातील रेकॉर्ड्ससाठीचे एक प्रतिष्ठित प्रकाशन आणि जागतिक विक्रमांचे दस्तऐवजीकरण करणारे वार्षिक पुस्तक असलेल्या महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झाल्याची माहिती रेकॉर्ड बुकचे मुख्य संपादक डॉ. सुनील दादा पाटील यांनी नुकतीच पत्रकाद्वारे दिली. प्रा. डॉ. उन्मेष मारोती शेकडे (जन्म २३ जून १९७१) द्वारा लिखित ‘शाळंची पाखरं’ हा बालकाव्यसंग्रह मराठी भाषेतीलच नव्हे तर जगातील सर्वच भाषांपैकी जगातील शाळंला प्रारंभी जाणार्‍या बालकांचा प्रथमच ‘पंचाक्षरी’ काव्यातून घेतलेला बाल मानसिकतेचा शोध ठरला असून यात विश्वात शाळंत जाणार्‍या बालमनांच्या आठवणी असून यामुळे हा व...
People’s leader Vilasrao Deshmukh : लोकनेते विलासराव देशमुख: विकासाची दूरदृष्टी असलेले दिलखुलास व्यक्तिमत्व, एक निष्ठावंत राजकारणी

People’s leader Vilasrao Deshmukh : लोकनेते विलासराव देशमुख: विकासाची दूरदृष्टी असलेले दिलखुलास व्यक्तिमत्व, एक निष्ठावंत राजकारणी

नांदेड, लातूर, लेख
महाराष्ट्राच्या राजकारणात दूरदृष्टी, अभ्यासू वृत्ती आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे लोकनेते विलासराव देशमुख हे एक असे नेते होते, ज्यांनी सरपंचपदापासून ते राज्याच्या सर्वोच्च मुख्यमंत्रीपदापर्यंत तसेच केंद्रीयमंत्रीपदा पर्यंत प्रवास केला. त्यांच्या दिलखुलास स्वभावाने त्यांनी केवळ मित्रच नव्हे, तर राजकीय विरोधकांनाही आपलेसे केले. हा त्यांचा गुण संसदीय लोकशाहीची ऊंची वाढवणारा आहे, त्यांच्या वक्तृत्वाची, भाषणाची खास शैली आणि शब्दांवरील पकड आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या १३ व्या स्मृतिदीनानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करणे आणि त्यांचे विचारकार्य पूढे घेऊन जाणे हीच खरी त्यांना आंदराजली ठरेल. आदरणीय विलासराव देशमुख यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९७४ मध्ये बाभळगावच्या सरपंच पदापासून झाली. त्यानंतर त्यांनी पंचायत समिती उपसभापती आणि जिल्हा परिषद सदस्य अशी विविध पदे भ...
Gopinathrao Munde : दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे दुष्काळमुक्त मराठवाड्याचे स्वप्न साकार करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gopinathrao Munde : दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे दुष्काळमुक्त मराठवाड्याचे स्वप्न साकार करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, राजकीय, लातूर
लातूर| लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे हे कर्तृत्ववान व संघर्षशील नेतृत्व होते. त्यांची कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतची वाटचाल संघर्षमय होती. त्यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न पाहिले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी या भागात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी कृष्णा खोऱ्यातील ७ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी यापूर्वीच मंजुरी दिली असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता गोदावरी खोऱ्यातील ५४ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच लातूर शहर विस्तारीत पाणी पुरवठा योजना आणि जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या कामाला मंजुरी देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. लातूर येथे दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणानिमित्त दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्र...
Ganeshotsav : राज्यात गणेशोत्सव होणार आता राज्य महोत्सव – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

Ganeshotsav : राज्यात गणेशोत्सव होणार आता राज्य महोत्सव – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

धार्मिक, उमरखेड, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, पुणे, मुंबई, लातूर
मुंबई| शेकडो वर्षाची घरगुती गणेशोत्सव परंपरा व अनेक वर्षापासूनची सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक समरसतेचे मानबिंदू आहे. त्यामुळे राज्यात आता गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे केली. मंत्री ॲड. शेलार म्हणाले, गणेशोत्सवाचे महत्त्व व ओळख संपूर्ण जगभर व्हावी, आपल्या परंपरेची आधुनिकतेशी सांगड व्हावी, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे गणेशोत्सव हे व्यासपीठ आणखी मजबूत व्हावे, गणेशोत्सवासंबंधी सर्व घटक एकत्र जोडले जावेत, पर्यटन वाढावे, आपल्या समृद्ध परंपरा रितीरिवाजांचे जतन-संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्राचे स्थान जगाच्या नकाशावर ठळक व्हावे, यासाठी गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्याच्या आर्थिक, ...
MLA Amit Deshmukh : महाराष्ट्रातील वाढत्या अपघातांच्या घटनांकडे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सरकारचे लक्ष वेधले

MLA Amit Deshmukh : महाराष्ट्रातील वाढत्या अपघातांच्या घटनांकडे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सरकारचे लक्ष वेधले

लातूर, मुंबई, राजकीय
मुंबई| राष्ट्रीय महामार्गावर शहरानजीक वाहनांची वेग मर्यादा नियंत्रणात राहावी म्हणून उपाययोजना आहेत मात्र ग्रामीण भागात याबाबतीत दुर्लक्ष असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होऊन जीवित हानी होत आहे, हे रोखण्यासाठी तसेच दुर्दैवाने अपघात झालाच तर जखमींना वेळेत उपचार मिळण्याच्या दृष्टीने रोड सेफ्टी असिस्टंन्स प्रणाली अधिक मजबूत करावी अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत बोलताना केली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यातील वाढते अपघात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी या संदर्भाने सरकारचे लक्ष वेधताना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी एका अपघाताच्या संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, मागच्या आठवड्यात धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे जात असताना औसा तालुक्यात दोन दुचाकीचा अपघात ...
Latur Bus stand : लातूरच्या बसस्थानक व डेपो स्थलांतरणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा

Latur Bus stand : लातूरच्या बसस्थानक व डेपो स्थलांतरणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा

मुंबई, राजकीय, लातूर
लातूर| लातूर शहर शिक्षण, कृषी आणि व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले असून, शहरात दररोज ८०० ते ९०० बसची ये-जा असते. प्रवाशांची वाढती संख्या पाहता सध्याचे मध्यवर्ती बसस्थानक अपुरे पडत असून, त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार्किंग व्यवस्थेसह सुसज्ज बसस्थानक उभारण्यात यावे, त्याचबरोबर लातूर येथून महत्त्वाच्या शहरासाठी अद्यावत इलेक्ट्रिक बस सुरू कराव्यात यासह विविध मागण्या राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांच्याकडे त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीदरम्यान केल्या आहेत. त्यांनी या सर्व मागण्यांना अनुकूलता दर्शवत संबंधितांना सूचना केल्या आहेत. परिवहन विभागाच्या संदर्भाने लातूर शहर व जिल्ह्यातील विविध मागण्यांची निवेदने परिवहन मंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांच्याकडे वेळोवेळी देण्यात आली आहेत, या सर्व निवेदनावर विचार करून नि...
Cemetery question : राज्यातील दफनभूमी, स्मशानभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम राबवावा

Cemetery question : राज्यातील दफनभूमी, स्मशानभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम राबवावा

लातूर, मुंबई, राजकीय
मुंबई| मुंबईसह महाराष्ट्रात सध्या दफनभूमी आणि स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे असे नमूद करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील एकूण लोकसंख्या, जन्मदर, मृत्युदर आणि क्षेत्रफळ या गोष्टींचा विचार करून हा प्रश्न सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोमवारी विधानसभेत या विषयावरील चर्चेत सहभागी होताना केली आहे. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख या विषयावरील चर्चेत सहभागी होताना म्हणाले की, दफनभूमी तसेच स्मशानभूमी उपलब्धतेची मुंबई येथे खूपच गंभीर समस्या आहे, त्याचप्रमाणे राज्यात गावागावातही अलीकडच्या काळात या संदर्भातील अडचणी निर्माण होत आहेत, बहुतांश ठिकाणी शासनाने दफनभूमी आणि स्मशानभूमीची व्यवस्था केली आहे, काही ठिकाणी खाजगी स्वरूपाची ही व्यवस्था आहे परंतु, वेगवेगळ्या समाजाची वाढलेली लोकसंख्या, वाढलेल्या वस्त्या यामुळे अनेक ठिकाण...
error: Content is protected !!