Wednesday, May 13

Vilas Factory begin : विलास कारखान्याच्या गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरू

लातूर| विलास सहकारी साखर कारखाना, वैशालीनगर, निवळी येथे आगामी गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गळीत हंगाम वेळेवर आणि पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली जात आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून शुक्रवार, २० जून रोजी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन चेअरमन वैशाली विलासराव देशमुख आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले. या पूजनानंतर सर्व संचालकांच्या उपस्थितीत गळीत हंगाम तयारीबाबत आढावा बैठकही संपन्न झाली. यावेळी येणाऱ्या हंगामात ९ लाख मे.टन ऊस गाळपाचे उदिष्ट निश्चीत करण्यात आले आहे.

येणारा हंगाम यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन
विलास कारखाना कार्यक्षेत्रात गळीत हंगाम २०२५-२६ साठी ऊसाचे मोठे क्षेत्र उपलब्ध आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊसाचे वेळेवर गाळप होण्यासाठी कारखान्याचे संस्थापक चेअरमन, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख आणि चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी गळीत हंगाम लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने सर्व हंगामपूर्व यंत्रसामुग्री देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून, मागील गळीत हंगामाप्रमाणेच येणारा हंगामही यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.

भरपूर ऊस उपलब्धता आणि यांत्रिकीकरण
आगामी गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध आहे. कारखान्याकडे सभासदांच्या १४८९३.३७ हेक्टर तर बिगर सभासदांच्या ५७९० हेक्टर अशा एकूण २०६८७ हेक्टर ऊसाची नोंदणी झाली आहे. विलास साखर कारखान्याने ऊस तोडणीचे योग्य नियोजन केले असून, या हंगामात जास्तीत जास्त ऊस हा तोडणीयंत्राद्वारे तोडणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कारखान्यामार्फत १५ हार्वेस्टर खरेदी केले जाणार आहेत. भविष्यात ऊसाची उपलब्धता पाहता, १०० टक्के ऊस तोडणी यंत्राद्वारे केल्यानंतर ऊसाचे गाळप करण्यासाठी आवश्यक असणारी मशिनरी बसविण्यात येत आहे. या हंगामात तांत्रिक कारणांमुळे कारखाना बंद तास कमी राहतील याची दक्षता घेतली जाणार आहे. हंगाम बंद असताना सुरू असलेली मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून, हंगाम सुरू होण्याअगोदरच कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज असेल. कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी ही माहिती दिली आहे.

1 2 1 Vilas Factory begin : विलास कारखान्याच्या गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरू

यशस्वी वाटचाल आणि विक्रमी ऊसदर
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला विलास सहकारी साखर कारखाना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या कुशल नियोजनानुसार, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, माजी आमदार धीरज विलासराव देशमुख आणि कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत आहे. विलास सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात ऊस उत्पादकांना प्रति मेट्रिक टन तब्बल रु. ३०००/- इतका उच्चांकी दर दिला आहे. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. या विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत झाली असून, कारखान्याच्या यशस्वी वाटचालीची ही एक महत्त्वाचे पाऊल आहे.

मील रोलर पूजन कार्यक्रमास माजी आमदार व्हा. चेअरमन वैजनाथराव शिंदे, ट्वेंटीवन शुगर्सचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, कार्यकारी संचालक संजीव देसाई, डॉ. सारीका देशमुख, माजी व्हा. चेअरमन विद्यमान संचालक रवींद्र काळे, संचालक सर्वश्री रणजित पाटील, अनंत बारबोले, रसूल पटेल, तात्यासाहेब पालकर, गोवर्धन मोरे, हणमंत पवार, नरसिंग बुलबुले, नेताजी साळुंके (देशमुख), नितीन पाटील, रामराव साळुंके, अमृत जाधव, सतीश शिंदे (पाटील), दीपक बनसोडे, लताबाई देशमुख, शाम बरुरे, सुभाष माने, रमेश देशमुख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!