Vilas Factory begin : विलास कारखान्याच्या गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरू
लातूर| विलास सहकारी साखर कारखाना, वैशालीनगर, निवळी येथे आगामी गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गळीत हंगाम वेळेवर आणि पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली जात आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून शुक्रवार, २० जून रोजी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन चेअरमन वैशाली विलासराव देशमुख आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले. या पूजनानंतर सर्व संचालकांच्या उपस्थितीत गळीत हंगाम तयारीबाबत आढावा बैठकही संपन्न झाली. यावेळी येणाऱ्या हंगामात ९ लाख मे.टन ऊस गाळपाचे उदिष्ट निश्चीत करण्यात आले आहे.
येणारा हंगाम यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन
विलास कारखाना कार्यक्षेत्रात गळीत हंगाम २०२५-२६ साठी ऊसाचे मोठे क्षेत्र उपलब्ध आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊसाचे वेळेवर गाळप होण्यासाठी कारखान्याचे संस्थापक चेअरमन, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत...
