Thursday, June 25

नाशिक

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, देश विदेश
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ;  जलसंवर्धनाचा जागर करत अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना नाशिक| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे झाला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अहिल्यादेवींचे विचार, वारसा आणि विकास हा त्रिसूत्री मंत्र घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थ...
Congress : खरात प्रकरणात राजकीय पाठबळाचा संशय; काँग्रेसचा गंभीर आरोप

Congress : खरात प्रकरणात राजकीय पाठबळाचा संशय; काँग्रेसचा गंभीर आरोप

नाशिक, मुंबई, राजकीय
मुंबई | नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर आरोप केले आहेत. महिलांचे शोषण करणारा अशोक खरात हा महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’ असल्याचा घणाघात त्यांनी केला. सपकाळ म्हणाले की, अशोक खरातच्या विरोधात समोर आलेले प्रकार धक्कादायक असून सखोल चौकशी केल्यास आणखी गंभीर बाबी उघड होण्याची शक्यता आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, तसेच त्याच्या मागे कोणाचा राजकीय आशिर्वाद आहे, याचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामी राज्य आहे. तरीही अंधश्रद्धेविरोधी कायदा असतानाही अशा भोंदूबाबांचे प्रकार सुरू राहणे चिंताजनक आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर लढा देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली, हेही त्...
Thunderstorm and hailstorm warning : राज्यात 17 ते 20 मार्चदरम्यान वादळी पाऊस व गारपीटीचा इशारा

Thunderstorm and hailstorm warning : राज्यात 17 ते 20 मार्चदरम्यान वादळी पाऊस व गारपीटीचा इशारा

कृषी, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, मराठवाडा, मुंबई, लातूर, हिंगोली
मुंबई| राज्यात 17 ते 20 मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 17 मार्च रोजी राज्यातील दक्षिण भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता अधिक असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः तेलंगणा व कर्नाटक सीमेलगतच्या भागांमध्ये हवामानाचा अधिक प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. 18 ते 20 मार्च दरम्यान या वादळी पावसाची व्याप्ती आणि तीव्रता वाढण्याची शक्यता असून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. 21 मार्चपासून हवामान स्थिर होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. दरम्यान, रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे ...
Drainage work : हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या नाली कामाचा भंडाफोड! “दर्जेदार काम करा, नाहीतर काम बंद करा”

Drainage work : हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या नाली कामाचा भंडाफोड! “दर्जेदार काम करा, नाहीतर काम बंद करा”

नांदेड, नागपूर, नाशिक, महाराष्ट्र
नागरिकांच्या तक्रारीनंतर ठेकेदाराला फोनवरच सुनावलं कोट्यवधींचे काम पण दर्जा शून्य! नाली की दिखावा? हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या कामाचा दर्जा वादात..! हिमायतनगर (अनिल मादसवार ) शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या नाली बांधकामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिमेंट काँक्रेटच्या कामावर मजबुतीसाठी आवश्यक असलेले क्युरिंगचे पाणी टाकले जात नसल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमाप्रमाणे रस्त्याच्या सेंटरपासून दोन्ही बाजूंना समान रुंदीवर नाली बांधकाम करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात काही ठिकाणी नाली रस्त्याच्या अगदी जवळ तर काही ठिकाणी दूर बांधण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच बांधकामापूर्वी योग्य बेस न करता थेट चार इंच थातूर माथुर काँक्रेट टाकून काम उरकण्याचा प्रयत्न केल्या जात ...
Demand : नागपूर–मडगांव विशेष रेल्वेगाडीसाठी तृतीय साप्ताहिक सेवा व अतिरिक्त थांबे सुरु करण्याची मागणी

Demand : नागपूर–मडगांव विशेष रेल्वेगाडीसाठी तृतीय साप्ताहिक सेवा व अतिरिक्त थांबे सुरु करण्याची मागणी

नागपूर, नाशिक, महाराष्ट्र
नागपूर| विदर्भ–खान्देश–कोकण प्रांतातील नागरिकांसाठी फळ, फुल व शेतीमालाच्या वाहतुकीस प्राधान्य देण्यासाठी मध्य रेल्वेच्या गणेशोत्सव विशेष रेल्वेगाडी क्र. 01139/40 नागपूर–मडगांवसाठी तृतीय साप्ताहिक कायमस्वरूपी सेवा व चांदुर, मूर्तीजापूर, नांदुरा, बोडवड, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, पेण येथे अतिरिक्त थांबे सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण–सावंतवाडी (रजि.) च्या विदर्भ–खान्देश संपर्क प्रमुख वैभव बहुतूले यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री, पंतप्रधान, रेल्वे बोर्ड अध्यक्ष आणि मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक नागपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यांनी पाठविलेल्या निवेदनात नमूद आहे की, विशेष रेल्वेसेवा सुरु झाल्यास नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, नांदुरा, नाशिक, कोकण प्रांतातील धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना सोप्या प्रवासाची सोय होईल. तसेच फल, फुल व...
Chaitanyanagar-Sangvi : चैतन्यनगर-सांगवी वॉकिंग ट्रॅकला लोखंडी कुंपण आणि तरोडा कॅनाल रोडवरील लाईट सुरु करा

Chaitanyanagar-Sangvi : चैतन्यनगर-सांगवी वॉकिंग ट्रॅकला लोखंडी कुंपण आणि तरोडा कॅनाल रोडवरील लाईट सुरु करा

नाशिक, राजकीय
नांदेड| नागरिकांच्या सुरक्षितता व सुविधा लक्षात घेता एक महत्त्वाचा प्रस्ताव माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केला आहे. दोन मुख्य मुद्द्यांचा समावेश असलेल्या या प्रस्तावामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे: चैतन्यनगर – शिवमंदिर ते सांगवी दरम्यानच्या वॉकिंग ट्रॅकला लोखंडी कुंपण आणि तरोडा (बु.), तरोडा (खु.) व सांगवी येथील कॅनाल रोडवरील लाईट सुरू करण्यात व्यावेत अशी मागणी माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी केली आहे. चैतन्यनगर – शिवमंदिर ते सांगवी दरम्यानच्या वॉकिंग वॉकिंग ट्रॅकवर लावलेली झाडे काही अज्ञात व्यक्तींनी तोडल्याचे व गैरवापर केल्याचे निदर्शनास आले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रॅकच्या बाजूंने लोखंडी जाळीचे कुंपण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे या परिसराचे सौंदर्य टिकून राहील तसेच सकाळी चालायला येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता व सु...
Ganeshotsav : राज्यात गणेशोत्सव होणार आता राज्य महोत्सव – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

Ganeshotsav : राज्यात गणेशोत्सव होणार आता राज्य महोत्सव – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

धार्मिक, उमरखेड, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, पुणे, मुंबई, लातूर
मुंबई| शेकडो वर्षाची घरगुती गणेशोत्सव परंपरा व अनेक वर्षापासूनची सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक समरसतेचे मानबिंदू आहे. त्यामुळे राज्यात आता गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे केली. मंत्री ॲड. शेलार म्हणाले, गणेशोत्सवाचे महत्त्व व ओळख संपूर्ण जगभर व्हावी, आपल्या परंपरेची आधुनिकतेशी सांगड व्हावी, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे गणेशोत्सव हे व्यासपीठ आणखी मजबूत व्हावे, गणेशोत्सवासंबंधी सर्व घटक एकत्र जोडले जावेत, पर्यटन वाढावे, आपल्या समृद्ध परंपरा रितीरिवाजांचे जतन-संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्राचे स्थान जगाच्या नकाशावर ठळक व्हावे, यासाठी गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्याच्या आर्थिक, ...
Pradhan Mantri Surya Ghar : प्रधानमंत्री सुर्य घर- मोफत वीज योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

Pradhan Mantri Surya Ghar : प्रधानमंत्री सुर्य घर- मोफत वीज योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पुणे, महाराष्ट्र, हिंगोली
मुंबई| प्रत्येक घरात मोफत वीज पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री सुर्य घर- मोफत वीज योजना राबविण्यात येत आहे. शासनामार्फत सुरू असलेल्‍या या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी ऊर्जा विभागाशी समन्वय साधून, सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले. सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध योजना राबविण्यात येतात. प्रधानमंत्री सुर्य घर- मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात विधानभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, प्रधान सचिव हर्षदिप कांबळे, आयुक्त सुरेंद्र पवार आदिसह अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री. शिरसाट म्हणाले की, सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. ऊर्जा विभागाशी समन्वय साधून प्रधानमंत्री सुर्य घर- मोफत वीज योजना राबवावी. तसेच, पात्र लाभार्थ्यांना या ...
Revenue Minister Bawankule : दिव्यांगांच्या प्रश्नावर सहा मंत्र्यांची चर्चा; महसूलमंत्री बावनकुळे यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा

Revenue Minister Bawankule : दिव्यांगांच्या प्रश्नावर सहा मंत्र्यांची चर्चा; महसूलमंत्री बावनकुळे यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा

कृषी, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, मुंबई, हिंगोली
मुंबई| राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, ग्रामपंचायत कर्मचारी व दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांचा सकारात्मक तोडगा अखेर आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या तातडीच्या मध्यस्थीमुळे निघाला. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात आयोजित विविध विभागांच्या मंत्र्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. या बैठकीस कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, पणन मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, दुग्धविकास मंत्री अतुल सावे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विभागांमधील समन्वय घडवून आणत काही प्रश्नांवर थे...
Kumbh Mela : जग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Kumbh Mela : जग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, धार्मिक
नाशिक| कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल असे भव्य दिव्य आणि स्मरणीय आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यातील अमृत स्नानाचे दिवसही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी जाहीर केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार डॉ. राहु...
error: Content is protected !!