Friday, June 26

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
हदगावचा प्रस्तावित किनवट जिल्ह्यात समावेश करण्यास काँग्रेसचा विरोध; तहसील कार्यालयात निवेदन

हदगावचा प्रस्तावित किनवट जिल्ह्यात समावेश करण्यास काँग्रेसचा विरोध; तहसील कार्यालयात निवेदन

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव | हदगाव तालुक्याचा प्रस्तावित किनवट जिल्ह्यात समावेश करण्याच्या निर्णयास हदगाव तालुका काँग्रेस कमिटीने तीव्र विरोध दर्शविला असून, यासंदर्भात आज तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. माजी आमदार तथा लोकनेते माधवराव पाटील जळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन प्रशासनाकडे देण्यात आले. निवेदनात हदगाव तालुक्याचे सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी, प्रशासकीय तसेच आरोग्यविषयक संबंध अनेक वर्षांपासून नांदेड जिल्ह्याशी घट्ट जोडलेले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयी-सुविधा, जनभावना आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करता तालुक्याचा किनवट जिल्ह्यात समावेश करणे योग्य ठरणार नसल्याची भूमिका काँग्रेसने मांडली आहे. हदगाव तालुका नांदेड जिल्ह्यातच कायम ठेवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे शासन व प्रशासनाकडे करण्यात आली. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने तसेच नागरिकांच्या हिताचा विचार क...
इस्लापूर येथे अप्पर तहसिल कार्यालय स्थापनेचा प्रस्ताव; नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या

इस्लापूर येथे अप्पर तहसिल कार्यालय स्थापनेचा प्रस्ताव; नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या

नांदेड
नांदेड | किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे नव्याने अप्पर तहसिल कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय स्तरावर गती मिळाली असून या संदर्भातील प्रारूप प्रस्ताव प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रस्तावावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून त्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून २१ एप्रिल २०२६ रोजी प्राप्त झालेल्या पत्रानुसार इस्लापूर येथे स्वतंत्र अप्पर तहसिल कार्यालय स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर सह सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या ११ जून २०२६ रोजीच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयाने या प्रस्तावाची जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. प्रस्तावानुसार नव्या अप्पर तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात इस्लापूर, जलधारा आणि शिवणी मंडळांचा समावेश करण्यात येणार आहे. सध्या ही तीनही मंडळे किनवट तहसिल कार्या...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार व अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन

नांदेड
नांदेड| महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ चा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था शाहुराज हिरे यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाने ही कर्जमुक्ती योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा विचार करण्यात येणार आहे. योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यापूर्व...
नांदेड बसस्थानकाच्या सर्वांगीण विकासाची गरज; प्रवाशांकडून सुविधा सुधारण्याची अपेक्षा

नांदेड बसस्थानकाच्या सर्वांगीण विकासाची गरज; प्रवाशांकडून सुविधा सुधारण्याची अपेक्षा

महाराष्ट्र, नांदेड
आधुनिक बससेवेला स्वच्छ, सुसज्ज आणि प्रवाशाभिमुख बसस्थानकाची जोड आवश्यक नांदेड,गोविंद मुंडकर| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गेल्या काही वर्षांत प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी वातानुकूलित बस, डिजिटल सुविधा आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. या प्रयत्नांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो प्रवाशांना सुरक्षित व परवडणारा प्रवास उपलब्ध झाला आहे. मात्र या सकारात्मक बदलांना नांदेड बसस्थानकाच्या सुविधा आणि परिसराच्या विकासाची जोड मिळाल्यास प्रवाशांचा अनुभव अधिक समाधानकारक ठरू शकतो. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी नांदेड बसस्थानक हे महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. त्यामुळे येथे स्वच्छता, अचूक माहिती व्यवस्था आणि मूलभूत सुविधांचा दर्जा अधिक उंचावण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. ...
सेवाज्येष्ठ TET/CTET पात्र शिक्षकांवरील अन्याय थांबवावा

सेवाज्येष्ठ TET/CTET पात्र शिक्षकांवरील अन्याय थांबवावा

करियर, नांदेड
 ग्रामविकास मंत्र्यांकडे शिक्षक परिषदेची मागणी मुंबई| राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदांच्या पदोन्नती प्रक्रियेत सेवाज्येष्ठ TET/CTET पात्र शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) यांनी केला आहे. या संदर्भात शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शिक्षण संचालकांनी १४ मे २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रामुळे पदोन्नती प्रक्रियेत संभ्रम निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पदोन्नती प्रक्रिया राबविताना ग्रामविकास विभागाशी आवश्यक समन्वय साधला गेला नसल्याचा दावा करत संबंधित पत्राला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. तसेच पदोन्नती समितीच्या बैठकीच्या अंतिम दिनांकापर्यंत TET/CTET पात्रता प्राप्त केलेल्या सेवाज्येष्ठ श...
Double Tragedy : बोरगडी तांड्यात दुहेरी मृत्यूने खळबळ : पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; तीन चिमुकली पोरकी

Double Tragedy : बोरगडी तांड्यात दुहेरी मृत्यूने खळबळ : पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; तीन चिमुकली पोरकी

क्राईम, नांदेड
हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तिन्ही लहान मुले आई-वडिलांविना पोरकी झाली आहेत. मृत दाम्पत्याची ओळख पायल विनोद राठोड (वय ३५) आणि विनोद रंगराव राठोड (वय ४०) अशी झाली आहे. हे दाम्पत्य धारजणी फुलवाडी तांडा (ता. भोकर) येथील रहिवासी असून नातेवाईकांच्या लग्नासाठी बोरगडी तांडा येथे आले होते. प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास पतीने पत्नीला घराबाहेर नेऊन धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत तिचा मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी धानोरा शिवारातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. या प्रकरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट...
Accident news : पोटा अबादी रस्त्यावर उभ्या ट्रक दुचाकीचा भिषण अपघात

Accident news : पोटा अबादी रस्त्यावर उभ्या ट्रक दुचाकीचा भिषण अपघात

नांदेड, लाइफस्टाइल
आजोबासह नातवाचा जागीच मृत्यू - एकजण गंभीर हिमायतनगर, प्रतिनिधी | भोकर हिमायतनगर महामार्गावर असलेल्या पोटा आबादी जवळ उभ्या असलेल्या ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात झाला असुन या घटनेत दुचाकी चालक आजोबा व नातवाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या अपघातातील एकजण गंभीर असलेल्या सहा वर्षीय मुलास उपचारासाठी नांदेड रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.एका चिमुकल्या बालकांचा अपघातात मृत्यू झाला असुन या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील रहिवासी असलेले बालाजी गंगाराम नाचारे वय (50) आरूष रतन नाचारे, अक्षय माधव शेळके वय 06 हे तिघेजण दुचाकीवर जात असताना भर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक होऊन मोठा अपघात झाला या घटनेत दुचाकीस्वार बालाजी नाचारे व यांचाच नातू आरूष रतन नाचारे हा जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली सदरील हि घटना पोटा अ...
Sand and Murrum Mafia : हिमायतनगरात रेती-मुरूम माफियांचा उच्छाद; प्रशासन ‘मूक प्रेक्षक’ की संगनमत?

Sand and Murrum Mafia : हिमायतनगरात रेती-मुरूम माफियांचा उच्छाद; प्रशासन ‘मूक प्रेक्षक’ की संगनमत?

क्राईम
अधिकृत ठेकेदारांना अडचण, बेकायदेशीरांना अभय — संताप उसळला..! हिमायतनगर (अनिल मादसवार) पैनगंगा नदीकाठ आणि तालुक्यातील गायरान, तलाव परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती व मुरूम उत्खननाने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. कोठा, धानोरा, वारंगटाकळी, विरसणी, खडकी, पिचोंडी आदी भागांत दिवस-रात्र बेकायदेशीर उत्खनन आणि वाहतूक सुरू असूनही प्रशासनाचे डोळेझाक धोरण कायम असल्याने संताप व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोणताही अधिकृत परवाना किंवा लिलाव नसताना डझनावरी ट्रॅक्टर आणि हायवा वाहनांद्वारे खुलेआम रेती-मुरूमाची ने-आण सुरू आहे. स्थानिकांच्या मते, “सगळं उघड्यावर चालू आहे, पण कारवाई शून्य!”  प्रशासनाच्या या बोटचेपी कारभारामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल पाण्यात जात असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, दिघी व कामारी येथील अधिकृत रेती घाटांचे नियमांनुसार लिलाव झालेले असतानाही त्या ठेकेदारांनाच अडथळे निर्मा...
नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, देश विदेश
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ;  जलसंवर्धनाचा जागर करत अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना नाशिक| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे झाला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अहिल्यादेवींचे विचार, वारसा आणि विकास हा त्रिसूत्री मंत्र घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थ...
Community Marriage : “सामुदायिक विवाह सोहळा : सामाजिक बांधिलकीतून सुखी संसाराकडे एक भक्कम पाऊल”

Community Marriage : “सामुदायिक विवाह सोहळा : सामाजिक बांधिलकीतून सुखी संसाराकडे एक भक्कम पाऊल”

नांदेड, राजकीय
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच मा. श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून हदगाव येथे भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या मराठवाड्यातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती पाहता अशा सामुदायिक विवाह सोहळ्यांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. दुष्काळ, शेतीतील अनिश्चितता, वाढते आर्थिक संकट, बेरोजगारी आणि विवाहासाठी होणारा प्रचंड खर्च यामुळे अनेक कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण निर्माण होतो. अनेक गरीब, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य कुटुंबांना आपल्या मुला-मुलींचे विवाह सन्मानाने पार पाडणे कठीण जाते. अशा वेळी सामुदायिक विवाह ही केवळ एक सामाजिक परंपरा नसून, ती समाजाला दिलासा देणारी आणि आर्थिक बचतीची प्रभावी चळवळ ठरते. कमी खर्चात, सन्मानाने आणि सामा...
error: Content is protected !!