Wednesday, May 13

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
हदगाव तालुक्यातील रस्ते कामांवर माहिती फलक लावा – स्वाभिमानी शेतकरी संघटनाची मागणी

हदगाव तालुक्यातील रस्ते कामांवर माहिती फलक लावा – स्वाभिमानी शेतकरी संघटनाची मागणी

कृषी
हदगाव (गौतम वाठोरे) तालुक्यात व शहरात सुरू असलेल्या रस्ते कामांवर अधिकृत माहिती फलक लावण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाने केली आहे. या संदर्भात तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील सूर्यवंशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सध्या हदगाव तालुक्यात विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, कामाच्या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार आवश्यक माहिती फलक लावण्यात आलेले नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. रस्ते कामे कोणत्या योजनेतून सुरू आहेत, अंदाजपत्रक किती आहे, कामाचा कालावधी किती आहे तसेच संबंधित कंत्राटदार कोण आहे, याबाबत नागरिकांना कोणतीही माहिती मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. माहिती फलक नसल्यामुळे कामाच्या दर्जा आणि निधीच्या वापराबाबत जनतेमध्ये संशयाचे वातावरण निर्माण हो...
तुम्ही जनतेचे मालक नसून सेवक आहात हे विसरू नका -खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांना झापले

तुम्ही जनतेचे मालक नसून सेवक आहात हे विसरू नका -खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांना झापले

नांदेड, राजकीय
हदगाव, गौतम वाठोरे| हदगांव हिमायतगर येथील महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी स्वतःला जनतेचे मालक समजून वागत असतील तर त्यांनी तो भ्रम काढून टाकावा. तुम्ही जनतेचे सेवक आहात, हे विसरू नका,अशा कडक शब्दांत हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हदगाव येथे शासकीय विश्रामगृहामध्ये शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये एमएसईबी (MSEB) प्रशासनाचे कान टोचले. बोरगाव येथील दुर्दैवी घटनेला अनेक दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने खासदारांनी संताप व्यक्त केला. बोरगाव घटनेवरून बैठकीत रणकंदन झाला काही दिवसांपूर्वी बोरगाव येथे वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे एक दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणाची दखल घेत खासदारांनी हदगाव-हिमायतनगर विभागातील महावितरण अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेतून प्रशासनाचा ढिम्म कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. घटनेल...
Hunger stricke : आश्वासनांची फसवणूक? शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा

Hunger stricke : आश्वासनांची फसवणूक? शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनाच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने थेट लढाईचा पवित्रा घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याच्या मागणीवरून पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. युवा तालुकाध्यक्ष माधव किशन शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत प्रशासनावर आरोप करत सांगितले की, “फेब्रुवारी व मार्च महिन्यात उपोषण केल्यानंतर १५ एप्रिलपर्यंत जागा देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. ही सरळसरळ फसवणूक आहे असे मुन्नाभाऊ शिंदे यांनी म्हंटले आहे.” २१ एप्रिलपासून उपोषण - या पार्श्वभूमीवर, २१ एप्रिल २०२६ पासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. प्रशासन...
समता, बंधूभाव व समाजसुधारणेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर आजही प्रेरणादायी – विरभद्र एजगे

समता, बंधूभाव व समाजसुधारणेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर आजही प्रेरणादायी – विरभद्र एजगे

करियर
पेनूर| समता, बंधूभाव आणि समाजसुधारणेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर यांचे विचार आजही समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत शालेय समिती सदस्य तथा पत्रकार विरभद्र एजगे यांनी व्यक्त केले. महात्मा बसवेश्वर हे १२व्या शतकातील महान भारतीय तत्त्ववेत्ता, समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक होते. त्यांनी स्त्री-पुरुष समानता, लोकशाही मूल्ये आणि जातिभेद निर्मूलनासाठी मोठे कार्य केले. ‘काय कायकैवे कैलास’ (काम हीच पूजा) हा त्यांचा संदेश समाजाला दिशा देणारा ठरला. तसेच ‘अनुभव मंडप’ स्थापनेद्वारे त्यांनी समाजात विचारमंथनाची परंपरा निर्माण केली. जिल्हा परिषद हायस्कूल, पेनूर येथे मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक बसूआप्पा धोंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून स...
Himayatnagar railway station : हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील विकासकामांवर प्रश्नचिन्ह; प्रवाशांना मूलभूत सुविधांचा अभाव

Himayatnagar railway station : हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील विकासकामांवर प्रश्नचिन्ह; प्रवाशांना मूलभूत सुविधांचा अभाव

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार | शहरातील रेल्वे स्थानकावर कोट्यावधीच्या निधीतून सुरु असलेली विकासकामे अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेक त्रुटींमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदार व रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानकावरील दुसऱ्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर अद्याप रेल्वे कोच पोझिशन दर्शविणारे डिजिटल डिस्प्ले बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कोणती गाडी कोणत्या ठिकाणी थांबणार, याची माहिती प्रवाशांना मिळत नाही. याशिवाय पिण्याच्या पाण्याचीही मोठी समस्या निर्माण झाली असून, प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एक नंबर प्लॅटफॉर्मवर जुन्या बांधकामाला नवीन स्वरूप देण्यात आल्याचे दिसून येते, तर दुरुस्तीच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याची तक्रार आहे. छतामधून पाणी गळत असल्याचेही ...
नागपूर सेवेसाठी नांदेड पतंजली परिवाराचा सन्मान

नागपूर सेवेसाठी नांदेड पतंजली परिवाराचा सन्मान

नांदेड, सोशल वर्क
नांदेड | नागपूर येथील मिहान परिसरात पतंजली हर्बल कंपनीच्या उद्घाटन सोहळ्यावेळी दिलेल्या सेवेसाठी नांदेड पतंजली परिवाराच्या साधक, योगशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी पतंजली योगपीठ परिवारातर्फे अनिल अमृतवार, पंढरीनाथ कंठेवाड, राम शिवपनोर, नागनाथ पाटील, शिवाजीराव शिंदे हळदेकर, एकनाथ इंगोले पाटील, भरत टेकाळे आदींचा गौरव करण्यात आला. नागपूर जिल्ह्यात विविध स्तरांवर सेवा बजावल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच पतंजली योग परिवाराचे व्यंकटराव कल्याणपाड यांना सेवानिवृत्ती निमित्त तसेच पुढील काळात नांदेडमध्ये सेवा देण्यासाठी त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला हनुमंत ढगे, सदाशिवराव बूटले पाटील, दिलीप माने, शंकर परकंटे, भगवान किडे, अनिल कदम, गोविंद कल्याणपाड, सुरेश लंगडापुरे, पंढरीनाथ आघाव, हरिहर नरवाडे, भगवानराव देशमुख आदी मा...
Stop the bad work : “निकृष्ट काम थांबवा नाहीतर आंदोलन!” — राष्ट्रवादीचा इशारा

Stop the bad work : “निकृष्ट काम थांबवा नाहीतर आंदोलन!” — राष्ट्रवादीचा इशारा

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या नाली बांधकामातील कथित भ्रष्टाचारावर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने थेट अॅक्शन घेत काम बंद पाडले. वारंवार तक्रारी करूनही ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम सुरूच ठेवल्याने संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी धडक देत ठेकेदाराला जाब विचारला. तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी यापूर्वीच संबंधित अभियंता देशपांडे यांना काम थांबवण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून “अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम करू” असे आश्वासन दिले. मात्र, काही दिवसांतच पुन्हा त्याच पद्धतीने थातुरमातुर काम सुरू झाल्याचे समोर आले. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीने पुन्हा घटनास्थळी जाऊन काम थांबवले आणि “अभियंता स्वतः उपस्थित राहून दर्जेदार काम केले तरच काम सुरू होईल, अन्यथा आंदोलन छेडू,” असा थे...
Himayatnagar Accident : म्हसोबा नाल्यावर मृत्यूचा सापळा; भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार

Himayatnagar Accident : म्हसोबा नाल्यावर मृत्यूचा सापळा; भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| तालुक्यात सलग अपघातांच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना सरसम–हिमायतनगर मार्गावर पुन्हा एक भीषण अपघात घडला. म्हसोबा नाल्याजवळ झालेल्या या दुर्घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सरसम येथील रमेश गुंडेकर, अविनाश गोखले व लखन पंड्या हे तिघे मोटरसायकलवरून हिमायतनगरहून सरसमकडे जात होते. दरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात लखन पंड्या यांचा जागीच मृत्यू झाला, तर रमेश गुंडेकर व अविनाश गोखले हे गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या...
Bring back the Mundhe! “मुंढे परत आणा!” : नांदेडमध्ये दिव्यांगांचा संतप्त एल्गार, अंदाज समितीलाही घेराव

Bring back the Mundhe! “मुंढे परत आणा!” : नांदेडमध्ये दिव्यांगांचा संतप्त एल्गार, अंदाज समितीलाही घेराव

महाराष्ट्र, नांदेड
नांदेड| “आम्हाला दिखाऊ कारभार नको, मुंढेंसारखा कडक आणि प्रामाणिक अधिकारी हवा!”—अशा घोषणांनी बुधवारी नांदेडचे वातावरण दणाणून गेले. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या अचानक झालेल्या बदलीच्या निषेधार्थ सकल दिव्यांग संघटनांनी थेट रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. कडक उन्हातही हातात मागण्यांचे फलक, तोंडात घोषणांचा आवाज आणि मनात तीव्र संताप—अशा वातावरणात आंदोलन पार पडले. विशेष म्हणजे, नांदेड दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळ अंदाज समितीलाही आंदोलकांनी घेराव घालत जाब विचारला. “कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला हटवून कोणाचा फायदा केला?” असा थेट सवाल करत आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांच्या वतीने अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मुंढे यांची बदली त्वरित रद...
World Health Day : जागतिक आरोग्य दिनानिमित्त गोपाळचावडी येथे सर्व रोग निदान-उपचार शिबिर संपन्न

World Health Day : जागतिक आरोग्य दिनानिमित्त गोपाळचावडी येथे सर्व रोग निदान-उपचार शिबिर संपन्न

आरोग्य, नांदेड
नांदेड| जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जन औषधवैद्यकशास्त्र विभागातर्फे "सर्वरोग निदान व उपचार शिबिर” नांदेड तालुक्यात गोपाळचावडी येथे 7 एप्रिल रोजी उत्साहात पार पडले. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पदवीपूर्व (एम.बी.बी.एस.) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फॅमेली ऑडॉप्शन प्रोग्राम हा भाग शैक्षणिक वर्षात समाविष्ट केला असल्याने ग्रामिण भागातील प्रत्यक्ष आरोग्य समस्या समजून घेण्याची आणि त्यावर उपपाययोजना करण्याची संधी मिळावी तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णसेवा, गृहभेटींचा अनुभव, आरोग्य जनजागृती व समुपदेशनामध्ये सक्रिय सहभाग घेता यावा त्यामुळे त्यांचे शैक्षणिक तसेच सामाजिक भान अधिक वृध्दिंगत होण्यास मदत होणार असून भविष्यातील वैद्यकीय सेवेबाबत त्यांची दृष्टी अधिक व्यापक होईल, या हेतूने महाविद्यालयातील जनऔषधवैद्यकशास्त्र ...
error: Content is protected !!