समता, बंधूभाव व समाजसुधारणेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर आजही प्रेरणादायी – विरभद्र एजगे
पेनूर| समता, बंधूभाव आणि समाजसुधारणेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर यांचे विचार आजही समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत शालेय समिती सदस्य तथा पत्रकार विरभद्र एजगे यांनी व्यक्त केले.
महात्मा बसवेश्वर हे १२व्या शतकातील महान भारतीय तत्त्ववेत्ता, समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक होते. त्यांनी स्त्री-पुरुष समानता, लोकशाही मूल्ये आणि जातिभेद निर्मूलनासाठी मोठे कार्य केले. ‘काय कायकैवे कैलास’ (काम हीच पूजा) हा त्यांचा संदेश समाजाला दिशा देणारा ठरला. तसेच ‘अनुभव मंडप’ स्थापनेद्वारे त्यांनी समाजात विचारमंथनाची परंपरा निर्माण केली.
जिल्हा परिषद हायस्कूल, पेनूर येथे मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक बसूआप्पा धोंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून स...









