Wednesday, May 13

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

राज्यातील सर्व वृत्तपत्रांना 150 टक्के दरवाढ द्यावी व पत्रकारावरील अन्याय थांबवावे – व्हॉईस ऑफ मीडिया

राज्यातील सर्व वृत्तपत्रांना 150 टक्के दरवाढ द्यावी व पत्रकारावरील अन्याय थांबवावे – व्हॉईस ऑफ मीडिया

मुंबई, महाराष्ट्र
देऊळगाव राजा l राज्यातील वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असून जनतेपर्यंत शासनाच्या योजना निर्णय आणि धोरणे पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करीत आहे गेल्या काही वर्षात वृत्तपत्र उद्योगावर आर्थिक दृष्ट्या मोठा ताण निर्माण झाला आहे.आम्ही अनेक वेळा व्हाट्सअप मीडियाच्या वतीने या संदर्भात निवेदन दिले,आंदोलन केले पण त्याचा काही फायदा झाला नाही. तरी राज्यातील सर्व वृत्तपत्रांना दीडशे टक्के दरवाढ देणे तसेच जाहिरात व प्रशासकीय धोरणाबाबत विविध मागण्यांना मान्यता आणि पत्रकारावर होणारे अन्याय थांबवावे करिता देऊळगाव राजा तहसील कार्यालय येथे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना व्हॉईस ऑफ मीडिया देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद आहे की सन 2019 पासून आस्थागायत कागद,प्रिंटिंग मटेरियल, केमिकल्स, वीज, मनुष्यब...
Chif Minister Fadnavis : दत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदनजी भारती महाराज यांना मुख्यमंत्री फडणवीस यांची श्रद्धांजली

Chif Minister Fadnavis : दत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदनजी भारती महाराज यांना मुख्यमंत्री फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई | माहूर (जि. नांदेड) येथील श्री दत्त शिखर संस्थानच्या गादीचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती (मालक) महाराज यांना देवाज्ञा झाल्याची बातमी अत्यंत दुःखद असून, त्यांच्या निधनाने अध्यात्म, सेवा आणि परंपरेचा एक मोठा दीपस्तंभ हरपल्याची भावना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात दत्तभक्ती, धर्मसंवर्धन आणि समाजसेवेसाठी अखंड कार्य केले. त्यांच्या साधेपणातच महानता दडलेली होती. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे असंख्य भक्तांना आध्यात्मिक दिशा मिळाली होती. माहूर गड व दत्त शिखर संस्थानची गौरवशाली परंपरा त्यांनी अत्यंत निष्ठेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने जपली. त्यांच्या कार्यामुळे संस्थानची ओळख अधिक व्यापक झाली होती. त्यांच्या जाण्याने केवळ संस्थेचेच नव्हे, तर संपूर्ण भक्तपरिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, ...
demand for electric buses : खा. अशोकराव चव्हाण यांची महाराष्ट्रातील लहान शहरांसाठी इलेक्ट्रिक बसेसची मागणी

demand for electric buses : खा. अशोकराव चव्हाण यांची महाराष्ट्रातील लहान शहरांसाठी इलेक्ट्रिक बसेसची मागणी

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड| महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज संसदेत महाराष्ट्रातील टियर-२ व टियर-३ शहरांसाठी ‘पीएम ई-बस सेवा’ योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बसेस मागणी केली. या योजनेच्या पुढील टप्प्यात ३ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या जास्तीत जास्त शहरांना बसेस उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा मनोदय असल्याचे केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी उत्तरादरम्यान स्पष्ट केले. राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात ‘पीएम ई-बस सेवा’ योजनेबाबत आज झालेल्या चर्चेत सहभागी होताना खा. अशोकराव चव्हाण यांनी या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ३५ हजार इलेक्ट्रिक बसेसचे वितरण करण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या योजनेमुळे नागरिकांना माफक दरात पर्यावरणपूरक प्रवास करता येणार असल्याचे त्यांनी नमूद ...
Congress : खरात प्रकरणात राजकीय पाठबळाचा संशय; काँग्रेसचा गंभीर आरोप

Congress : खरात प्रकरणात राजकीय पाठबळाचा संशय; काँग्रेसचा गंभीर आरोप

नाशिक, मुंबई, राजकीय
मुंबई | नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर आरोप केले आहेत. महिलांचे शोषण करणारा अशोक खरात हा महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’ असल्याचा घणाघात त्यांनी केला. सपकाळ म्हणाले की, अशोक खरातच्या विरोधात समोर आलेले प्रकार धक्कादायक असून सखोल चौकशी केल्यास आणखी गंभीर बाबी उघड होण्याची शक्यता आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, तसेच त्याच्या मागे कोणाचा राजकीय आशिर्वाद आहे, याचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामी राज्य आहे. तरीही अंधश्रद्धेविरोधी कायदा असतानाही अशा भोंदूबाबांचे प्रकार सुरू राहणे चिंताजनक आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर लढा देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली, हेही त्...
Chief Minister Fadnavis : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

Chief Minister Fadnavis : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, धार्मिक
मुंबई| ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आज करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे, ज्येष्ठ गायिका पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे, पुस्तकाचे निर्माते विनोद पवार, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे आणि शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या सुंदर आणि आकर्षक कॉफीटेबल बुकचे प्रकाशन करताना त्यांना विशेष आनंद होत आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा वारीतून प्रकट होते, जी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या आराधनेत अनुभवता येते. प्रत्येक वारीत अनेक कथा जन्म घेतात आणि त्या या पुस्तकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहेत. ते पुढे म्हणाले की, तीर्थ आणि त्या तीर्थातील देव या दोन्हींचे महत्त्व या पुस्तकातून अधोरेखित झाले आहे. इतिहास...
Thunderstorm and hailstorm warning : राज्यात 17 ते 20 मार्चदरम्यान वादळी पाऊस व गारपीटीचा इशारा

Thunderstorm and hailstorm warning : राज्यात 17 ते 20 मार्चदरम्यान वादळी पाऊस व गारपीटीचा इशारा

कृषी, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, मराठवाडा, मुंबई, लातूर, हिंगोली
मुंबई| राज्यात 17 ते 20 मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 17 मार्च रोजी राज्यातील दक्षिण भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता अधिक असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः तेलंगणा व कर्नाटक सीमेलगतच्या भागांमध्ये हवामानाचा अधिक प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. 18 ते 20 मार्च दरम्यान या वादळी पावसाची व्याप्ती आणि तीव्रता वाढण्याची शक्यता असून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. 21 मार्चपासून हवामान स्थिर होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. दरम्यान, रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे ...
Nanded News : नांदेडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या मागणीला वेग

Nanded News : नांदेडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या मागणीला वेग

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड | राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) यांनी मुंबई येथे राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते (Sadanand Date) यांची भेट घेऊन नांदेड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ही गरज अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. या बैठकीत नांदेड शहरात ‘सेफ सिटी प्रोजेक्ट’ची अंमलबजावणी करण्याबाबतही चर्चा झाली. या प्रकल्पांतर्गत शहरातील प्रमुख रस्ते आणि संवेदनशील ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. नांदेड-वाघाळा महानगर पालिका निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या ‘विकसित नांदेडचा संकल्पनामा’मध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. दरम्यान, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण (sh...
Brijesh Singh : पत्रकारांनी ‘एआय’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहावे – ब्रिजेश सिंह

Brijesh Singh : पत्रकारांनी ‘एआय’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहावे – ब्रिजेश सिंह

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई|पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असला तरी एआयला वास्तव समजण्याची मर्यादा आहे. सत्य शोधण्याची जबाबदारी आणि समाजाचा विश्वास हे पत्रकारितेचे मूलभूत बळ असल्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही पत्रकारितेची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे, असे मत महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले. पत्रकारांनी एआयकडे धोका म्हणून न पाहता कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित ‘एआय परिषद २०२६’ चे उद्घाटन ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, विश्वस्त देवदास मटाले, अजय वैद्य, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आदी उपस्थित होते. ब्रिजेश सिंह म्हणाले की, मानव इतिहासात ज्ञानाचा प्रसार छपा...
school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना

school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना

करियर, नांदेड, मुंबई
मुंबई | हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील शाळेच्या जागेबाबत निर्माण झालेला वाद अत्यंत गंभीर ठरत असून त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर १२ मार्च २०२६ रोजी दुपारी विधानभवन, मुंबई येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक Rahul Narwekar यांच्या दालनात झाली. बैठकीस Jaykumar Gore, Dadaji Bhuse तसेच आमदार Baburao Kadam Kohlikar यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत जिल्हा परिषदांच्या मालकीच्या शाळांच्या जागांबाबत उद्भवलेल्या अडचणी, त्यावरील न्यायालयीन प्रकरणे तसेच शाळांच्या इमारतींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः बनचिंचोली येथील प्रकरणासह राज्यातील जिल्हा परिषदांच्या मालकीच्या शाळांच्या जागांचा आढावा घेण्यात आला. ज्या प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून पॅनेलवरील वकील कार्यरत आहेत, त्या ठिकाणी कामात कसूर झाल्यास संबंधित वकिलांवर कारवाई करण...
Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्माण करण्यासंदर्भात मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक १२ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता मंत्रालय, मुंबई येथील विस्तार इमारतीतील समिती कक्ष क्रमांक ३१९ मध्ये आयोजित करण्यात आली होती. ही बैठक राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल (वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत हदगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद लवकरात लवकर निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच हदगाव वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. ...
error: Content is protected !!