Thursday, May 14

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Padma Awards : पद्म पुरस्कार 2026 जाहीर : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा सन्मान

Padma Awards : पद्म पुरस्कार 2026 जाहीर : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा सन्मान

नांदेड, देश विदेश, मनोरंजन, मुंबई
नवी दिल्ली| देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची 2026 साठी घोषणा आज करण्यात आली. कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार, उद्योग व समाजसेवा अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी देशभरातील 131 मान्यवरांना यंदा हा सन्मान जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा समावेश आहे. महाराष्ट्राला यंदा एक पद्म विभूषण, तीन पद्म भूषण आणि 11 पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर केले जातात. यंदाच्या यादीत 5 पद्म विभूषण, 13 पद्म भूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यामध्ये 19 महिला, 6 परदेशी अथवा अनिवासी भारतीय, तसेच 16 मान्यवरांना मरणोत्तर सन्मान देण्यात आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या दीर्घकालीन व प्रभावी योगदानाबद्दल मरणोत...
Bharat Parv : लाल किल्ल्यावर ‘भारत पर्व 2026’ महोत्सव 26 ते 31 जानेवारी या कालावधीत

Bharat Parv : लाल किल्ल्यावर ‘भारत पर्व 2026’ महोत्सव 26 ते 31 जानेवारी या कालावधीत

नांदेड, देश विदेश, मुंबई
नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा उत्साह द्विगुणित करणारा ‘भारत पर्व 2026’ हा भव्य पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव 26 ते 31 जानेवारी या कालावधीत दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या पुढाकारातून होणाऱ्या या महोत्सवासाठी नागरिकांना विनामूल्य प्रवेश देण्यात आला आहे. 26 जानेवारी रोजी हा महोत्सव सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत तर 27 ते 31 जानेवारी दरम्यान दररोज दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेत खुला राहणार आहे. देशभरातील विविध राज्यांच्या पर्यटन, संस्कृती आणि परंपरांचे दर्शन या महोत्सवातून घडणार आहे. या महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) भव्य आणि आकर्षक दालन उभारण्यात आले असून, त्यामध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध पर्यटन वारशाची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. कोकणातील निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-कि...
Voter’s Day : राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य

Voter’s Day : राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य

नांदेड, मुंबई, लेख
25 जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी, 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. स्वतंत्र भारताने लोकशाहीची वाट स्वीकारल्यानंतर, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपवण्यात आली. त्यामुळे भारतीय लोकशाहीत 25 जानेवारी या दिवसाला अतिशय महत्व आहे.  तथापि, नागरिकांना आपल्या मताची किंमत, उपयोगिता, महत्व आणि कर्तव्य कळावे यासाठी 25 जानेवारी 2011 पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा होतो. 2026 हे वर्ष राष्ट्रीय मतदार दिनाचे 16 वे वर्ष आहे. निवडणूक आयोगाने यावर्षी राष्ट्रीय मतदार दिनाचे ब्रीद वाक्य 'माझा भारत माझे मत ' हे ठेवले आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. येथे कोट्यावधी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतात. भारतीय लोकशाहीचा अभ्यास कर...
Special Trains : गुरु तेगबहादूर साहिब जींच्या ३५० व्या शहिदी समागमासाठी नांदेडला विशेष रेल्वे सेवा

Special Trains : गुरु तेगबहादूर साहिब जींच्या ३५० व्या शहिदी समागमासाठी नांदेडला विशेष रेल्वे सेवा

नांदेड, देश विदेश, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड, अनिल मादसवार| हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेडमध्ये २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या भव्य शहिदी समागमासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ‘ट्रेन ऑन डिमांड (TOD)’ अंतर्गत दिल्ली (हजरत निजामुद्दीन), चंदीगड आणि मुंबई येथून थेट नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. 🚆 दिल्ली–नांदेड विशेष रेल्वे - उत्तर भारतातील भाविकांसाठी हजरत निजामुद्दीन–नांदेड (गाडी क्र. ०४४९४/०४४९३) ही राखीव सुपरफास्ट विशेष गाडी दिनांक २३ व २४ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता दिल्लीहून सुटणार पानिपत, आग्रा कॅन्ट, झाशी, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा मार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी ४:२० वाजत...
Special train : प्रवाशांसाठी Good News 🚆 मुंबई–नांदेड दरम्यान विशेष गाडी धावणार

Special train : प्रवाशांसाठी Good News 🚆 मुंबई–नांदेड दरम्यान विशेष गाडी धावणार

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड, अनिल मादसवार| मुंबई–नांदेड मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते हुजूर साहिब नांदेड आणि नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर विशेष रेल्वे गाडी चालविण्यात येणार असून ही गाडी चार फेऱ्या पूर्ण करणार आहे. यामुळे सण, लग्नसराई व प्रवासाच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. 🚆 मुंबई ते नांदेड विशेष गाडी गाडी क्रमांक 01041 – लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुजूर साहिब नांदेड ही विशेष गाडी दि. 23 व 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. ही गाडी ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, नगरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, परभणी व पूर्णा या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4.00 वाजता हुजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल. 🚆 नांदेड ते मुंबई वि...
Maharashtra News : महाराष्ट्र नवीन जिल्हे : २२ जिल्हे व ८१ तालुके निर्मितीचा प्रस्ताव, यादी जाहीर

Maharashtra News : महाराष्ट्र नवीन जिल्हे : २२ जिल्हे व ८१ तालुके निर्मितीचा प्रस्ताव, यादी जाहीर

महाराष्ट्र, नांदेड, पुणे, मराठवाडा, मुंबई, यवतमाळ, लातूर, विदर्भ
मुंबई, प्रतिनिधी| महाराष्ट्र राज्यात सध्या ३६ जिल्हे आणि ३५८ तालुके कार्यरत आहेत. मात्र वाढती लोकसंख्या, विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र आणि प्रशासकीय कामांचा वाढता ताण लक्षात घेता, राज्यात नवीन जिल्हे व तालुके निर्माण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात २२ नवीन जिल्हे आणि ८१ नवीन तालुके निर्माण करण्याबाबत प्रशासकीय स्तरावर गंभीर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नवीन जिल्हे व तालुक्यांच्या निर्मितीमागील मुख्य उद्देश म्हणजे प्रशासन अधिक गतिमान करणे, नागरिकांना शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे आणि सर्वांगीण विकासाला चालना देणे हा आहे.  नवीन जिल्ह्यांची गरज का भासते? महाराष्ट्रातील काही जिल्हे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यंत मोठे आहेत. अनेक ठिकाणी जिल्ह्याच्या टोकाच्या भागातून मुख्यालय गाठण्यासाठी नागरिकांना ८ ते १० तासांचा...
Boys, sisters, solace : लाडक्या बहिणींना दिलासा ; डिसेंबर–जानेवारीचे ₹३,००० मानधन जमा होण्यास सुरुवात !

Boys, sisters, solace : लाडक्या बहिणींना दिलासा ; डिसेंबर–जानेवारीचे ₹३,००० मानधन जमा होण्यास सुरुवात !

नांदेड, मुंबई
मुंबई | राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेतील डिसेंबर व जानेवारी महिन्यांचे प्रत्येकी ₹१,५०० असे एकूण ₹३,००० मानधन लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने ही रक्कम थेट DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने जमा केली जात आहे. योजनेचा उद्देश - महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, त्यांना स्वावलंबी बनवणे आणि कुटुंबाच्या दैनंदिन गरजांमध्ये हातभार लावण्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० आर्थिक मदत दिली जाते. ₹३,००० एकत्र का जमा? - डिसेंबर व जानेवारी महिन्यांतील मानधन काही ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित होते. आता शासनाने हे दोन्ही महिन्यांचे मानधन एकत्र ₹३,००० स्वरूपात जमा करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंम...
Shednet House Scheme : शेडनेट हाऊस योजना : सरकारकडून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे अनुदान, संरक्षित शेतीला मोठा आधार

Shednet House Scheme : शेडनेट हाऊस योजना : सरकारकडून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे अनुदान, संरक्षित शेतीला मोठा आधार

कृषी, नांदेड, मुंबई
🌿 शेडनेट हाऊस योजना – काय आहे? शेडनेट हाऊस म्हणजे जाळीच्या स्वरूपात बनवलेली संरचना, ज्यातून सूर्यप्रकाश, हवा व ओलावा नियंत्रित प्रमाणात मिळतो आणि त्यात भाजीपाला, फुले, नर्सरी किंवा बागायती पिकांचे उत्पादन अधिक परिणामकारक होते. यामुळे पिकांचे उत्पादन वाढते आणि वातावरणीय ताण कमी होतो. 💰 अनुदान (सब्सिडी) – किती मिळू शकते? शेडनेट हाऊसवर विविध राज्य सरकार द्वारे आर्थिक मदत उपलब्ध आहे. अनुदानाची रक्कम सुमारे लाखो रुपयांपर्यंत देण्यात येते:  ✅ 50% ते 70% सब्सिडी – बहुतेक राज्यात सामान्य शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळते आणि लघु, सीमांत, अनुसूचित जाती/जनजाति (SC/ST) शेतकऱ्यांना 70% पर्यंत अनुदान मिळते. ✅ काही राज्यांमध्ये अधिकतम अनुदान 23 लाख रुपये पर्यंत अपेक्षित (मिडिया रिपोर्ट्स व योजनांच्या उदाहरणानुसार). ✅ Bihar सारख्या ठिकाणी शेडनेट हाऊसवर कधी कधी 75% पर्यंत सब्सिडी मिळण्याचीही सूचना आहे (राज...
Voting for elections : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान

Voting for elections : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान

नांदेड, परभणी, मुंबई, राजकीय, लातूर
मुंबई| राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731; तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली. येथील सह्याद्री अतिथिगृहात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले की, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि...
Agricultural universities : कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे – राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

Agricultural universities : कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे – राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

नांदेड, कृषी, मुंबई
मुंबई| जागतिक हवामानाचे गंभीर संकट लक्षात घेऊन राज्यातील कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाणांना संस्कारित करून त्यांचे उन्नतीकरण करावे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल अशा प्रकारचे बियाणे निर्माण करावीत असे सांगताना कृषी विद्यापीठांनी राज्यात नैसर्गिक शेतीची क्रांती आणण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी केले. लोकभवन मुंबई येथून कृषि विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यातील कृषी व पशुविज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंशी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधताना राज्यपाल बोलत होते. बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, ‘पोकरा’चे प्रकल्प संचालक परिमल सिंह, राज्यातील कृषी तसेच पशुविज्ञान विद्यापीठांचे कुलगुरु, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, 'आत्मा'चे संचालक सुनील बोरकर व कृषी विभागाच...
error: Content is protected !!