Wednesday, May 20

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Chief Minister Devendra Fadnavis : गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करून अधिक कठोर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करून अधिक कठोर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, महाराष्ट्र, मुंबई
नागपूर| राज्यातील गुटखा बंदी अधिक प्रभावी आणि कठोर करण्यासाठी सरकार निर्णायक पावले उचलत असून गुटखा व्यवसायावर आता मकोका लावता यावा यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर, अस्लम शेख, अभिमन्यू पवार, रईस शेख आणि अमीन पटेल यांनी शाळा–महाविद्यालय परिसरात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्री आणि वहनासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लावण्याचा प्रस्ताव विधी विभागाकडे पाठवण्यात आला होता; मात्र कायद्यातील “हार्म आणि हर्ट” या दोन घटकांची पूर्तता नसल्याने तो लागू होऊ शकत नाही. त्यामुळे कायद्यात आवश्यक बदल करून गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल अशा तरतुदी करण्यात येणार आहेत. यानंतर ह...
leopard attacks : भविष्यात बिबट्यांच्या हल्ल्यात एकही मृत्यू होणार नाही यासाठी यंत्रणा सतर्क – वन मंत्री गणेश नाईक

leopard attacks : भविष्यात बिबट्यांच्या हल्ल्यात एकही मृत्यू होणार नाही यासाठी यंत्रणा सतर्क – वन मंत्री गणेश नाईक

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नागपूर| राज्यातील मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून ठोस उपाययोजना राबविण्यात येत असून भविष्यात बिबट्यांच्या हल्ल्यात एकही नागरिक मृत्यूमुखी पडणार नाही यासाठी यंत्रणा पूर्ण सतर्क करण्यात आली असल्याचे विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत केले. राज्यात वाढत्या बिबट्या हल्ल्यांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री नाईक बोलत होते. यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड, अतुल भातखळकर, सुनील प्रभु आदी सदस्य उपस्थित होते. मंत्री नाईक म्हणाले की, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्या हा प्राणी केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या शेड्यूल-1 मध्ये असल्याने थेट कार्यवाहीस मर्यादा आहेत. त्यामुळे त्याचा समावेश शेड्यूल-2 मध्ये करण्याची विनंती केंद्र सरकारकडे पाठविण्यात आली आहे. केंद्रीय वन विभागाने राज्यातील पाच बिबट्यांच्या नसबंदीला तात्पुरती ...
new criminal laws : नवीन फौजदारी कायद्यांचे प्रदर्शनातील प्रात्याक्षिकाद्वारे ज्ञान..!

new criminal laws : नवीन फौजदारी कायद्यांचे प्रदर्शनातील प्रात्याक्षिकाद्वारे ज्ञान..!

नांदेड, मुंबई, लेख
देशात 1 जुलै 2024 पासून भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय पुरावा कायदा हे तीन नवीन कायदे लागू झाले आहेत. या नवीन फौजदारी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना गुन्हा घडल्यापासून अंतिम शिक्षा होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया समजावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात  प्रात्यक्षिक विशेष आकर्षण ठरले.  या प्रात्यक्षिक प्रदर्शनाने गुन्हा नोंदणीपासून शिक्षा आणि पुनर्वसनापर्यंतचा संपूर्ण न्यायप्रक्रियेचा प्रवास अत्यंत स्पष्ट, जिवंत आणि लोकशिक्षणात्मक स्वरूपात मांडला आहे. नवीन फौजदारी कायद्यांमुळे  वैज्ञानिक तपास, तत्काळ प्रतिसाद, डिजिटल पुरावे, कठोर शिक्षा आणि पीडित केंद्रित न्याय या तत्त्वांना प्राधान्य मिळाले आहे. हे प्रदर्शन जनजागृतीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरले आहे. प्रदर्शनात 25 ते 30 हजार नागरिकांनी भेट देऊन या कायद्यांसंदर्भातील ज्ञान अवगत केले. भारताच्या न्य...
नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 1 डिसेंबरला रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुदत

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 1 डिसेंबरला रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुदत

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई l नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 पर्यंत असेल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांस संबंधित कायद्यांमधील तरतुदींनुसार घेतल्या जातात. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल. त्यानंतर प्रचारसभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही....
Voting : 246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल

Voting : 246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई| महाराष्ट्र राज्यात मंजिल पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेद्वारे राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या दोन्ही संस्थांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत 1 कोटींहून अधिक मतदार मतदान करतील. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मशीन आणि बॅलेट युनिट वापरण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात 10 नोव्हेंबर 2025 उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025 उमेदवारी अर्जांची पडताळणी 18 नोव्हेंबर 2025 अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर 2025 अपिल असलेल्या ठिकाणी अर्ज ...
Nationalist Congress Party : मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नांदेड जिल्ह्याची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

Nationalist Congress Party : मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नांदेड जिल्ह्याची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई | आज मुंबईतील वरळी येथील डोम (MNCI) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी नांदेड उत्तर आणि दक्षिण जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान मा. अजितदादा पवार यांनी प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा करून पक्षाची सद्यस्थिती, संघटनात्मक बांधणी आणि पक्षविस्तार या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करत पक्षाची विचारधारा, कार्य आणि जनहिताचे धोरण तळागाळापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन केले. ...
S.M. Deshmukh : ३ डिसेंबर रोजी राज्यातील १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करणार : एस.एम.देशमुख

S.M. Deshmukh : ३ डिसेंबर रोजी राज्यातील १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करणार : एस.एम.देशमुख

नांदेड, मुंबई, लाइफस्टाइल
मुंबई| अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी म्हणजे येत्या ३ डिसेंबर २०२५ रोजी राज्यातील १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प परिषदेने सोडला आहे.. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा हा विश्व विक्रम असणार आहे, असा दावा मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केला आहे. ३ डिसेंबर १९३९ रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची स्थापन झाली. गेली दहा वर्षे ३ डिसेंबर हा दिवस राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून पाळला जातो.. पहिल्या वर्षी ३००० पत्रकारांची आरोग्य तपासणी केली गेली..त्यानंतर ही संख्या क्रमश: वाढत गेली.. गेल्यावर्षी ८००० पत्रकारांची तपासणी केली गेली. वाढता प्रतिसाद पाहून यावर्षी १०,००० पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परिषदेशी संलग्न जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांनी स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि डॉक्टर...
S. M. Deshmukh ; सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हा छोटासा प्रयत्न- एस. एम. देशमुख

S. M. Deshmukh ; सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हा छोटासा प्रयत्न- एस. एम. देशमुख

महाराष्ट्र, मुंबई
बीड l बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आणि तलावातील पाणी सोडल्याने अनेक गावांचे मोठे नुकसान झाले. याबरोबर गोदाकाठ आणि सिंदफणा काठावरील शेतकऱ्यांचे ही मोठे नुकसान झालेले आहे. अनेकांची घरे वाहून गेली. अनेकांची घरे पडली. शेतकऱ्यांची शेती निस्तनाबूत झाली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शक्य होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आला. माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी, मंजरथ, डेपेगाव, सांडस चिंचोली, आळसे वाडी, गंगामसला या ठिकाणी परिषदेच्या वतीने वतीने ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख सर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त देशमुख म्हणाले की पत्रकार हा समाजाचा घटक असतो आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे आम्ही शेतकऱ्यांना म...
India’s journey : डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

India’s journey : डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या महासत्तेच्या प्रवासात नैसर्गिक भागीदार असलेल्या ब्रिटनची भूमिका महत्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. फिनटेकचा उपयोग सामान्य नागरिकांच्या आयुष्यात समृद्धीसाठी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. भारताने अतिशय कुशलतेने तंत्रज्ञानाचा उपयोग करून डिजिटल व्यवहारातून सुरक्षित, शाश्वत वित्तीय व्यवस्थेचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले असल्याचे सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगाला भारतासोबत भागीदारी आणि जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या जागतिक महासत्तेच्या वाटचालीत सहभागी होण्याचे आवाहन केले. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक फिनटेक महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर सहभागी झ...
Chief Minister Devendra Fadnavis : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 31,628 कोटींचे पॅकेज  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 31,628 कोटींचे पॅकेज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये 29 जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त 253 तालुके आणि 2059 मंडळांमध्ये मदतीसाठी 65 मिलीमिटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नुकसानग्रस्त भागातील बळीराजाला पुन्हा उभे करण्यासाठी 31 हजार 628 कोटींच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले. या पॅकेजनुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 18 हजार 500 रुपये, हंगामी बागायतीसाठी 27 हजार रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी 32 हजार 500 रुपये मदत दिली जाणार आहे. जाहीर करण्यात आलेली मदत दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न राहणार असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मंत्रिमंडळाच्या बै...
error: Content is protected !!