Wednesday, May 13

देश विदेश

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, देश विदेश
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ;  जलसंवर्धनाचा जागर करत अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना नाशिक| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे झाला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अहिल्यादेवींचे विचार, वारसा आणि विकास हा त्रिसूत्री मंत्र घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थ...
Appeal of District Administration : जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Appeal of District Administration : जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नांदेड, देश विदेश, महाराष्ट्र
नांदेड| मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परद...
Job opportunities : इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

Job opportunities : इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

करियर, देश विदेश, नांदेड
नांदेड| राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) मार्फत इस्रायलमध्ये नुतनीकरणा अंतर्गत कामासाठी कौशल्यपूर्ण भारतीय उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या निवड प्रक्रियेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त बा.सु.मरे यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांसाठी पात्रता, निकष, निवड प्रक्रिया, लाभ याबाबतची सर्व माहिती पुढीलप्रमाणे आहे. किमान अनुभव :- ३ वर्षे (Renovation Interior Work मध्ये कौशल्य आवश्यक). शैक्षणिक पात्रता किमान १० वी उत्तीर्ण असावा. वयमर्यादा २५ ते ५० वर्षे. इंग्रजी ज्ञान वाचन, लेखन आणि बोलणे यामध्ये प्राविण्य. पूर्व अनुभव इस्त्रायलमध्ये पूर्वी नोकरी नसावी. गुन्हेगारी रेकॉर्ड भारतातून स्वच्छ PCC आवश्यक, व्यसन मुक्त इतिहास. आरोग्य शारीरिक व मानसिक दृष्ट्यासक्षम मोठे...
पंजाबमधील हजार सरपंच प्रतिनिधींचे मार्कंड येथे उत्साहात स्वागत

पंजाबमधील हजार सरपंच प्रतिनिधींचे मार्कंड येथे उत्साहात स्वागत

नांदेड, देश विदेश
नवीन नांदेड l पंजाब राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे एक हजार सरपंच प्रतिनिधींचे नांदेड जिल्ह्यातील मार्कंड येथे अत्यंत उत्साहात व आपुलकीने स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय मार्कंड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्कंड आणि प्रगती वन ग्रामसंघ मार्कंड यांच्या संयुक्त वतीने हा स्वागत समारंभ पार पडला. दि. २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या चार दिवसांच्या अभ्यास दौर्‍याच्या अंतर्गत ३१ जानेवारी रोजी पंजाबमधील सरपंच प्रतिनिधींनी नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ग्रामपंचायती व पंचायत समितींना भेटी दिल्या. या दौर्‍यात महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण व आदर्श उपक्रमांचा सखोल अभ्यास करण्यात आला. दोन्ही राज्यांतील ग्रामविकास विषयक कामांची माहिती, अनुभवांची देवाणघेवाण व चर्चा यामुळे हा दौरा अ...
Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विकासाचा आराखडा

Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विकासाचा आराखडा

मुंबई, देश विदेश
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर करत देशाच्या आर्थिक विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला. शेतकरी, महिला, युवक, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक शिस्त यांवर भर देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे चित्र समोर आले आहे. शेतकऱ्यांसाठी काय घोषणा? शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. नारळ संशोधन केंद्राची स्थापना पशुपालन व दुग्धव्यवसायासाठी अनुदानात वाढ काजू, कोको ब्रँडला जागतिक दर्जा देण्याचा निर्णय ५०० एकात्मिक मत्स्य केंद्र उभारणार दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन अधिक मजबूत करणार चंदन, नारळ व काजू पिकांना चालना चंदन लागवडीस प्रोत्साहन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर मत्स्यव्यवसायात महिलांचा सहभाग वाढवणार सागरी किनारपट्टी व डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना मदत शेतकऱ्य...
Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमित हानी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमित हानी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेकडून भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, देश विदेश, महाराष्ट्र
नवी दिल्ली| महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल आज देशाच्या राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पवार यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक कार्याचा गौरव करत त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची शोकसंवेदना - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, 'बारामती येथील विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याचे वृत्त अत्यंत क्लेशदायक आहे. त्यांचे अकाली जाणे हे राज्याच्या विकासासाठी नुकसानकारक आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत, विशेषतः सहकारी क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक आहे. ' पंतप्रधान नरेंद्र मोदींची श्रद्धांजली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आपल्या संदेशात अजित ...
Chief Minister Devendra Fadnavis : गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, तेलंगणा, देश विदेश, धार्मिक, महाराष्ट्र
नांदेड,अनिल मादसवार | ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नव्हते, तर सत्य, धर्म, स्वातंत्र्य आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी होते. त्यांच्या बलिदानातून प्रत्येक पिढीला निर्भीडपणे अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळेच त्यांच्या विचारांचा वारसा राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात ते बोलत होते. या भव्य समागमास लाखो भाविकांची उपस्थिती लाभली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, पालकमंत्री अतुल ...
Padma Awards : पद्म पुरस्कार 2026 जाहीर : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा सन्मान

Padma Awards : पद्म पुरस्कार 2026 जाहीर : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा सन्मान

नांदेड, देश विदेश, मनोरंजन, मुंबई
नवी दिल्ली| देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची 2026 साठी घोषणा आज करण्यात आली. कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार, उद्योग व समाजसेवा अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी देशभरातील 131 मान्यवरांना यंदा हा सन्मान जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा समावेश आहे. महाराष्ट्राला यंदा एक पद्म विभूषण, तीन पद्म भूषण आणि 11 पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर केले जातात. यंदाच्या यादीत 5 पद्म विभूषण, 13 पद्म भूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यामध्ये 19 महिला, 6 परदेशी अथवा अनिवासी भारतीय, तसेच 16 मान्यवरांना मरणोत्तर सन्मान देण्यात आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या दीर्घकालीन व प्रभावी योगदानाबद्दल मरणोत...
Betmogrekar–Karhale–Belge : प्रजासत्ताक दिनाच्या कर्तव्य पथावरील शानदार परेडसाठी बेटमोगरेकर–कऱ्हाळे–बेळगे दिल्लीत

Betmogrekar–Karhale–Belge : प्रजासत्ताक दिनाच्या कर्तव्य पथावरील शानदार परेडसाठी बेटमोगरेकर–कऱ्हाळे–बेळगे दिल्लीत

नांदेड, देश विदेश, राजकीय
नांदेड| निवडणुकीतील पराभवाचे शल्य काही काळ बाजूला ठेवत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, माजी शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे व माजी जि.प. सभापती संजय बेळगे हे ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या भव्य व नेत्रदीपक परेडचे साक्षीदार ठरत आहेत. अलीकडेच झालेल्या नगरपालिकेच्या तसेच नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये या तिन्ही काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्या राजकीय अपयशाने खचून न जाता, ऐतिहासिक राष्ट्रीय सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा आनंद हे तिघेही घेत आहेत. २६ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणाऱ्या राष्ट्रध्वजारोहणानंतर कर्तव्य पथावर सादर होणारी भव्य परेड जगभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. हा अविस्मरणीय सोहळा प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य या तिन्ही मित्रांना लाभले असून, त्यासाठी जिल्ह्याचे खासदार र...
Cm bhagwant mann : नांदेडच्या भूमीवर होणारा शहीदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक : मुख्यमंत्री भगवंत मान

Cm bhagwant mann : नांदेडच्या भूमीवर होणारा शहीदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक : मुख्यमंत्री भगवंत मान

नांदेड, देश विदेश, राजकीय
नांदेड| सचखंड श्री हजूर साहिब ही श्रद्धा, त्याग आणि बलिदानाची पवित्र भूमी असून या भूमीवर होत असलेला शहीदी समागम हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून राष्ट्रीय एकात्मतेचे जिवंत प्रतीक असल्याचे प्रतिपादन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केले. ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग व राज्यस्तरीय समागम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोदी मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री मान म्हणाले की, सेवा हाच खरा धर्म असून या शहीदी समागमाच्या माध्यमातून समता, बंधुता आणि करुणेचा संदेश संपूर्ण देशभर पोहोचत आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे विचार, कार्य व त्याग पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असून त्यांचा जीवनप्रवास नव्या पिढीसमोर असणे अत्यंत आवश्यक आहे. यावेळी त्यांनी नांदेड येथी...
error: Content is protected !!