Wednesday, May 13

लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

dynamic administration : गतिमान प्रशासनाचा ‘मराठवाडा पॅटर्न’

dynamic administration : गतिमान प्रशासनाचा ‘मराठवाडा पॅटर्न’

नांदेड, लातूर, लेख
महाराष्ट्र शासनाने राबवलेला '१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम' राज्याच्या प्रशासकीय इतिहासातील एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरला आहे. प्रशासकीय कामाची पुनर्रचना, संपूर्ण डिजिटायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर या त्रिसूत्रींवर आधारलेल्या या कार्यक्रमाने प्रशासनाचा चेहरामोहरा बदलून टाकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात काल (२८ मार्च) पार पडलेला गौरव सोहळा हा याच 'डिजिटल क्रांती'चा साक्षीदार होता. २४ तास उपलब्ध असणाऱ्या डिजिटल सुविधांमुळे आता सरकारी कार्यालयांमधील रांगा कमी होताना दिसतील, 'किमान शासन, कमाल सुशासन' सूत्र मराठवाड्याने खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरवले आहे. लातूर: कल्पकता आणि तंत्रज्ञानाचा वापर - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली लातूरने ई-प्रशासनात अभूतपूर्व झेप घेतली आहे. १७९.२५ गुणांसह राज्यात...
Vijay Joshi : पत्रकारिता, संस्कार आणि सुरांची संवेदना : विजय जोशी

Vijay Joshi : पत्रकारिता, संस्कार आणि सुरांची संवेदना : विजय जोशी

नांदेड, लेख
कॉपी पेस्ट च्या जमान्यात आपली स्वतंत्र लेखण शैली जपलेल्या विजय जोशी यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळेच त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे आमच्यासाठी अभिमानाचे क्षण ठरले. त्यांच्या पत्रकारिता, सांस्कृतिक जाण आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत आम्ही त्यांना “सुधाकर पत्र भूषण” या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले होते. हा सन्मान केवळ त्यांच्या कार्याची पावती नसून, त्यांच्या मूल्याधिष्ठित वाटचालीचा सन्मान होता. आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि अनेकदा दिशाहीन होत चाललेल्या माध्यमविश्वात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ बातम्या देत नाहीत, तर समाजाला विचारांची दिशा देतात. पत्रकार विजय जोशी हे त्यापैकीच एक ठाम, अभ्यासू आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून ती एक ध्येयवेडी साधना आहे—सत्याला निर्भीडपणे मांडणारी, समाजाच्या वेदनांना शब्द देणारी आणि माणुसकीच्या मू...
District Collector Rahul Kardile : जनतेच्या विश्वासाचा दीपस्तंभ : जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

District Collector Rahul Kardile : जनतेच्या विश्वासाचा दीपस्तंभ : जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

नांदेड, लेख
काळाच्या अथांग प्रवाहात काही व्यक्तिमत्त्वे अशी जन्माला येतात, जी केवळ पदामुळे नव्हे तर आपल्या कर्तृत्वाने, विचारांनी आणि संवेदनशीलतेने समाजाच्या मनावर अधिराज्य गाजवतात. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले हे असेच एक तेजस्वी, कर्तव्यनिष्ठ आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कार्यशैलीत प्रशासनाची काटेकोरता आणि माणुसकीची ऊब यांचा सुंदर संगम दिसून येतो. प्रशासन म्हणजे नियम, शिस्त आणि कागदोपत्री प्रक्रिया—अशी सर्वसामान्य समजूत असते. पण कर्डीले यांनी या चौकटीला एक वेगळीच ओळख दिली. त्यांनी प्रशासनाला केवळ आदेश देणारी यंत्रणा न ठेवता, ते जनतेच्या जीवनाशी जोडले. त्यांच्या निर्णयांमध्ये ठामपणा आहे, परंतु त्यामागे जनहिताची प्रामाणिक भावना आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक कृतीत कर्तव्य आणि करुणा यांचा सुरेख समतोल जाणवतो. नांदेड जिल्ह्याच्या विकासाच्या वाटचालीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण ...
World Forest Day : जागतिक वनदिन

World Forest Day : जागतिक वनदिन

नांदेड, लेख
वनसंवर्धनाचा संकल्प, निसर्गाशी नातं दृढ करण्याचा दिवस…जागतिक वनदिन हा दरवर्षी २१ मार्च रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २०१२ साली हा दिवस अधिकृतपणे घोषित केला. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे वनांचे महत्त्व समजावून सांगणे आणि त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे. जागतिक वनदिन हा केवळ दिनविशेष नसून, मानव आणि निसर्ग यांच्यातील अतूट नात्याची जाणीव करून देणारा महत्त्वाचा दिवस आहे. जंगल हे पृथ्वीचे श्वास आहेत—ते आपल्याला प्राणवायू देतात, जलस्रोत जपतात, हवामान संतुलित ठेवतात आणि असंख्य जीवसृष्टीचे आश्रयस्थान आहेत. आजच्या वेगाने बदलणाऱ्या युगात जंगलांचे संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज बनली आहे. शासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत—वृक्षलागवड मोहिमा, वन्यजीव संरक्षण कायदे, अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने घोषित करणे, तसेच जनजागृती कार्यक्...
March 22: World Water Day : २२ मार्च : जागतिक जल दिवस

March 22: World Water Day : २२ मार्च : जागतिक जल दिवस

नांदेड, लेख
स्वयंपाकापासून ते सांडपाण्यापर्यंत घरात पाणी आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी भारतातील पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पिढ्यानपिढ्या महिलांनी सांभाळली आहे. आजही अनेकांना आपली आई, बहीण किंवा आजी डोक्यावर हंडा, कळशी किंवा घागर घेऊन लांबवरून पाणी आणतानाचे प्रसंग आठवते.भारतात आता हे चित्र कालबाह्य झाले तरी जगभरात अधिकही अनेक देशात नागरिक शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्यापासून वंचित आहेत. त्यामुळे यंदा 22 मार्चला जागतिक जल दिवस साजरा करताना संयुक्त राष्ट्राने पाणी व्यवस्थापनात महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले आहे. भारताने पेयजलाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे.घराघरांत नळाद्वारे पाणी पोहोचवण्यासाठी जलजीवन मिशन प्रभावीपणे राबविण्यात आले. तरीही काही भागांत पाणीटंचाई कायम आहे आणि त्याचा सर्वाधिक भार महिलांवरच पडतो. ही समस्या केवळ भारतापुरती मर्यादित नसून जागतिक पातळीवरही ती तितकीच गंभीर आहे. म्हणूनच य...
Gudi Padwa : गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती

Gudi Padwa : गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती

नांदेड, धार्मिक, लेख
कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखात जाणून घेऊया तसेच सध्याच्या आपत्काळात गुढीपाडवा कसा साजरा करायचा हेही समजून घेऊया. अभ्यंगस्नान (मांगलिक स्नान) : गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करण्यास सांगितले आहे. अभ्यंगस्नान करतांना देशकालकथन करतात. तोरण लावणे : स्नानानंतर आम्रपल्लवांची तोरणे सिद्ध करून प्रत्येक द्वाराशी लाल फुलांसहित बांधावी; कारण लाल रंग शुभदर्शक आहे. पूजा : प्रथम नित्यकर्म देवपूजा करतात. ‘वर्षप्रतिपदेला महाशांती करायची असते. शांतीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाची पूजा करतात; कारण य...
Retiring does not mean becoming obsolete : निवृत्त होणे म्हणजे कालबाह्य होणे नव्हे

Retiring does not mean becoming obsolete : निवृत्त होणे म्हणजे कालबाह्य होणे नव्हे

नांदेड, लेख
जीवनाच्या प्रवासात एक टप्पा असा येतो, जेव्हा मनुष्य नोकरीतून किंवा अधिकृत जबाबदाऱ्यांमधून सेवानिवृत्त होतो. अनेकांच्या मनात या क्षणानंतर आयुष्य थांबते, उपयोग संपतो किंवा समाजात महत्त्व कमी होते अशी भीती निर्माण होते. परंतु खरे पाहता निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे, तर आयुष्याच्या दुसऱ्या आणि अधिक अर्थपूर्ण पर्वाची सुरुवात असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महान भारतीय सांख्यिकी तज्ज्ञ Calyampudi Radhakrishna Rao (सी. राधाकृष्ण राव). त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात जे कार्य केले, ते अनेक तरुणांसाठीही प्रेरणादायी आहे. राव साठाव्या वर्षी सेवानिवृत्त झाले आणि आपल्या मुलगी व नातवंडांसोबत अमेरिकेत स्थायिक झाले. साधारणपणे या वयात अनेकजण विश्रांती घेण्याचा विचार करतात. परंतु राव यांनी निवृत्तीला विश्रांती न मानता नवीन संधी मानली. ६२ व्या वर्षी त्यांनी अमेरिकेतील University of Pittsburgh येथे स...
महिला दिन विशेष लेख  – घर आणि विश्व दोन्ही समर्थपणे सांभाळणारी स्त्रीशक्ती

महिला दिन विशेष लेख  – घर आणि विश्व दोन्ही समर्थपणे सांभाळणारी स्त्रीशक्ती

नांदेड, लेख
आजचा काळ हा स्त्रीशक्तीच्या नव्या उभारणीचा काळ मानला जातो. समाजातील अनेक रूढी, परंपरा आणि मर्यादा ओलांडत आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. पूर्वी स्त्रीची भूमिका केवळ घरापुरती मर्यादित मानली जात होती; परंतु शिक्षण, आत्मविश्वास आणि संधी मिळाल्यामुळे आज स्त्री समाजाच्या सर्व क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहे. आज भारतासह जगभरात स्त्रियांनी अनेक उच्च पदांवर काम करत इतिहास घडवला आहे. राष्ट्रपती पदापासून अंतराळवीरांपर्यंत, वैज्ञानिक, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, क्रीडापटू, कलाकार आणि राजकारणी अशा अनेक क्षेत्रांत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अंतराळ संशोधन, संरक्षण क्षेत्र, तंत्रज्ञान, वैद्यकीय सेवा अशा आव्हानात्मक क्षेत्रांमध्येही महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे आजची स्त्री पुरुषांच्या तुलनेत कुठल्याही बाबतीत कमी नाही, हे समाजाने मान्य केले ...
Lord Shri Parmeshwar : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव

Lord Shri Parmeshwar : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव

नांदेड, धार्मिक, लेख
हिमायतनगर (वाढोणा/वारणावती) नगरीचे आराध्य दैवत श्री परमेश्वर भगवान मंदिर अंदाजे 717 वर्षाहुन अधिक जुने असुन, सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. मंदिराचा इतिहास अतिप्राचीण हेमाडपंथी असून, उत्तरेकडे मुख असलेल्या मंदिरातील गाभा-यात शिवशंकर - विष्णुच्या अवातारातील हरीहर रुपातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती (The only standing idol of Lord Shri Parmeshwar) आहे. सर्वांग सुंदर, अत्यंत देखणी अद्वितीय अशी श्री परमेश्वराची मुर्ती एकसंघ असलेल्या काळ्या पाषाणात घडवीलेली असुन, परम अधिक इश्वर म्हणजेच परमेश्वर हे देवाधीदेव आहेत. या मुर्तीचे वर्णन किंवा या मुर्तीशी अन्य देवतांच्या मुर्तीशी साम्य असणारे वर्णण आढळुन येत नाही. त्यामुळे हि मुर्ती भारतात एकमेव मुर्ती आहे, असे म्हणता येईल. भक्तांच्या नवसाला पावणारा परमेश्वर म्हणुन विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश व ईतर भागात ख्याती...
Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

नांदेड, धार्मिक, लेख
भारतवर्ष ही केवळ भौगोलिक सीमा नाही; ती सनातन संस्कृतीची जिवंत परंपरा आहे. हजारो वर्षांच्या आध्यात्मिक साधना, वेदपरंपरा आणि धर्माधिष्ठित जीवनमूल्यांनी या भूमीला “विश्वगुरू” बनविले. या संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि मार्गदर्शनासाठी उभ्या राहिलेल्या पंचजगद्गुरू पीठांना विशेष स्थान आहे रंभापुरी, उज्जैनी, हिमवत् केदार, श्रीशैल आणि काशी. यापैकी उत्तराखंडच्या देवभूमीत वसलेले हिमवत् केदार वैराग्यपीठ, उखीमठ हे अद्वितीय आध्यात्मिक केंद्र आहे. या पीठाचे वर्तमान सिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी हे धर्म, संस्कृती आणि मानवकल्याणाच्या अखंड प्रवासाचे तेजस्वी दीपस्तंभ आहेत. जन्मसंस्कार आणि वेदाध्ययन  - कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील हुविनहळ्ळी या पवित्र भूमीत महास्वामीजींचा जन्म झाला. वडील वेदमूर्ती राचोटय्या आणि माता संगन्नबसम्मा यांच्या धार्मिक वातावरण...
error: Content is protected !!