Wednesday, May 13

लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

नांदेड, लेख
यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प मराठवाड्याला चांगलाच पावला आहे. मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे मार्गांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर- बीड- परळी तसेच जालना- जळगाव व नांदेड - वर्धा रेल्वे मार्गांचा समावेश आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी हे तीन रेल्वेमार्ग पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून हे रेल्वे प्रकल्प प्रलंबित असल्याने त्यावरील कामाचा खर्च दिवसेंदिवस वाढतच होता. परंतु केंद्रीय अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याने आता मराठवाड्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. अहमदनगर- बीड - परळी या रेल्वेमार्गासाठी ४ हजार ९५७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जालना- जळगाव रेल्वे मार्गासाठी ५८०४ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मराठवाडा व विदर्भाला जोडणारा नांदेड- वर्धा हा रेल्वे मार्ग ...
Sutkachaya Savlit Sattechi Bhook : सूतकाच्या सावलीत सत्तेची भूक: सुनेत्रा ताईंनी जबाबदारी निवडली की भाजपाची वंगाळ रणनीती

Sutkachaya Savlit Sattechi Bhook : सूतकाच्या सावलीत सत्तेची भूक: सुनेत्रा ताईंनी जबाबदारी निवडली की भाजपाची वंगाळ रणनीती

लेख, नांदेड
महाराष्ट्राच्या राजकारणात दुःखद आणि अनपेक्षित घडामोडी घडताना दिसत आहेत. २८ जानेवारी २०२६ रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेसह इतर पाच जणांचा बारामतीजवळील विमान अपघातात मृत्यू झाला. अवघ्या तीन दिवसांत ३१ जानेवारीला त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सूतकाच्या काळात सत्ता स्वीकारणे हे धैर्य आहे की राजकीय संधीचा फायदा? अजित पवारांच्या अकाली निधनाने एनसीपी (अजित पवार गट) मध्ये पोकळी निर्माण झाली. महायुती सरकारमध्ये पक्षाचा वाटा व सत्ता टिकवण्यासाठी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी सुनेत्रा ताईंना पुढे केले. शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या. "अजितदादांच्या सप्नांना साकार कराल." हे सका...
Khambir leadership : राज्याचे ‘खंबीर नेतृत्व’, मराठवाड्याचा ‘आधारवड’ कोसळला!

Khambir leadership : राज्याचे ‘खंबीर नेतृत्व’, मराठवाड्याचा ‘आधारवड’ कोसळला!

नांदेड, पुणे, मुंबई, लेख
प्रशासनावरील ज्यांची ‘वचक’, कामाचा ‘उरक’ पाहून अधिकारीही थक्क व्हायचे, असे संपूर्ण राज्याचे खंबीर नेतृत्व हरपले. अजित (दादा) पवार केवळ एका जिल्ह्याचे मर्यादित नेतृत्व नव्हते, तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री आणि अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून राज्याचा गाडा समर्थपणे हाकत. ते राज्याचे नेते होतेच, पण त्याही पलीकडे जाऊन मराठवाडा विभागावर त्यांचा विशेष लोभ होता. दादा मूळचे पश्चिम महाराष्ट्राचे, पण धाराशिव त्यांचे सासर. त्यामुळे मराठवाड्याचे 'जावई' म्हणून त्यांचा या भागावर जीव होताच, पण बीड जिल्ह्याचे 'पालकमंत्री' म्हणून त्यांनी जिल्ह्याला पितृवत प्रेम दिले. तखत श्री हजूर अबचलनगर साहिब जी गुरुद्वारातील ती 'अखेरची' भेट अवघ्या दोन दिवसांपूर्वी, २५ जानेवारीला दादा मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर, नांदेडच्या पवित्र भूमीत होते. नांदेड येथील 'तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब' गु...
Democracy : लोकशाही आणि चौथा आधारस्तंभ : आत्मपरीक्षणाची गरज

Democracy : लोकशाही आणि चौथा आधारस्तंभ : आत्मपरीक्षणाची गरज

नांदेड, लेख
लोकशाही ही केवळ निवडणुकांची प्रक्रिया नसून ती एक सुसंस्कृत, जबाबदार आणि संवेदनशील सामाजिक व्यवस्था आहे. ही व्यवस्था टिकवण्यासाठी आणि अधिक सक्षम करण्यासाठी तिचे चारही आधारस्तंभ भक्कम, निस्पृह आणि विश्वासार्ह असणे अत्यंत आवश्यक आहे. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था आणि चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे वृत्तपत्र व माध्यमे—हे चारही स्तंभ एकमेकांना पूरक ठरून लोकशाहीला स्थैर्य देतात. परंतु आज प्रश्न असा निर्माण होतो की, हे आधारस्तंभ खरोखरच मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का? आणि नसतील, तर त्याची जबाबदारी कोणाची? लोकशाही मजबूत करण्यासाठी तिच्या मुळाशी असलेले मूल्यसंवर्धन महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने शासन, संस्था, संघटना आणि समाजातील नेतृत्व करणारे घटक यांनी तटस्थपणे, दूरदृष्टीने प्रयत्न करणे अपेक्षित असते. मात्र वास्तव पाहता, विशेषतः चौथ्या आधारस्तंभाबाबत हे प्रयत्न अपुर...
Das Maruti : धार्मिक पर्यटनाचे अद्भुत केंद्र बिलोली तालुक्यातील लघुळ येथील दुर्मिळ दास मारुती

Das Maruti : धार्मिक पर्यटनाचे अद्भुत केंद्र बिलोली तालुक्यातील लघुळ येथील दुर्मिळ दास मारुती

नांदेड, धार्मिक, लेख
भारतीय संस्कृतीत धार्मिक पर्यटनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रद्धा, निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा संगम जिथे घडतो, ती स्थळे केवळ देवदर्शनापुरती मर्यादित न राहता पर्यटनाचे प्रभावी केंद्र ठरतात. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील लघुळ येथील दास मारुती मंदिर हे असेच एक आगळेवेगळे आणि दुर्मिळ धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात आहे. दास मारुती : दुर्मिळ संकल्पना - महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वीर मारुती किंवा दक्षिणमुखी मारुतीची मंदिरे आढळतात. मात्र दास मारुतीच्या मूर्ती अत्यंत मर्यादित आहेत. दास मारुती ही केवळ शक्तीची नव्हे, तर रामभक्ती, सेवाभाव, नम्रता आणि समर्पणाची मूर्ती मानली जाते. आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे गोविंदराज स्वामी मंदिरासमोर असलेला मारुती हा दास मारुती म्हणून प्रसिद्ध आहे. याच परंपरेतील, तितक्याच श्रद्धेने पूजिला जाणारा दास मारुती नांदेड जिल्ह्यातील लघुळ येथे विर...
Voter’s Day : राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य

Voter’s Day : राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य

नांदेड, मुंबई, लेख
25 जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी, 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. स्वतंत्र भारताने लोकशाहीची वाट स्वीकारल्यानंतर, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपवण्यात आली. त्यामुळे भारतीय लोकशाहीत 25 जानेवारी या दिवसाला अतिशय महत्व आहे.  तथापि, नागरिकांना आपल्या मताची किंमत, उपयोगिता, महत्व आणि कर्तव्य कळावे यासाठी 25 जानेवारी 2011 पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा होतो. 2026 हे वर्ष राष्ट्रीय मतदार दिनाचे 16 वे वर्ष आहे. निवडणूक आयोगाने यावर्षी राष्ट्रीय मतदार दिनाचे ब्रीद वाक्य 'माझा भारत माझे मत ' हे ठेवले आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. येथे कोट्यावधी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतात. भारतीय लोकशाहीचा अभ्यास कर...
Lakhishah Banjara : शुर योध्दा राय लखिशा बंजारा…!

Lakhishah Banjara : शुर योध्दा राय लखिशा बंजारा…!

नांदेड, लेख
राय लखिशा बंजारा हे मध्ययुगीन भारतातील शूर, दानशूर आणि लोककल्याणासाठी समर्पित असे महान योद्धा होते. त्यांच्या जन्मापासून ते कार्यापर्यंतचा प्रवास हा पराक्रम, त्याग आणि मानवतेचा आदर्श ठरतो. आपले राष्ट्रपती भवन पूर्वाश्रमीचे लखिशा बंजारा यांची ही भूमी आहे. पंजाब मधील खैरपूर तालुका-अलीपूर जिल्हा-मुजफ्फरगड येथे ४ जुलै १५८० रोजी त्यांचा जन्म झाला. सध्या हे ठिकाण पाकिस्तान मध्ये आहे. वडील गोधु बंजारा वडतिया जाधव व्यवसायाने सिव्हील ठेकेदार होते. आजोबा ठाकूरदास बंजारा वडतिया जाधव योद्धा व कुशल व्यापारी होते. नागैया, हेमा, हरी,सितु,पांडरा,बक्षी, बाला, जवाहर ही मुले तर सितो नावाची मुलगी लखिशा बंजारा यांना होती. १७ नातू व २४ पणतू असा मोठा परिवार होता. १६०८ मध्ये गोराम पवार परिवारातील कांतोबाईसोबत विवाह झाला. लखिशा बंजारा यांना ९९ वर्षे १० महिने एवढे आयुष्य लाभले. नवी दिल्ली येथे रायसिना, मालचा,...
Gandul Khat : गांडूळ खत निर्मिती योजना – शेतकऱ्यांना मिळते ७५ टक्के अनुदान

Gandul Khat : गांडूळ खत निर्मिती योजना – शेतकऱ्यांना मिळते ७५ टक्के अनुदान

कृषी, नांदेड, लेख
गांडूळ खत / नाडेप / सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट योजना - (पोकरा अंतर्गत – Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Project)  योजनेचा उद्देश -  शेतात निसर्गजन्य सेंद्रिय खताच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे.  जमिनीची सुपीकता सुधारणे आणि रासायनिक खते कमी करणे.  हवामान बदलाशी सामना करण्यास शेतकऱ्यांना सक्षम करणे. उत्पादन खर्च कमी करून शेतीचे एकूण उत्पन्न वाढवणे. 💰 अनुदान (Subsidy) माहिती - शासन या योजनेअंतर्गत गांडूळ खत/नाडेप/सेंद्रिय निविष्ठा युनिट उभारणीसाठी अनुदान (आर्थिक मदत) पुरवते. 📌 योजनेत मदतीची रूपरेषा: अल्पभूधारक शेतकऱ्यांना 75% पर्यंत अनुदान मिळू शकते. इतर पात्र शेतकऱ्यांना साधारण 65% पर्यंत अनुदान मिळण्याची तलम माहिती उपलब्ध आहे. ही रक्कम प्रकल्प खर्चाच्या आधारावर किंवा निवार्य खर्चाच्या टक्केवारीच्या रूपात दिली जाते. टीप: अनुदानाची अचूक टक्केवारी व खर्चाचे मानदंड सरकार ...
Today’s elections and fake politics : आजच्या निवडणुका आणि खोटे राजकारण

Today’s elections and fake politics : आजच्या निवडणुका आणि खोटे राजकारण

नांदेड, राजकीय, लेख
राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुका एकदाच्या पार पडल्या आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आज निकाल काहीही लागो, दावे प्रतिदावे काहीही असोत मात्र आजकाल निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदललेले आपणास पहावयास मिळते. सर्वच निवडणूका सत्ताशक्ती आणि धनशक्तीच्याच बाजूने असल्याचे निकाल ओरडून ओरडून सांगताहेत. यातही काही नवीन होईल असे दिसत नाही. यापुर्वी राज्यातील एकूण २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी निवडणूक झाली. यात तेच झालं. या निवडणुकीत महायुतीनं महाविकास आघाडीला पछाडल्याचं चित्र निकालावरून पाहायला मिळालं. या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात लढले. यावेळी बऱ्याच ठिकाणी वाद आणि तक्रारी पाहायला मिळाल्या. सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मतमोजणीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. विशेष म्हणजे राज्यात एकत्र असणाऱ्या सत्ताधारी व विरोधी...
Vote Buying : मत विक्रीचा बाजार आणि विवेकाचा मृत्यू

Vote Buying : मत विक्रीचा बाजार आणि विवेकाचा मृत्यू

नांदेड, लेख
लोकशाही ही केवळ मतदानाच्या यंत्रावर बोट ठेवण्याची प्रक्रिया नाही; ती विवेक, मूल्ये आणि आत्मसन्मान यांची कसोटी असते. अशा काळात, ज्या काळात मत म्हणजे माल आणि मतदार म्हणजे ग्राहक अशी भयावह मानसिकता तयार झाली आहे, त्या काळात डॉ. शिवदास हमंद यांनी घेतलेली भूमिका ही केवळ व्यक्तिगत निर्णय नाही—तो एक नैतिक उठाव आहे. “मत विकू नये” यावर लेख लिहिणे खरे तर खूप सोपी गोष्ट आहे. वर्तमानपत्रांचे रकाने, व्यासपीठांवरील भाषणे आणि सोशल मीडियावरील पोस्ट्स या विषयाने ओसंडून वाहतात. पण घरी पैसे आलेले असताना ते परत करणे, मोह टाळणे, आणि ‘नाही’ म्हणण्याचे धाडस करणे—ही गोष्ट असामान्य आहे. हे धाडस डॉ. हमंद यांनी केले, म्हणूनच त्यांचा अभिमान वाटतो. ब्रह्मज्ञान सांगणारे आणि स्वतः कोरडे पाषाण आपल्या समाजात एक विचित्र विसंगती वाढताना दिसते. इतरांना ब्रह्मज्ञान सांगणारे मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत, पण स्वतः मा...
error: Content is protected !!