Wednesday, May 13

लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

हेलन केलर: अंधार आणि शांततेच्या पलीकडे – NNL

हेलन केलर: अंधार आणि शांततेच्या पलीकडे – NNL

लेख
हेलन केलरचा जन्म 27 जून 1880 साली अमेरिकेच्या तुस्कुम्बिया, अलाबामा इथला. 19 महिन्यांच्या वयात छोट्या वयात तिला गंभीर आजाराने ग्रासले आणि त्यात कर्णबधिर आणि दृष्टीहीन करून सोडले. तिच्या असहाय्यतेमुळे निराश झालेली हेलन चिडचिडी आणि रागीट बनली होती. केलरच्या वयाच्या सातव्या वर्षी तिला शिकवण्यासाठी ॲन मॅन्सफिल्ड सुलिव्हन ह्या 20 वर्षीय तरुणीला तिच्या पालकांनी शिक्षिका म्हणून कामावर ठेवले. सुलिव्हन ही केलरच्या आयुष्यात आली तो क्षण तिच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरला. फिंगर-स्पेलिंग, स्पर्शिक सांकेतिक भाषा आणि कठोर शिक्षणाद्वारे, सुलिव्हनने केलरला शिकवायला सुरू केली. तिने हेलन केलर सोबत संवाद साधण्यासाठी प्रामुख्याने अमेरिकन सांकेतिक भाषा (एएसएल) वापरली.. एएसएल व्यतिरिक्त, तिने स्पर्शिक सांकेतिक भाषा देखील वापरली, जिथे चिन्हे दिसण्याऐवजी स्पर्शाने ओळखल्या जातात. हेलनच्या वयाच्या 10व्या वर्षी ॲनने...
डाॅ.आकाश देशमुख यांच्या सामाजिक कार्याची खास आठवण -NNL

डाॅ.आकाश देशमुख यांच्या सामाजिक कार्याची खास आठवण -NNL

लेख
करोनाचा काळ म्हणजे साऱ्या जगाला भयभीत करणारा काळ होता.संकटाचा महा डोंगरच अल्पकाळात तयार झालेला होता.आपलाच माणुस आपल्या माणसाला समोर आला की,सैरावैरा भित पळत एकांतात पळत होता.माणूस माणसा पासून हात -दोन हात लांबच हात होता.अशा परिस्थिती एक एक दिवस कसा तरी कटत होता.सर्व काळ इथे थांबल्या सारखा वाटत होता.या काळात वेगाने धावणारे वस्तु,यंत्रा पासून माणसा पर्यत अनिश्चीत काळासाठी थांबलेली होती.अशा कठिण दिवस चालेल्या काळातल्या एका भर दुपारी गावाकडून नातेवाईकाचा फोन आला की,पेंशटची बीपी खूप वाढली आणी त्यात उलटी होवून एका साईडचे हात पाय थोडे थरथरत आहेत.हदगावच्या डाॅक्टर दवाखान्यात घेत नाही.नांदेडला दवाखान्यात येतोय. कुठल्या दवाखान्यात जावे ? या प्रश्नामुळे सध्याचा कारोनाचा वातावरणामुळे काळजी तर वाढलीच पण माझी तळमळ वाढलेली पेंशटची...त्यात मी कार्यालयात ... साहेब समोर... हातात अत्यंत महत्वाचे कामही असल...
साहिल : एका शाळाबाह्य मुलाचा ‘निष्पाप बळी’ NNL

साहिल : एका शाळाबाह्य मुलाचा ‘निष्पाप बळी’ NNL

लेख, नांदेड
नवे शैक्षणिक वर्ष सुरुच होते आहे. कोणत्याही शैक्षणिक वर्षात कुठेही एकही शाळाबाह्य विद्यार्थी असू नये, असा राज्य सरकारचा दंडक आहे. स्तंभलेखक व शिक्षक मारोती कदम यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात शाळाबाह्य विद्यार्थी शोधून त्यांना शाळेत प्रवेश दिला. परंतु त्यापैकी एका मुलाचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांनी या वास्तव घटनेचे लेखस्वरुप चित्रण केले. वाशीम जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबातील एका मुलाच्या आकस्मिक निधनामुळे त्या कुटुंबावर आलेला काळाचा घाला म्हणजे मारोती कदम यांचा लेख म्हणजे 'निष्पाप बळी' होय. कदम हे अत्यंत संवेदनशील मनाचे लेखक आहेत. आजूबाजूला घडणाऱ्या ज्या अशा घटना त्या कदमांच्या नजरेतून सुटू शकत नाहीत त्या कागदावर शब्दबद्ध होणारच! ते जसे संवेदनशील लेखक आहेत तसे ते विद्यार्थ्यांच्या भावविश्वात रमणारे बालमूलक शिक्षक आहेत. त्यांच्या शाळेत म्हणजे पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा येथील...
हिंदु राष्ट्राला जनचळवळीचे रूप देणारे हिंदु राष्ट्र अधिवेशन ! -NNL

हिंदु राष्ट्राला जनचळवळीचे रूप देणारे हिंदु राष्ट्र अधिवेशन ! -NNL

लेख
प्रस्तावना : शेकडो वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिरात श्री रामलला विराजमान झाले. प्रभु श्रीराम अयोध्यापती झाल्यानंतर पृथ्वीवर रामराज्य अवतरले होते. श्रीराममंदिराच्या निर्माणानंतर हिंदुमनाला आता वेध लागले आहेत ते रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राचे ! काही वर्षांपूर्वीपर्यंत हिंदु राष्ट्र या शब्दाचा उच्चारही गुन्हा असल्यासारखी परिस्थिती होती; पण आज हिंदु राष्ट्राची चर्चा केवळ देशस्तरावर नाही, तर विश्वस्तरावर होत आहे. हा काळाचा महिमा आहे. एखादी घटना स्थूलातून घडण्यापूर्वी सूक्ष्मातून घडलेली असते, असे शास्त्र सांगते. रामायण घडण्यापूर्वी ते वाल्मिकी ऋषींनी लिहिले होते. श्रीराममंदिराचे निर्माण हा सूक्ष्मातून रामराज्याचा अर्थात हिंदु राष्ट्राचा प्रारंभच आहे. ज्या श्रीरामासाठी विश्वभरातील हिंदु भाविक जात-पात-पक्ष-संप्रदाय आदी सर्व भे...
आता मोदींना कळेल अटलजींनी देश कसा चालविला -NNL

आता मोदींना कळेल अटलजींनी देश कसा चालविला -NNL

नांदेड, लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी अखेर पार पडला. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या सलग तीन वेळा पंतप्रधान होण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची मोदी यांची इच्छा (काही जण याला अट्टाहासही म्हणतील) पूर्ण झाली. आता चर्चा सुरु झाली ती हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल काय़..? एकूण परिस्थितीचा विचार करता सध्या तरी या सरकारला कोणताही धोका दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या तीन निवडणुकात जे यश मिळाले ते त्यांच्याच बळावर मिळाले यात संशय नाही. आपल्या बळावर सरकार येऊ शकते हे कळाल्यानंतर त्यांना नेहरुंच्या विक्रमाची बरोबरी करण्याची इच्छा झाली तर त्ते स्वाभाविकही आहे. तसे ते तिस-यांदा पंतप्रधान झाले. परंतु ते होताना पूर्वी सारखे यश त्यांच्या पक्षाला मिळाले नाही हेही वास्तव आहे. यापूर्वी मोदी भाजपाला मिळालेल्या पूर्ण बहुमताच्या जोरावर पंतप्रधान होते. यावेळी त्यांना इतर पक्षाचा आधार (कुबड्या) ...
मराठवाडा शेवटी कोणाचा…?

मराठवाडा शेवटी कोणाचा…?

नांदेड, लेख
मराठवाड्याने लोकसभेच्या निवडणुकीतून भाजपला धक्काच दिला आहे. 'भाजपचा गड' अशी आगेकूच करणाऱ्या मराठवाड्याने भाजपचा एकही उमेदवार निवडून दिला नाही. ही परिस्थिती मराठवाड्यावर का आली? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघातून तिघे काँग्रेसचे तर अन्य तिघे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे व एक खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे व बीडचे खासदार शरद पवार यांच्या गटाचे निवडून आले. मराठवाड्यातील मतदार नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज नाही. मराठवाड्यात त्यांच्या झालेल्या सभांना चांगल्याच प्रतिसाद होता . त्याचबरोबर अमित शाह यांनी घेतलेल्या प्रचार सभा ही चर्चेत राहिल्या. कलम ३७०, राम मंदिर , ट्रिपल तलाक या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांना मराठवाड्यातील जनतेचाही पाठिंबा होता. मग असे काय घडले ज्यामुळे मराठवाड्यातून भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही? यावर चर्चा केली तेवढी क...
नवोन्‍मेष आणि सामर्थ्‍यांचे प्रतिक: वर्षा ठाकूर-घुगे NNL

नवोन्‍मेष आणि सामर्थ्‍यांचे प्रतिक: वर्षा ठाकूर-घुगे NNL

नांदेड, लातूर, लेख
लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा दिनांक 10 जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मिलिंद व्यवहारे यांचा लेख वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत. विकासाचा केंद्रबिुंदू मानून जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी विविध कामाच्‍या माध्‍यमातून लातूर जिल्‍हयाला नवा आयाम दिला आहे. जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आखून दिलेल्‍या कामामध्‍ये अधिकारी आणि कर्मचारी उत्साहाने काम करतात, त्‍यामुळे कामकाजाला गती मिळते. लातूर जिल्ह्याच्या 40 वर्षाच्या प्रशासकीय कारभारात जिल्हाधिकारी म्हणून प्रथमच एका महिलेच्या हाती कारभार देण्यात आला आहे. कर्ता चांगला असेल तर प्रगतीचा मार्ग गतिमान होतो, हे जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूरकरांना दाखवून दिले आहे. वर्षा ठाकूर-घुगे ह्या दिनांक 23 जुलै 2023 रोजी जिल्‍हाधिकारी म्‍हणून लातूर जिल्‍हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्‍या. त्‍यांनी आपल्‍या कामाच्‍या माध्‍यम...
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे नुकसानच..! -NNL

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे नुकसानच..! -NNL

नांदेड, लेख, हिंगोली
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा डंका सर्वात जोरात वाजत होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तर ठाकरे यांच्या शिवसेनेने गद्दार, ५० खोके एकदम ओकेच्या घोषणांनी संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ठाकरे यांच्या शिवसेनेलाही म्हणावे तसे यश मिळाले नाही. उलटपक्षी त्यांचे नुकसानच अधिक झाले आहे. भाजपाचा पराभव झाला याच आनंदात असलेल्या ठाकरे गटाला या वास्तवाचे भान आहे की नाही माहिती नाही. लोकसभा निवडणुकीत यावेळी सर्वाचे लक्ष लागले होते ते शिवसेनेकडे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर सामान्य नागरिक कोणाच्या बाजुने उभे राहतील याची उत्सुकता सर्वानाच होती. तथापि लोकसभा निवडणुकीचा सखोल अभ्यास केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे या निवडणुकीत नुकसान जास्त झाले. तसेच जो विजय मिळाला ...
error: Content is protected !!