Wednesday, May 13

लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Mnrega : मनरेगा अंतर्गत विहीर व शेततळ्यासाठी तब्बल 7 लाखांची तरतूद

Mnrega : मनरेगा अंतर्गत विहीर व शेततळ्यासाठी तब्बल 7 लाखांची तरतूद

कृषी, नांदेड, लेख
ग्रामीण भागातील तसेच कष्टकरी शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत विहीर खोदणे, शेततळे बांधणे यासारख्या वैयक्तिक कामांसाठी मिळणाऱ्या आर्थिक मर्यादेत केंद्र सरकारने मोठी वाढ केली असून, आता या कामांसाठी थेट 7 लाख रुपयांपर्यंत निधी उपलब्ध होणार आहे. मनरेगा ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. या योजनेअंतर्गत वैयक्तिक स्वरूपाची कामे करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्धता, शेती उत्पादनवाढ आणि रोजगाराची हमी मिळते. विशेषतः विहीर व शेततळे ही कामे शाश्वत शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहेत. आधीची मर्यादा आणि निर्माण झालेल्या अडचणी पूर्वी मनरेगा अंतर्गत वैयक्तिक कामांसाठी आर्थिक मर्यादा ५ लाख रुपये इतकी होती. मात्र, मधल्या काळात केंद्र सरकारने ही मर्यादा अचानक कमी करून २ लाख रुपये इतकी केली....
Hind-di-Chadar : सेवेतून भक्तीचा मार्ग ‘हिंद-दी-चादर’श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमात सेवेच्या माध्यमातून साक्षीदार होवू या

Hind-di-Chadar : सेवेतून भक्तीचा मार्ग ‘हिंद-दी-चादर’श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमात सेवेच्या माध्यमातून साक्षीदार होवू या

नांदेड, लेख
भारतीय इतिहासात धर्म, मानवता, त्याग आणि बलिदान यांचे अद्वितीय प्रतीक म्हणून श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांचे नाव अजरामर आहे. धर्मस्वातंत्र्य, मानवमूल्ये आणि सत्यासाठी प्राणार्पण करणारे ते “हिंद-दी-चादर” म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या महान शहिदीच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड शहरात २४ व २५ जानेवारी रोजी एक भव्य, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य समागम असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुमारे ५३ एकर विस्तीर्ण मैदानावर संपन्न होणार असून, देश-विदेशातून जवळपास १० लाखांहून अधिक भाविक या पवित्र समागम कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, सेवा, समानता आणि मानवतेचा महासंगम ठरणार आहे.  नऊ समाजांचा ऐतिहासिक सहभाग - या ऐतिहासिक शहीदी समागमाचे आयोजन नऊ समाजांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. राज्य...
Nanded news : नांदेड नगरीच्या या समस्या सुटल्याच पाहिजेत

Nanded news : नांदेड नगरीच्या या समस्या सुटल्याच पाहिजेत

नांदेड, लेख
नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही तासच उरले आहेत. या निवडणुकीनंतर महापालिकेत आता लोकनियुक्त प्रतिनिधींचे राज्य असणार आहे. नव्याने सत्तेवर येणारी राजवट ही लोकेच्छा पूर्ण करणारी आणि नागरिकांना अधिकाधिक सुविधा प्राप्त करुन देणारी असावी अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. सामाजिक आणि राजकीय स्तरावर नांदेडचा इतिहास अत्यंत उज्वल आहे. त्या उज्वल परंपरेचा नावलौकिक वाढेल अशी कामगिरी करणारे लोकप्रतिनिधी महापालिकेत असावेत एवढीच माफक अपेक्षा आहे. नांदेड शहराची सर्वात महत्वाची समस्या ही वाहतुकीची आहे. नांदेड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस भरमसाठ वाढत आहे. त्या तुलनेने मुलभूत सुविधा कमी पडत आहेत. पूर्वी नांदेड शहरात रिजनल वर्कशाँप ते हबीब टाँकीज हा एकमेव मुख्य मार्ग होता. शहरातील सर्व वाहतुकीचा भार हा एकाच रस्त्यावर होता. परंतु जशी लोकसंख्या वाढत गेली तसे पर्यायी रस्तेही होत गेले. २००८ मध्य...
The door that awaits… वाट बघणारं दार….

The door that awaits… वाट बघणारं दार….

नांदेड, लाइफस्टाइल, लेख
आपल्या देशात गतीमान पध्दतीने रस्तेविकास सुरू आहे सोबतच याचा हातभार देशाच्या विकास गतीला उभारी देण्यात होत आहे. ही नाण्याची एक बाजू असली तरी या गतिमानतेसोबतच देशात अपघात आणि त्यात होणारे मृत्यू आणि आर्थिक नुकसान ही एक चिंतेची बाब आहे. आपण  नुकतेच नव्या वर्षात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर सन 2025 ची आकडेवारी समोर आली आहे या नुसार देशात वर्षभरात 9 लाख 72 हजार जणांचा मृत्यू रस्ते अपघातामध्ये झाला आहे. सरासरीचा विचार करता दिवसाला साधारण 471 जण या अपघातात प्राणास मुकले आहेत. महिन्याला 14 हजारांहून अधिक (14130) अपघातात मरण पावले आहेत. अपघात वाढले याचे मुख्य कारण अर्थात गतीचे वेड असणारी नवी पिढी होय. होणाऱ्या अपघातांमध्ये दुचाकी वाहनचालकांचे प्रमाण जास्त आहे. शासन विविध स्तरावर जनजागृती आणि सुरक्षा उपाय करीत आहे. त्यानंतरही हे अपघात होत आहेत. अपघातात प्राण गमावणाऱ्यांची सर्वाधिक संख्या उत्...
Sri Guru Tegh Bahadur : त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत रूप – श्री गुरु तेग बहादूर साहिबजी

Sri Guru Tegh Bahadur : त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत रूप – श्री गुरु तेग बहादूर साहिबजी

धार्मिक, नांदेड, लेख
श्री. गुरु तेग बहादूरजी हे शीख समुदायाचे गुरु होते, ज्यांची शहादत केवळ एका धर्म किंवा समुदायापुरती मर्यादित नसून, संपूर्ण मानवतेसाठी त्याग, धैर्य आणि धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. जेव्हा एका आध्यात्मिक गुरूंनी अन्याय, अत्याचार आणि धार्मिक दडपशाहीसमोर झुकण्याऐवजी आपले शीश अर्पण केले; मात्र आपल्या तत्त्वांशी कोणतीही तडजोड केली नाही. त्यामुळे त्यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आपल्याला त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण होणे साहजिकच आहे. नांदेड येथे होत असलेल्या 24 व 25 जानेवारी 2026 विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.  श्री. गुरु तेग बहादूर साहिबजी केवळ शीख समुदायातीलच नव्हे, तर भारतीय उपखंडाच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक इतिहासातील एक महान विभूती आहेत. त्यांचे जीवन धैर्य, त्याग, करुणा आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या सर्वोच्च आदर्शांचे प्रतीक आहेत. त्यांचा जन्म इसवी सन 1 एप्रिल 1621 ...
Democracy : लोकशाही आणि चौथा आधारस्तंभ : आत्मपरीक्षणाची गरज

Democracy : लोकशाही आणि चौथा आधारस्तंभ : आत्मपरीक्षणाची गरज

नांदेड, लेख
लोकशाही ही केवळ निवडणुकांची प्रक्रिया नसून ती एक सुसंस्कृत, जबाबदार आणि संवेदनशील सामाजिक व्यवस्था आहे. ही व्यवस्था टिकवण्यासाठी आणि अधिक सक्षम करण्यासाठी तिचे चारही आधारस्तंभ भक्कम, निस्पृह आणि विश्वासार्ह असणे अत्यंत आवश्यक आहे. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था आणि चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे वृत्तपत्र व माध्यमे—हे चारही स्तंभ एकमेकांना पूरक ठरून लोकशाहीला स्थैर्य देतात. परंतु आज प्रश्न असा निर्माण होतो की, हे आधारस्तंभ खरोखरच मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का? आणि नसतील, तर त्याची जबाबदारी कोणाची? लोकशाही मजबूत करण्यासाठी तिच्या मुळाशी असलेले मूल्यसंवर्धन महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने शासन, संस्था, संघटना आणि समाजातील नेतृत्व करणारे घटक यांनी तटस्थपणे, दूरदृष्टीने प्रयत्न करणे अपेक्षित असते. मात्र वास्तव पाहता, विशेषतः चौथ्या आधारस्तंभाबाबत हे प्रयत्न अपुर...
Gangadhar Patane : गंगाधरराव म्हाळप्पा पटणे : एक पत्रकार, कर्तृत्ववान राजकीय व सामाजिक नेतृत्व

Gangadhar Patane : गंगाधरराव म्हाळप्पा पटणे : एक पत्रकार, कर्तृत्ववान राजकीय व सामाजिक नेतृत्व

नांदेड, लाइफस्टाइल, लेख
बिलोली तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक जीवनात दीर्घकाळ प्रभावी योगदान देणारे समाजवादी विचार- सरणीचे ज्येष्ठ नेते, पत्रकार आणि लोकप्रतिनिधी गंगाधरराव म्हाळप्पा पटणे यांचे अश्विनी हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बिलोली तालुक्याने केवळ एक माजी लोकप्रतिनिधी नाही, तर निर्भीड विचारांचा, तत्त्वनिष्ठ आणि जनसामान्यांशी घट्ट नाळ जुळवून ठेवणारा एक संवेदनशील नेतृत्वकर्ता गमावला आहे. गंगाधरराव पटणे यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. पत्रकारिता, राजकारण, समाजकारण आणि शिक्षण या सर्व क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांनी दैनिक मराठवाडा या वृत्तपत्रात बातमीदार म्हणून कार्य केले. त्याचप्रमाणे दैनिक प्रजावाणीमध्ये त्यांचे विचारप्रधान लिखाण नियमितपणे प्रकाशित होत असे. शब्दांमधून सत्य मांडण्याची, अन्यायावर बोट ठेवण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची त्यांची...
woman : ‘बाई’ या शब्दातून उमटणारी स्त्रीची सामाजिक ओळख

woman : ‘बाई’ या शब्दातून उमटणारी स्त्रीची सामाजिक ओळख

नांदेड, लेख
मराठी भाषेतील ‘बाई’ हा शब्द ऐकायला साधा, रोजच्या वापरातला वाटतो; पण तो जितका सहज आहे तितकाच तो अर्थछटांनी, सामाजिक संदर्भांनी आणि भावनिक पातळ्यांनी भरलेला आहे. हा शब्द केवळ एखाद्या स्त्रीसाठी वापरला जाणारा संबोधनवाचक शब्द नाही, तर तो समाजरचनेचा, संस्कृतीचा, स्त्रीच्या स्थानाचा आणि काळानुसार बदलत गेलेल्या मानसिकतेचाही आरसा आहे. शब्दार्थ आणि मूळ अर्थ - ‘बाई’ या शब्दाचा प्राथमिक अर्थ ‘स्त्री’ किंवा ‘महिला’ असा घेतला जातो. मराठी शब्दकोशानुसार ‘बाई’ म्हणजे स्त्रीलिंगी व्यक्ती, विशेषतः विवाहित स्त्री किंवा गृहिणी. ग्रामीण व पारंपरिक संदर्भात हा शब्द ‘पत्नी’, ‘घरातील स्त्री’, ‘सून’, ‘आई’ अशा भूमिकांशी सहज जोडला जातो. ‘अमुक तमुकाची बाई’ असा उल्लेख स्त्रीची स्वतंत्र ओळख कमी करून तिचे नाते पुरुषाशी जोडण्याची मानसिकता दर्शवतो. आदरार्थी आणि आपुलकीचा वापर -  इतिहासाकडे पाहिले तर ‘बाई’ हा शब्द अनेकदा ...
The journey of newspapers…till today! वृत्तपत्रांचा प्रवास…आजपर्यंतचा !

The journey of newspapers…till today! वृत्तपत्रांचा प्रवास…आजपर्यंतचा !

नांदेड, लेख
बदलत्या काळासोबत ज्याला बदलणे जमले त्यालाचा यश प्राप्त करणे सोपे असते. याचा व्यक्तीप्रमाणे माध्यम क्षेत्राचा विस्तार आणि आजची स्थिती याचं एक चिंतन आणि येणाऱ्या काळातील बदलाचा वेध आणि याचं निमित्त अर्थात दर्पण दिन. सिंधुदूर्ग जिल्ह्यात जन्म झालेल्या बाळशास्त्री जांभेकर यांचा कार्यालेख खरोखरच अफाट आहे. मराठी माणसांनी जन्म दिलेल्या दोन व्यवसायांनी नंतर उत्तुंग अशी भरारी घेतली. यात दर्पणकार जांभेकर यांनी मुहूर्तमेढ केल्यानंतर वृत्तपत्र व्यवसाय एक आहे. सोबत स्मरण करावे असा व्यवसाय म्हणजे दादासाहेब फाळके यांनी सुरू केलेला चित्रपट व्यवसाय याचीही आठवण आपण ठेवली पाहिजे. या दोन्ही व्यवसायांवर आज लाखो कुटूंबे अवलंबून आहेत. इतकेच नव्हे तर देशाला दिशा आणि नेतृत्व देणारी व्यक्तीमत्वे ही याचा मधून आपणासमोर आली आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी, संविधान देशाला देणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच देश...
Savitribai Phule : सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक

Savitribai Phule : सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक

नांदेड, लेख
भारतीय समाजाच्या इतिहासात सावित्रीबाई फुले यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे व प्रेरणादायी आहे. स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि मानवतावादी मूल्ये यासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या एक थोर समाजसुधारक, कवयित्री आणि परिवर्तनाच्या सर्वकालीन प्रतिक आहेत.ज्या काळात स्त्रीने शिकणे पाप मानले जात होते, त्या काळात त्यांनी शिक्षणाचा दिप प्रज्वलित करुन सामाजिक अज्ञानाच्या अंधाराला आव्हान दिले. स्वत:च्या आयुष्याला आकार देतानाच भारतीय स्त्री- शिक्षणाच्या पायाही त्यांनी घातला. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील हे शेतकरी होते. बालवयातच त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिरावांच्या परिवर्तनवादी झंझावाताला गती देणाऱ्या आद...
error: Content is protected !!