Friday, May 15

लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Barty : ‘बार्टी’ एक समता प्रस्थापित करणारी सामाजिक चळवळ!

Barty : ‘बार्टी’ एक समता प्रस्थापित करणारी सामाजिक चळवळ!

नांदेड, पुणे, लेख
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात 'बार्टी' या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त प्रशिक्षण व संशोधन संस्थेचा २२ डिसेंबर हा ४७ वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या कार्यावर टाकलेला प्रकाश महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अनेक चळवळी उदयास आल्या. काही काळापुरत्या, काही क्षणिक, तर काही दीर्घकाल टिकून राहणाऱ्या. पण बार्टी, अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ही संस्था नव्हे तर ती एक समता प्रस्थापनेसाठी जणू चळवळ म्हणून काम गेल्या ४७ वर्षापासून अनुसूचित जातींसाठी काम करीत आहे आहे. ही संस्था केवळ एका विषयापुरती मर्यादित नाही; तर शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, लेखन, मूल्यमापन, सामाजिक न्याय, समता आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवन यांचा संगम आहे. त्यामुळेच "बार्टी" ही संस्था नसून एका विचारसरणीची सतत चालती-बोलती मोहीम आहे. बार्...
Unique Latur Pattern : अनोखा लातूर पॅटर्न : ‘वेळ अमावस्या’-मातीशी नाळ जोडणारा लोकोत्सव!

Unique Latur Pattern : अनोखा लातूर पॅटर्न : ‘वेळ अमावस्या’-मातीशी नाळ जोडणारा लोकोत्सव!

लातूर, लेख
मराठवाड्याचे ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळी लातूरच्या कृषी संस्कृतीला तंतोतंत लागू पडतात. ते म्हणतात, "काळ्या आईची कुशी, पिकं जोमाने डुलती, माझ्या राजाचं हे रान, जणू हिरवं सोनं..." या ओळींचा खरा प्रत्यय लातूरच्या 'वेळ अमावस्येला' येतो. हा केवळ एक सण नाही, तर हा मातीशी नाळ जोडणारा एक महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तावेज आहे. मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येला सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत संपूर्ण लातूर जिल्हा शेतात असतो, निसर्गाच्या ऋणाचा हा उत्सव मोठ्या उत्साहात येथे साजरा केला जातो.  येळवस, दर्शवेळ किंवा वेळ अमावस्या अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सणाची परंपरा तब्बल सातशे वर्षांची आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचा हा भाग पूर्वी निझाम राजवटीत असल्याने येथे कानडी भाषेचा प्रभाव आजही जाणवतो. कानडीत 'वेल्ली' म्हणजे पीक. पिकांची पूजा म्हणून हा शब्द रूढ झाला असावा. तसेच...
Malegaon Yatra.. A joyful gathering of life : माळेगाव यात्रा.. जीवनाचा आनंदायी मेळा

Malegaon Yatra.. A joyful gathering of life : माळेगाव यात्रा.. जीवनाचा आनंदायी मेळा

नांदेड, लेख
बदलत्या जीवन व्यवस्थेत खेडोपाडी,वाडीतांड्यावरच ही सोशल मिडिया,फेसबुक,व्हॉटसअप , रिल्सने आपले जीवन कोंडून टाकले आहे. अशा आत्ममग्न व्यवस्थेत मनाला निखळ आनंद आणि जीवनाचा तणाव दूर व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील असतो. धावपळीच्या काळात माळेगावच्या खंडोबारायाची यात्रा ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवविते. हा आनंददायी मेळा मनसोक्त निखळ मौज मस्ती घडविणारा आहे. मराठवाड्याचे भूमिपुत्र लोकनेते स्व विलासराव देशमुख यांचे कुलदैवत खंडोबा .त्यांच्याच राजाश्रयामुळे ही यात्रा राज्याच्या नकाशावर आली. दिनांक १८ डिसेंबर पासून यात्रेला देवस्वारी व पालखी पुजनाने प्रारंभ होईल, दिनांक १९ डिसेंबर पशु, अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धाचे उद्घाटन, दिनांक २० डिसेंबर - कृषिनिष्ठ शेतक-यांचा सत्कार (दुपारी ३ वाजता) दिनांक २२ तारखेला दुपारी एक वाजता लावणी महोत्सव२३ डिसेंबर कला महोत्सवाने समारोप होईल. पण पुढे पंधरा -व...
Malegaon Yatra : माळेगाव यात्रा ग्रामीण संस्कृतीची प्रयोगशाळा !

Malegaon Yatra : माळेगाव यात्रा ग्रामीण संस्कृतीची प्रयोगशाळा !

नांदेड, लेख
मराठवाडा संतांची, वीरांची भूमी आहे. याच भूमीतील नांदेड जिल्ह्यात माळेगाव आहे. लोहा तालुक्यातील या गावात मोठी यात्रा भरते. ही यात्रा मार्गशीर्ष अमावास्येला सुरू होते. दक्षिण भारतात ही यात्रा अत्यंत प्रसिद्ध आहे. माळेगाव केवळ धार्मिक स्थळ नाही. ते ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारे मोठे व्यापारी केंद्र आहे. या यात्रेला आजपासून (ता. 18 ते 25 डिसेंबर) सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने या यात्रेवर प्रकाश टाकणारा हा लेख. माळेगाव यात्रेला जवळपास चार शतकांची परंपरा आहे. मोगल, निजाम काळापासून या यात्रेला अनन्य साधारण महत्त्व आहे. ऐतिहासिक काळापासून माळेगाव घोड्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. आजही तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील व्यापारी येथे येतात. या ठिकाणी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाचे देखणे, सुंदर असे मंदिर आहे. माळेगाव यात्रा म्हणजे लोककलांचे माहेरघरच. येथे कलगी-तुरा, वाघ्या...
Air services : मराठवाड्यातील विमानसेवा तोटयात , तरीही नवीन सेवा

Air services : मराठवाड्यातील विमानसेवा तोटयात , तरीही नवीन सेवा

नांदेड, मराठवाडा, लेख
छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानसेवेला मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी प्रतिसाद आहे. तेथून विमानाने प्रवास करणारे प्रवासी दहा टक्क्यांनी कमी झाले आहेत. तरीदेखील विमान कंपन्यांनी नांदेड - मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. मराठवाड्यात दळणवळणाच्या साधनेत यामुळे भर पडत आहे . परंतु भविष्यात नांदेड - मुंबई विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर कदाचित ती विमानसेवा दीर्घकाळ चालेल की नाही, याबद्दल शंका आहे. एकीकडे वंदे भारत रेल्वेला नांदेडपर्यंत चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने छत्रपती संभाजीनगर वासियांनी याबद्दल उघड उघड टीका सुरू केली आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी नवीन वंदे भारत छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अशी सुरू करण्याची जोरदार मागणी चालविली आहे . त्यामुळे त्यांच्या या मागणीला केंद्रीय स्तरावरून पाठिंबा मिळत आहे. असे झाले तर नांदेड...
new criminal laws : नवीन फौजदारी कायद्यांचे प्रदर्शनातील प्रात्याक्षिकाद्वारे ज्ञान..!

new criminal laws : नवीन फौजदारी कायद्यांचे प्रदर्शनातील प्रात्याक्षिकाद्वारे ज्ञान..!

नांदेड, मुंबई, लेख
देशात 1 जुलै 2024 पासून भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय पुरावा कायदा हे तीन नवीन कायदे लागू झाले आहेत. या नवीन फौजदारी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना गुन्हा घडल्यापासून अंतिम शिक्षा होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया समजावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात  प्रात्यक्षिक विशेष आकर्षण ठरले.  या प्रात्यक्षिक प्रदर्शनाने गुन्हा नोंदणीपासून शिक्षा आणि पुनर्वसनापर्यंतचा संपूर्ण न्यायप्रक्रियेचा प्रवास अत्यंत स्पष्ट, जिवंत आणि लोकशिक्षणात्मक स्वरूपात मांडला आहे. नवीन फौजदारी कायद्यांमुळे  वैज्ञानिक तपास, तत्काळ प्रतिसाद, डिजिटल पुरावे, कठोर शिक्षा आणि पीडित केंद्रित न्याय या तत्त्वांना प्राधान्य मिळाले आहे. हे प्रदर्शन जनजागृतीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरले आहे. प्रदर्शनात 25 ते 30 हजार नागरिकांनी भेट देऊन या कायद्यांसंदर्भातील ज्ञान अवगत केले. भारताच्या न्य...
Hind Di Chadar : हिंद दी चादर : धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच !

Hind Di Chadar : हिंद दी चादर : धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच !

नांदेड, लेख
धर्म, राष्ट्र, आणि मानवतेसाठी जीव अर्पण करणाऱ्यांचे स्थान इतिहासात सदैव अमर राहते. अशा तेजस्वी व्यक्तींच्या जीवनातून मानवतेचा प्रकाश झळकतो. त्या अमर गाथांपैकीच एक प्रेरणादायी कथा म्हणजे हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांची आहे. ज्यांना संपूर्ण जग ‘हिंद दी चादर’, म्हणजेच भारतभूमीचे कवच म्हणून ओळखते. त्यांनी धर्म स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान भारतीय संस्कृतीतील अतुलनीय अध्याय आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा जन्म १ एप्रिल १६२१ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील गुरु हरगोबिंद साहिब हे शीख धर्माचे सहावे गुरु होते. त्यांच्या आईचे नाव माता नानकी देवी असे होते. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे बाल्यावस्थेतील नाव त्यागमल होते; पण युद्धभूमीवरील त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे वडिलांनी त्यांना तेग बहादुर म्हणजे ‘तलवारीसारखा धैर्यवान’ अ...
Struggle : संघर्षाची ज्योत — गोविंद मुंडकर

Struggle : संघर्षाची ज्योत — गोविंद मुंडकर

नांदेड, लेख
आजच्या समाजव्यवस्थेचा आणि राजकारणाचा चेहरा पाहताना एक कटू पण निर्विवाद सत्य डोळ्यांसमोर येते — सत्याची लालसा हरवली आहे, आणि असत्याच्या आधारावर यश मिळविण्याची प्रवृत्ती प्रतिष्ठेचे प्रतीक झाली आहे. सत्य हरवले, असत्य तेजीत सत्याची ओढ कमी झाल्यामुळे लोकांनी असत्याच्या छायेखाली सुख शोधण्यास सुरुवात केली आहे. सत्याचा मार्ग काटेरी असतो, त्यावर चालण्यासाठी धैर्य लागते; आणि ते धैर्यच आज लोप पावत आहे. असत्याची कामना माणसाला सत्याचा सामना करू देत नाही. सत्याने जिंकण्याची इच्छा मावळली आणि जिंकण्यासाठी असत्याचा सहारा घेण्याची प्रवृत्ती वाढली, हेच आजच्या राजकारणाचे चित्र आहे. बलदंडांची हतबलता — परिस्थितीसमोर शरणागती जे लोक समाजाचे मार्गदर्शक व्हावेत, तेच आता परिस्थितीसमोर हात टेकताना दिसतात. बलदंड मंडळी सुद्धा “अयोग्य मार्गाशिवाय पर्याय नाही” अशी भूमिका घेताना दिसतात. यामुळे सर्वच स्तरावर ह...
PCPNDT Act : पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे

PCPNDT Act : पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे

नांदेड, लेख
गर्भलिंग निवड - पोटातील गर्भाचं लिंग जाणून घेणं आणि जर ती मुलगी असेल तर गर्भपात करणं म्हणजे गर्भलिंग निवड  गेल्या काही वर्षात गर्भाचं लिंग जाणून घेण्यासाठी सर्वात जास्त वापरलं जाणारं तंत्रज्ञान म्हणजे अल्ट्रासाउंड सोनोग्राफी आणि मुलगी असेल तर नंतर गर्भपात १९८० नंतर सोनोग्राफीचं तंत्रज्ञान सर्वदूर पसरलं,परिणामी गर्भलिंग निदानात वाढ झाली आणि ०-६ वयातील मुलींची संख्या झपाट्याने खालावू लागली. ०-६ वयोगटातील लिंग गुणोत्तर ०-६ वयोगटातील दर हजार मुलांमागे असणारी मुलीची संख्या मोजून लिंग गुणोत्तर काढलं जातं. भारतामध्ये हे गुणोत्तर दिवसेंदिवस विषम होत आहे. २०१९ मधील ९२० पासून २०२३ मधील ९०७ पर्यंत मुलींची संख्या कमी झाली आहे. जगभरातले अनुभव पाहता स्वाभाविक लिंग गुणोत्तर १५० हुन जास्त हवे. ही तफावत पाहता गर्भलिंग निदान आणि मुलीकडे केलं आणारं दुर्लक्ष यामुळे मुलींची संख्या घटत आहे हे दिसतं...
Who should activists fight for? कार्यकर्त्यांनी लढायचे कोणासाठी?

Who should activists fight for? कार्यकर्त्यांनी लढायचे कोणासाठी?

नांदेड, राजकीय, लेख
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता "बौद्धिक क्षमता, विचारसरणी आणि सामाजिक बांधिलकी" या संकल्पना आता कालबाह्य होत चालल्या आहेत. एकेकाळी पक्षासाठी आयुष्य घालवणारा, गावोगावी जनतेच्या समस्या सोडवणारा आणि आपल्या विचारांवर ठाम राहणारा कार्यकर्ता आजच्या व्यवस्थेत अप्रासंगिक ठरत आहे. निवडणुकीच्या मैदानात आता विचार, प्रामाणिकपणा किंवा जनसेवा नव्हे—तर पैसा, थाट, लवाजमा आणि गुंडगिरी या गोष्टीच राजकारणाचे नवे मापदंड बनले आहेत. आज कार्यकर्त्यांचा वापर फक्त संख्याबळ वाढवण्यासाठी, सभांमध्ये घोषणाबाजी करण्यासाठी आणि नेत्याचे गुणगान गाण्यासाठीच मर्यादित राहिला आहे. प्रचार-प्रसार ही गोष्ट आता “इव्हेंट मॅनेजमेंट”च्या बाजारपेठेत गेलेली आहे. जनतेला आकर्षित करण्यासाठी गर्दी भाड्याने आणणारे लोक, भाषणांना टाळ्या पिटण्यासाठी तयार असलेले समूह — हे सर्व पैशावर उपलब्ध आहे. या सर्व बदलांच्या पार्श्वभूमीवर, खऱ्या अर्...
error: Content is protected !!