हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच मा. श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून हदगाव येथे भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


आजच्या मराठवाड्यातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती पाहता अशा सामुदायिक विवाह सोहळ्यांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. दुष्काळ, शेतीतील अनिश्चितता, वाढते आर्थिक संकट, बेरोजगारी आणि विवाहासाठी होणारा प्रचंड खर्च यामुळे अनेक कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण निर्माण होतो. अनेक गरीब, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य कुटुंबांना आपल्या मुला-मुलींचे विवाह सन्मानाने पार पाडणे कठीण जाते.


अशा वेळी सामुदायिक विवाह ही केवळ एक सामाजिक परंपरा नसून, ती समाजाला दिलासा देणारी आणि आर्थिक बचतीची प्रभावी चळवळ ठरते. कमी खर्चात, सन्मानाने आणि सामाजिक साक्षीने विवाह संपन्न होत असल्याने नवदांपत्याला नव्या आयुष्याची सुरुवात अधिक आत्मविश्वासाने करता येते.



शिवसेना पक्ष नेहमीच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्याच्या सुख-दुःखात सहभागी राहिली आहे. बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिलेला समाजहिताचा विचार आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाची भूमिका याच भावनेतून हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत आहे.
मा. आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम केवळ विवाह सोहळा नसून, तो सामाजिक समतेचा, आर्थिक सक्षमीकरणाचा आणि मानवतेचा उत्सव ठरणार आहे. या पवित्र आणि मंगल प्रसंगी सर्व समाजबांधवांनी सहभागी होऊन नवदांपत्यांना आशीर्वाद द्यावेत, हीच नम्र विनंती.
— मा. बाबुराव कदम कोहळीकर, आमदार, हदगाव-हिमायतनगर विधानसभा, तथा शिवसेना पक्ष






