Friday, May 15

लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Marathwada shaken : लाचखोर आयुक्तांमुळे मराठवाडा हादरला 

Marathwada shaken : लाचखोर आयुक्तांमुळे मराठवाडा हादरला 

नांदेड, लेख
मराठवाड्यातील जालना जिल्हा गेल्या वर्ष - दीड वर्षापासून सातत्याने चर्चेत आहे . मराठा - ओबीसी संघर्षाची सुरुवात देखील याच जालना जिल्ह्यातून झाली . त्यानंतर सबंध राज्यात या आंदोलनाची धग  पोहोचली. त्यामुळे जालना जिल्हा हा राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा जिल्हा राहिला. आता जालन्यातील मनपा आयुक्तांना दहा लाख रुपयांची लाच घेताना पकडल्याने मराठवाडाच राज्याच्या चर्चेत आला. जालनातील लाचखोर आयुक्तांमुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर या भ्रष्टाचाराची चर्चा रंगली. महापालिका आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना दहा लाख रुपयांची लाच घेताना पकडल्याचे हे मराठवाड्यातील पहिलेच प्रकरण आहे. शासन मराठवाड्यात वेगवेगळ्या योजना राबवून विकासाला हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनही हात मोकळे सोडून पैसा खर्च करत आहेत. पैसा म्हटले की, शासकीय यंत्रणा आलीच. परंतु शासकीय यंत्रणेला हलविण्यासाठी ‘गांधींजी...
The wounds of the flood and the tears of the river! महापूराच्या जखमा अन् नदीचे अश्रू!

The wounds of the flood and the tears of the river! महापूराच्या जखमा अन् नदीचे अश्रू!

लेख, नांदेड
पैसा नको, संपत्ती नको अंग झाकण्याएवढे कपडे द्या पाटी नको, दप्तर नको पोटाला लागेल तेवढी भाकरी द्या नको मदत मुख्यमंत्री साहेबांची साहेब जीव वाचवून द्या साहेब जीव वाचवून द्या... न्यूज चॅनलवर एका 7 ते 8 वर्षाच्या चिमुकलीची मुलाखत बघितली अन् मन सुन्न झालं. त्या चिमुकीने अश्रू गाळत, हुंदके देत साहेब जीव वाचवून द्या... हेच तिचे वाक्य... ऐकताना मुलाखत घेणार्‍यालाही अश्रू अनावर झाले. त्याचेही मन भरुन आले. त्या चिमुकलीची कशी समजुत काढावी हेही त्याला समजत नव्हतं. सुंदर गाव, बैलांच्या गळ्यातील घुंगरमाळांचा मंजुळ आवाज, शेणामातीनं सारवलेल्या भींती व अंगण, ढाळजात बसलेले आजी- आजोबा, बैलांना घेऊन निघालेले शेतकरी, शेतात स्वतःच्याच तोर्‍यात डोलणारे पीक, कामात व्यस्त असणारी आमची माय- बहीण, शाळेच्या तयारीत असणारे आमचे लाडके चिमुकले अशी दिनचर्या सुरु असताना रात्रीतून अश्रूमय करणारी विदारक परिस्थिती. स...
Worship of Shri Durga Devi : श्री दुर्गादेवीची उपासना

Worship of Shri Durga Devi : श्री दुर्गादेवीची उपासना

नांदेड, धार्मिक, लेख
प्रस्तावना - आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे साधना चांगली होण्यास साहाय्य होते. हा उद्देश लक्षात घेऊन श्री दुर्गादेवी या देवतेची काही वैशिष्ट्ये आणि तिच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहितीचा या लेखामध्ये समावेश करण्यात आला आहे  सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तुते ।। श्लोकाचा  अर्थ : सर्व मंगलकारकांची मंगलस्वरूप असणारी; स्वतः कल्याणकारी शिवरूप असणारी; धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष (टीप) हे चारही पुरुषार्थ साध्य करून देणारी; शरण जाण्यास योग्य असणारी; त्रिनेत्रयुक्त असणारी; अशा हे नारायणीदेवी, तुला माझा नमस्कार असो. भक्तांच्या  हाकेला  धावून येणारी  देवी !-  सर्वस्वरूपी, विश्वस्वामीनी, सर्वसामर्थ्यशाली, अशा आई जगदंबेने कार्यान...
Close these toll booths : बंद करा हे टोलनाके आणि टोलगुंडागर्दी..!

Close these toll booths : बंद करा हे टोलनाके आणि टोलगुंडागर्दी..!

नांदेड, मुंबई, लेख
टोलनाक्यावर होणारी गुंडागर्दी ही नवीन नाही. त्यात घट नाही तर वाढ होत चालली आहे. आता पत्रकारांनाही या टोलगुंडागर्दीचा सामना करावा लागत आहे. याचा राज्यकर्त्यांनी अत्यंत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, नसता लोकशाहीचा हा चौथा स्तंभ धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. थोडीशी गुंतवणूक करुन जनतेला अनेक वर्ष हजारो पटीत लुटण्याचा सरकारी परवाना ज्यांना मिळतो ते मस्तीला येणारच. टोलवसुलीसाठी ते आपल्या पदरी गुंडांना बाळगणारच. शेवटी पैसा बोलता है. पैसे वसुली करीत असतांना अरेरावी करणे, उद्धट बोलणे, दादागिरी करणे, अंगावर धावून येणे, मारहाण करणे असे प्रकार रोज कुठे ना कुठे टोलनाक्यावर घडत असतात. त्यात सामान्य जणांबरोबर कर्मचारी, अधिकारी, पुढारी, व्यापारी, शेतकरी आणि पत्रकारही भरडल्या जात असतील तर सरकार हे टोलनाके का बंद करीत नाहीत ? टोलधाडीच्या या वाढत जाणाऱ्या गुंडगिरीसमोर सरकार गुडघे का टेकत आहे ? परव...
Kalinka Mata Temple : ३४६ वर्षांचा वारसा जपणारे वाढोण्याचे कालिंका माता मंदिर

Kalinka Mata Temple : ३४६ वर्षांचा वारसा जपणारे वाढोण्याचे कालिंका माता मंदिर

नांदेड, धार्मिक, लेख
हिमायतनगर (वाढोणा) तालुक्यातील वाढोणा हे छोटेसे गाव, परंतु येथे उभे असलेले कालिंका माता मंदिर भक्तांसाठी प्रचंड आकर्षणाचे केंद्र आहे. यावर्षी या मंदिराला स्थापनेची तब्बल ३४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश तसेच विदर्भ-मराठवाड्यातील भाविकांसाठी हे मंदिर श्रद्धेचे एक प्रमुख शक्तीपीठ मानले जाते. स्थापत्य आणि इतिहास वाढोण्याच्या उत्तरेस असलेल्या या मंदिराचा इतिहास चालुक्यकालीन वारशाशी जोडलेला आहे. हेमाडपंथी शैलीतील शिळांवरून मंदिराची प्राचीनता स्पष्ट होते. सन १६७९ मध्ये कोळसेगिरी ऋषींच्या मार्गदर्शनाखाली एका वडाच्या झाडाखाली दडलेली अष्टभुजाधारी काळ्या पाषाणातील मूर्ती शोधून काढली. गावकऱ्यांनी हेमाडपंथी मंदिर उभारून तिची प्रतिष्ठापना केली आणि तेव्हापासून हे ठिकाण ‘कालिंका माता मंदिर’ म्हणून प्रसिद्ध झाले. मूर्तीचे वैशिष्ट्य पाच फूट तीन इंच उंच व तीन फूट रुंद अशी ...
animal husbandry in agriculture : पशुपालनास कृषी समकक्ष दर्जा – ऐतिहासिक निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

animal husbandry in agriculture : पशुपालनास कृषी समकक्ष दर्जा – ऐतिहासिक निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

नांदेड, कृषी, मुंबई, लेख
पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा देण्याची अनेक पशुपालकांबरोबरच राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आग्रही मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी या मागणीला सकारात्मक पाठिंबा दर्शविला आणि पावसाळी अधिवेशनात पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय हा लोकाभिमुख असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वांत मोठ्या कृषिप्रधान राज्यांपैकी एक आहे. राज्यातील सुमारे ५५ टक्के लोकसंख्या थेट शेतीवर आणि संबंधित व्यवसायांवर अवलंबून आहे. शेतीसोबतच पशुपालन हे देखील शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थ...
Peace of ancestors : पितरांच्या शांतीसाठी विविध देशांमध्ये करण्यात येणार्‍या पारंपरिक कृती !

Peace of ancestors : पितरांच्या शांतीसाठी विविध देशांमध्ये करण्यात येणार्‍या पारंपरिक कृती !

लेख
‘पितृपक्षात ‘श्राद्ध-पिंडदान’ हे पितृऋण फेडण्याचे एक माध्यम आहे. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध.’ श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. असे असले, तरी हिंदुविरोधक त्यावर ‘श्राद्ध म्हणजे ब्राह्मणांची पोटे भरण्यासाठीची सोय, तसेच मृत्यूनंतर पितरांसाठी दान-विधी करण्यापेक्षा गरिबांची सेवा करा, त्यांना अन्नदान करा’, असे म्हणून टीका करतात. पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संकल्पना केवळ भारतातच नाही, तर विदेशांतही पितरांच्या शांतीसाठी विविध पारंपरिक कृती करण्यात येतात. त्यांत पूर्वजांच्या मुक्तीसाठीची शास्त्रोक्त संकल्पना नसली, तरी किमान ‘पूर्वजांविषयी कृतज्ञ रहायला हवे’, एवढी भावना तर निश्चितच असते. तसेच विदेशात अन्य पंथांत जन्मलेले अनेक ...
Pasha Patel – पृथ्वीच्या रक्षणासाठी आणि मानवजातीच्या अस्तित्वासाठी बांबू-आधारित शाश्वत विकासाची गरज – पाशा पटेल

Pasha Patel – पृथ्वीच्या रक्षणासाठी आणि मानवजातीच्या अस्तित्वासाठी बांबू-आधारित शाश्वत विकासाची गरज – पाशा पटेल

नांदेड, लेख
"पृथ्वी आज अभूतपूर्व पर्यावरणीय संकटांचा सामना करत आहे. जगभरातील जंगलातील आगी व ढगफुटी यामुळे हे वातावरण बदलाचे नैसर्गिक संकट प्रत्यक्षात दिसून येत आहे. अशा परिस्थितीत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी बांबू हा "कल्पवृक्ष" म्हणून शाश्वत विकासाचा मार्ग सुचवला आहे. बांबूच्या अतिशीघ्र वाढीमुळे कार्बन शोषण, जंगलतोड रोखणे, आणि जैवइंधन निर्मिती शक्य आहे. 18-19 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईत आंतरराष्ट्रीय बांबू परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद या संकटांना तोंड देण्यासाठी नव्या दिशा दाखवेल, या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह तज्ञ, शास्त्रज्ञ, आणि शेतकरी सहभागी होणार आहेत." पर्यावरणीय संकटाचा वाढता धोका मनुष्य प्राण्याला पृथ्वीवर सुखा-समाधानाने जगण्यासाठ...
Shakti Sadan : निराधार महिलांसाठी ‘शक्ती सदन’चा आधार 

Shakti Sadan : निराधार महिलांसाठी ‘शक्ती सदन’चा आधार 

नांदेड, लेख
महाराष्ट्र कल्याणकारी राज्य म्हणून ओळखले जाते. महिला सक्षमीकरण, सबलीकरणात आपले राज्य देशात अव्वल आहे. महिलांना शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्रात शासनाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात महिला नेतृत्वक्षम व्हाव्यात यासाठी देखील विविध उपाययोजना राबविल्या जात आहे.  या योजनांच्या माध्यमातून आपल्या राज्यातील महिलांचे शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे. महिला सक्षमीकरणाचा  समृद्ध वारसा आपल्या राज्याला आहे. हा वारसा राज्य शासन पुढे नेत असून महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबवित आहे, त्यापैकी एक म्हणजे  'शक्ती सदन योजना'  आहे. या योजनेमुळे निराधार महिलांना राज्यशासनाने 'शक्ती सदन'चा आधार दिला असल्याची भावना महिलांमध्ये आहे. या योजनेमुळे निराधार महिलांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होत असून शासनाची ही ...
State Festival: Ganesh Chaturthi : राज्य महोत्सव : गणेशोत्सव

State Festival: Ganesh Chaturthi : राज्य महोत्सव : गणेशोत्सव

नांदेड, मुंबई, लेख
गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अतिशय उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा महत्त्वपूर्ण सण आहे. श्री गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धीचे दैवत व मंगलकार्याचे अधिपती मानले जातात. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यचळवळीच्या काळात या उत्सवाला सार्वजनिक रूप दिले. त्यामागचा उद्देश समाजातील एकता वाढवणे व स्वराज्याच्या लढ्यासाठी लोकांना एकत्र आणणे हा होता. त्यामुळे गणेशोत्सवाला सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकही महत्त्व प्राप्त झाले. गणेशोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव नसून तो समाजाला एकत्र बांधणारा, संस्कृती जपणारा आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उत्सव आहे.  गणेशोत्सवाच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन, त्यावर आधारित विविध उद्योग व  व्यवसाय यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळते. राज्याची परंपरा व संस्कृती जपली जाते. ही परंपरा आणि  संस्कृती अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी राज्याचे ...
error: Content is protected !!