Wednesday, May 20

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Nana Patole ; काँग्रेसची ९६ जागांवरची चर्चा पूर्ण; जागा वाटपावर उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा: नाना पटोले – NNL

Nana Patole ; काँग्रेसची ९६ जागांवरची चर्चा पूर्ण; जागा वाटपावर उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा: नाना पटोले – NNL

नांदेड, मुंबई
मुंबई/नवी दिल्ली | महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शिवसेना आघाडीतून बाहेर पडणार या बातम्यात काहीही तथ्य नाही, भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबद्दल गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव होईल. पराभवाच्या भितीने भाजपा अशी खेळी करत आहे. काँग्रेस कडूनही अशा पद्धतीचे कोणतेही विधान केलेले नाही. महाविकास ...
only Veerashaiva Lingayat Samaj candidate : विधानसभा निवडणूकीत सरकारला धडा शिकवा फक्त वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारालाच निवडून द्या – NNL

only Veerashaiva Lingayat Samaj candidate : विधानसभा निवडणूकीत सरकारला धडा शिकवा फक्त वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारालाच निवडून द्या – NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| आगामी विधानसभा निवडणूक -२०२४ लक्षात घेता आपल्याला अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघातर्फे सर्वच राजकीय पक्षांकडे विशेष मागणी करणे आवश्यक आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही वीरशैव लिंगायत समाजाला विद्यमान सरकारने वाटाण्याच्या अक्षता दिल्यात व सर्वच निवेदनांना केराची टोपली दाखवली त्यामुळे फक्त वीरशैव लिंगायत समाजाचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभे असतील त्यांना मतदान करावे असे आवाहन डॉ. विजय जंगम यांनी केले आहे. आचारसंहीता लागू होण्यापूर्वी विद्यमान सरकारने जवळपास ८० पेक्षा जास्त शासननिर्णय लागू केलेत मात्र यावेळी वीरशैव लिंगायत समाजाच्या एकाही मागणीचा विचार केला गेला नाही. सुरुवातीपासूनच अ भा वी लिं महासंघाची स्पष्ट व ठाम भूमिका आहे की कोणत्याही राजकीय पक्षाला थेट पाठींबा देता येणार नाही. समाजाला गृहीत धरुन एकगठ्टा मतांचा घोडेबाजार खपवून घेतला जाणार नाही, ही गोष्ट महासंघाच्या सर्वच पदाधिकार...
C-Vigil app : सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ५७६ तक्रारी प्राप्त; यापैकी ५६३ निकाली -NNL

C-Vigil app : सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ५७६ तक्रारी प्राप्त; यापैकी ५६३ निकाली -NNL

क्राईम, मुंबई
मुंबई| राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते 19 ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 576 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 563 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण 98 टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या असल्याची माहिती, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली. सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्यानुसार राज्यातील शासकीय जागेतील 2 लाख 42 हजार 634, सार्वजनिक जागेतील 2 लाख 79 हजार तर खाजगी जागेतील विनापर...
damage caused due to return rains : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी -NNL

damage caused due to return rains : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी -NNL

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसापरतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मराठवाडा आदी विविध भागातील विविध जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये मागील काही दिवसात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतात काढून ठेवलेल्या विविध प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले ...
Ramesh Chennith ; मविआत कोणतेही मतभेद नाहीत; एक-दोन दिवसात जागा वाटपही पूर्ण होईल: रमेश चेन्नीथला – NNL

Ramesh Chennith ; मविआत कोणतेही मतभेद नाहीत; एक-दोन दिवसात जागा वाटपही पूर्ण होईल: रमेश चेन्नीथला – NNL

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई | महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, विधानसभेच्या निवडणुका मविआ एकत्रच लढवणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यातही वाद नाहीत. तिन्ही पक्ष मिळून जागा वाटपाची चर्चाही सुरु आहे, जागा वाटपाची ही चर्चा एक दोन दिवसात पूर्ण होईल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची व महाविकास आघाडीची प्रकृत्तीही उत्तम आहे असेही चेन्नीथला यांनी सांगितले. प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीवर सकाळी भेट घेतली त्यावेळी त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते, यावेळी त्यांच्याबरोबर CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, शिवसेना खा. संजय राऊत उपस्थित होते. त्यानंतर चेन्नीथला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच...
Nana Patole : मविआच्या मतदारांची नावे यादीतील वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र; हिम्मत असेल तर समोर येऊन लढा: नाना पटोले -NNL

Nana Patole : मविआच्या मतदारांची नावे यादीतील वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र; हिम्मत असेल तर समोर येऊन लढा: नाना पटोले -NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करत आहेत. ऑनलाईन फॉर्म ७ च्या माध्यमातून मविआच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून वगळली जात आहेत, यामागे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस आहेत असा गंभीर आरोप करून रडीचा डाव खेळू नका, हिम्मत असेल तर आमने सामने लढा, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. शिवालय येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व त्यांचे सहकारी पक्ष पराभवाच्या भितीने षडयंत्र करत आहेत. निवडणूक आयोग मोदीशाह यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे. हे लोकशाहीला काळीमा फासणारे आहे, आयोगाच्या कामात सरकारचा हस्तक्ष...
Election restrictions : निवडणुकीच्या अनुषंगाने विविध बाबींवर निर्बंध; आचारसंहितेत काय करावे काय न करावे जाणून घ्या ! -NNL

Election restrictions : निवडणुकीच्या अनुषंगाने विविध बाबींवर निर्बंध; आचारसंहितेत काय करावे काय न करावे जाणून घ्या ! -NNL

महाराष्ट्र, मुंबई
नांदेड| जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 व 16 नांदेड लोकसभा पोटनिवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारतीय  नागरीक  संरक्षण  संहिता 2023 चे कलम 163 अन्‍वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निवडणुकीच्या कालावधीमध्‍ये जिल्‍हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसिल कार्यालये आणि सर्व शासकीय कार्यालये व विश्रामगृहे या ठिकाणी पुढील बाबी करण्‍यास विविध आदेशान्‍वये बंदी घातली आहे. विश्रामगृहावर बैठका बंद -  कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक/मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, सत्‍याग्रह करणे. कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने, इत्‍यादी. कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यावर बंदी आहे. लाऊडडस्पिकर परवानगीशिवाय नाही -कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था पक्ष कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपकाचा (लाऊडस्पिकरचा) वापर सक्षम पोलीस अधिका-यांच्‍या पुर्व परवानग...
Chief Electoral Officer S.Chokkalingam : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज मतदानाचा टक्का वाढवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम -NNL

Chief Electoral Officer S.Chokkalingam : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज मतदानाचा टक्का वाढवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम -NNL

महाराष्ट्र, मुंबई
मुबंई| भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये   दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी एका टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज असून मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी येथे केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमा संदर्भात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड उपस्थित होते. अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना  दि. 19 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी अद्याप उपलब्ध असून ऑफलाईन तसेच ऑनलाईन दो...
Maharashtra Assembly Election  : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; २० नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यात मतदान होणार -NNL

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; २० नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यात मतदान होणार -NNL

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार २० नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यात मतदान होणार असून, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर आज विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसह ४८ विधानसभा आणि २ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात आणि झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पह...
Chief Minister Eknath Shinde : शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास शासनाचे प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास शासनाचे प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

करियर, मुंबई
मुंबई| दि. १४ : शासन विविध योजनांच्या माध्यमातून शाळांमध्ये बदल घडवित असून त्यांचा दर्जा सुधारत आहे. मुलांना जीवनाशी निगडित बाबी शिकविण्याचा प्रयत्न केला जातोय. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला देखील मोठा प्रतिसाद मिळाला असून या अभियानातून विद्यार्थीपूरक बदल घडत आहेत, असे सांगून शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास प्राधान्य दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. व्यक्तिमत्व विकासास चालना देणारे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. हा पारितोषिक वितरण समारंभ एनसीपीएच्या भाभा सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांचे अभिनंदन केले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव आय.ए...
error: Content is protected !!