HomeमुंबईAmit Deshmukh : विधानसभेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचा सरकारच्या कारभारावर...

Amit Deshmukh : विधानसभेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचा सरकारच्या कारभारावर घणाघात

मुंबई| महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट झाली आहे त्यामुळे या परिस्थितीत कसे जगावे हा शेतकरी आणि सामान्य माणसांसमोर प्रश्न पडला आहे असे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख (Former minister MLA Amit Deshmukh attacks government’s governance in the Assembly) यांनी विधानसभेत बोलताना म्हटले आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरू आहे, पवनचक्की बसवणाऱ्या कंपनीकडून धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना मारहाण होत असून, पोलीस अधिकारीही शेतकऱ्याऐवजी कंपनीच्या लोकांना पाठीशी घालत असल्याची चर्चा आज विधानसभेत उपस्थित झाली तेव्हा शासनाकडे यासंबंधीची कसलीच माहिती उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.

या संदर्भाने सुरू असलेल्या चर्चेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सहभाग घेतला. पवनचक्की बसवणाऱ्या कंपनीकडून महाराष्ट्रात शेतकऱ्यांची अडवणूक होतेय, पिळवणूक होतेय, त्यांना मारहाण होतेय, जे हे सर्व करतायेत त्यांना पोलीस अधिकारी पाठीशी घालतायेत, यासंबंधी कुठलीच माहिती शासनाकडे उपलब्ध नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे असे नमूद करून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे काय? असा प्रश्न आमदार अमित देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला, पवनचक्की कंपनीचे लोक शेतकऱ्यांना मारहाण करीत असतील, पोलीस अधिकारी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत नसतील तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट आहे हे स्पष्ट होत आहे . त्यामुळे शेतकरी आणि सामान्य माणसाला राज्यात कसे जगावे असा प्रश्न पडला असल्याचेही त्यांनी म्हंटले.

धाराशिव जिल्ह्यात कोणत्या कंपनीच्या लोकांनी शेतकऱ्यांना मारहाण केली, ज्या शेतकऱ्यांना मारहाण झाली त्यांचे नाव आणि ज्या पोलिस अधिकाऱ्याने शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला नाही या संदर्भाने संपूर्ण माहिती मागवून घेऊन ती संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी सभागृहात सादर करावी अशी मागणी
यावेळी आमदार देशमुख यांनी केले .

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments