Friday, May 15

लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

The system is fully prepared : यंत्रणेची झाली पूर्ण तयारी मतदार राजाची आता जबाबदारी -NNL

The system is fully prepared : यंत्रणेची झाली पूर्ण तयारी मतदार राजाची आता जबाबदारी -NNL

नांदेड, लेख
लोकशाहीच्या उत्सवासाठी अर्थातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचे मतदान होईपर्यंत त्या मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी 2 लाख 21 हजार 60 बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे.      मतदार नोंदणीत वाढ; राज्यात ९.७ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क - विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष ५ कोटी २२ हजार ७३९,  तर महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ इतक्या आहेत, ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार असून मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे.   राज्यात ४.६९ कोटी महिला मतदार -राज्यात 4,69,96,279 महिला मतदार  आहेत. रत्नागिरी, नंद...
women MLAs : विधानसभेच्या ६७ वर्षाच्या वाटचालीत आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार….NNL

women MLAs : विधानसभेच्या ६७ वर्षाच्या वाटचालीत आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार….NNL

लेख
विधानसभा निवडणुकीसाठी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार एकूण ४ हजार १३६ उमेदवार या निवडणुकीत लढत आहेत. ज्यामध्ये ३७७१ पुरूष उमेदवार तर ३६३ महिला उमेदवार सहभागी आहेत. किती तरी आमदारांची निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. तर काही उमेदवारांची ही दुसरी तिसरी, चौथी, वेळ असणार आहे. सन १९५७ ते १९६२ या कालावधीत पहिली विधानसभा स्थापन झाल्यापासून ते आताच्या चौदाव्या विधानसभे पर्यंत म्हणजे गेल्या ६७ वर्षांत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहात सहभाग घेण्याची संधी आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदारांना मिळालेली आहे. भारतात सर्व नागरिकांसोबतच मतदार म्हणून महिला मतदारांना ही मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. मात्र आपल्याला विनासायस मिळालेल्या मतदानाच्या या अधिकारासाठी जगातील किती तरी देशांतील महिलांना प्रदिर्घ...
A test of loyalty in Marathwada : मराठवाड्यात निष्ठेची परीक्षा -NNL

A test of loyalty in Marathwada : मराठवाड्यात निष्ठेची परीक्षा -NNL

नांदेड, छत्रपती संभाजीनगर, लेख
मराठवाड्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक खूप वेगळी आहे . लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेची निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यावर लढविली जाते. तसे पाहिले तर मराठवाड्यासाठी महायुतीने भरभरून योजना दिल्या. त्या योजनांची उतराई करण्यासाठी मराठवाड्यातील मतदार महायुतीच्या बाजूने उभा राहतो की पुन्हा लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडीच्या पारड्यात मते जातील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रामुख्याने महायुती व महाविकास आघाडी या दोघांमध्ये राज्यात लढत होत आहे . प्रत्यक्षात मात्र मराठवाड्यात सहा पक्षाचे वेगवेगळे उमेदवार, बंडखोर तसेच इतर अपक्ष व अन्य छोट्या-मोठ्या पक्षांच्या उमेदवारांच्या लढती लक्षवेधक आहेत . लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला म्हणावी तशी साथ मतदारांकडून मिळाली नाही. त्यावेळची परिस्थिती व सध्याच्या विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती खूप वेगळी आहे. त्यामुळे विधानसभेत मराठवाडा कोणाच्या बाजूने उभे ...
Maharashtra’s Bajbajpuri became Bajbajpuri due to Uti-Aghadar : युती-आघाडीमुळे महाराष्ट्राची बजबजपुरी झाली -NNL

Maharashtra’s Bajbajpuri became Bajbajpuri due to Uti-Aghadar : युती-आघाडीमुळे महाराष्ट्राची बजबजपुरी झाली -NNL

नांदेड, लेख
महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक परिस्थिती गेल्या काही वर्षापासून अधःपतित झाली अशी ओरड सर्वत्र होत आहे. महाराष्ट्र असा कधीच नव्हता असे राज ठाकरे जाहीर भाषणातून सांगत आहेत. राजकारणात नितीमूल्य, प्रतिष्ठा काहीही शिल्लक राहिली नाही असेही सांगितले जाते. त्याचा परिणाम राज्याच्या विकासावरही होत असल्याचे म्हटले जाते. याचे प्रमुख कारण गेल्या जवळपास ३५ वर्षापासून एकाच पक्षाचे पूर्ण बहुमताचे स्थिर सरकार राज्यात आले नाही. युती-आघाडीच्या राजकारणाने महाराष्ट्राची घडी पूर्णतः विस्कटून टाकली हे कटू असले तरी सत्य आहे. ते स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राज्यात काँग्रेस पक्षाचे स्थीर सरकार होते. तो काळही स्वातंत्र लढ्याने भारलेल्या लोकांचा, नेत्यांचा होता. समाजात, राजकारणात नितीमूल्यांना किंमत होती. देशाला स्वातंत्र काँग्रेसच्या नेतृत्वात मिळाले. त्यामुळे सहाजिकच काँग्रेसचेच लोक...
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्यावरच का टीका करीत आहेत? -NNL

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्यावरच का टीका करीत आहेत? -NNL

नांदेड, लेख
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात जे आंदोलन झाले ते खरोखरच अद्भूत आणि अद्वितीय म्हणावे लागेल. आरक्षणाच्या मागणीसाठी जे मुक मोर्चे निघाले ते तर जगाने नोंद घ्यावी असेच होते. त्यानंतर याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केले तेही ऐतिहासिक असेच होते हेही मान्य करावेच लागेल. जरांगे पाटलांनी उपोषणे करीत जी समाज जागृती आणि मराठा समाजामध्ये जो एकोपा निर्माण केला तोही अद्वितीय असाच आहे. आरक्षणासाठी त्यांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही यात वादच नाही. तथापि या सर्व पार्श्वभूमीवर एका प्रश्नाचे मात्र उत्तर अद्याप मिळाले नाही. ते म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणावरुन एकट्या देवेंद्र फडणवीस यांनाच का टार्गेट केले? देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. भाजपाचे नेते आहेत. ते पब्लीक फिगर असल्याने त्यांच्या अनुचित गोष्टीवर टीका करण्याचा सर्वानाच अधिकार आहे. त्यावर आक्षेप घेण्याचे काही...
Prakashparva; 555 वां प्रकाशपर्व गुरु नानकदेवजी यांचा सत्यमार्ग -NNL

Prakashparva; 555 वां प्रकाशपर्व गुरु नानकदेवजी यांचा सत्यमार्ग -NNL

नांदेड, लेख
भारत भूमिवर पंधराव्या शतकात शीख धर्म उदयास आला. शीख धर्माचे प्रवर्तक आणी पहिले गुरु, श्री गुरु नानक देवजी यांचे सन 1469 मध्ये रायभोय की तलवंडी येथे महता कालू (कल्याणचंद) यांच्या घरी अवतरण झाले. त्यांच्या आईचे नाव माता तृप्ताजी असे होते. नानक यांनी संतत्व धारण केले आणि अध्यात्मिक क्षेत्रात एक उत्क्रांती घडवून आणली. त्यांनी आपल्या उपदेश आणि वाणीच्या माध्यमातून युक्तिवाद प्रस्तुत केला की, या ब्रह्माण्डात मानव धर्म, हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. या ब्रह्माण्डाचा स्वामी एकच आहे आणी तो परम पिता परमेश्वर आहे. गुरुजींनी भाष्य केले, "एक पिता हम एकस के बारीक." गुरु नानक यांनी परमेश्वराची निष्काम भक्ती केली. त्यांनी मनुष्य हा 84 लक्ष योनितून श्रेष्ठ योनी असल्याचे प्रचार केले. ज्याकाळात गुरुजींनी मानवतावाद आणी बंधुत्व अशा संकलना लोकांपुढे मांडल्या त्या परिवर्तन घडवणाऱ्या होत्या. गुरुजींनी जीवन जगण्यासा...
Method and features of Tulsi marriage celebration : तुळशी विवाह साजरा करण्याची पद्धत आणि वैशिष्ट्ये -NNL

Method and features of Tulsi marriage celebration : तुळशी विवाह साजरा करण्याची पद्धत आणि वैशिष्ट्ये -NNL

नांदेड, लेख
तुळशी विवाह निमित्ताने तुळशी विवाह हा सण साजरा करण्याची पद्धत, या सणाची वैशिष्ट्ये, तुलसी दर्शनाचे महत्त्व, तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये, तुळशीचा विवाह प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा, देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानाचा वापर का करावा ? यासंबंधीची शास्त्रीय माहिती तसेच आपत्कालीन स्थितीत तुळसी विवाह साजरा करण्याविषयी उपयुक्त सूत्र या लेखात देत आहोत. 1. तिथी - हा विधी कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात. 2. पूजन - श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह लावून देणे, हा तुळशी विवाहाचा विधी आहे. पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती. विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाहसोहळा सायंकाळी करतात. 3. वैशिष्ट्ये - तुळशी विवाह झाल्यानंतर च...
do balanced development : महाराष्ट्र एकसंघ ठेवायचा असेल तर समतोल विकास करा -NNL

do balanced development : महाराष्ट्र एकसंघ ठेवायचा असेल तर समतोल विकास करा -NNL

नांदेड, लेख
महाराष्ट्राची सत्ता मिळविण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत चढाओढ सुरु आहे. सत्तेसाठी दोन्ही बाजुंनी मतदारांना विविध प्रलोभने दाखविली जात आहेत. परंतु महाराष्ट्राचा समतोल विकास, समन्यायी पाणी वाटप यावर मात्र दोन्ही बाजुचे नेते बोलण्यास तयार नाहीत. महाराष्ट्राचा समतोल विकास साधला गेला असता तर राज्यासमोर आज भेडसावणारे महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदि समस्या उभ्याच राहिल्या नसत्या. महाराष्ट्र एकसंघ ठेवायचा असेल तर राज्यकर्त्यानी भान ठेवणे गरजेचे आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या वाढत चालली त्या प्रमाणात शिक्षणाचे प्रमाणही वाढत चालले. वसंतदादाच्या काळात खाजगी शिक्षण संस्थांना परवानगी देऊन तालुकास्तरावर देखील विविध महाविद्यालये सुरु केली. परंतु त्या महाविद्यालयातून पदव्या घेऊन बाहेर पडणा-या तरुणांना नोकरीच्या संधी मात्र नाहीत. याचे कारण शासकीय नोक-या आता नसल्यात जमा आहेत. शासनाजवळ पैसाच न...
Intrusion into the reserved constituency! : राखीव मतदार संघातील घुसखोरी ! 

Intrusion into the reserved constituency! : राखीव मतदार संघातील घुसखोरी ! 

नांदेड, लेख
विषमतेचे महासागर असलेली जातीव्यवस्था ही भारताचे वास्तव सत्य आहे. जगात अनेक वैज्ञानिक शोध लागले पण भारतात जातींचा शोध लागला. सहा हजार जाती आणि सहा हजार पोटजाती असा बारा हजार जातींचा हा देश आहे. भारतातील या सर्व जाती धर्मांना समान संधी मिळावी या उद्देशाने राखीव जागांची निर्मिती करण्यात आली. यासाठी विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. लंडनमधील सर्व गोलमेज परिषदांना उपस्थित राहून बाबासाहेबांना दलितांची बाजू प्रभावीपणे मांडावी लागली. महात्मा म्हणवणाऱ्या गांधीनी मात्र या परिषदेत दलितांना कोणत्याही सोयी सवलती देण्यास तीव्र विरोध केला, म्हणून बाबासाहेबांनी गांधीना महात्मा म्हणण्यास नकार दिला होता. भारतात आम्ही दुहेरी गुलाम आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळत असेल तर ब्राम्हणवादाच्या अर्थात जातीयवादाच्या गुलामीतून आम्हाला अगोदर मुक्त करा. आमचे हक्क आणि अधिकार आम्हाला स्वतं...
What is the real truth about the irrigation scam? : सिंचन घोटाळ्याचे नेमके सत्य काय आहे? -NNL

What is the real truth about the irrigation scam? : सिंचन घोटाळ्याचे नेमके सत्य काय आहे? -NNL

नांदेड, लेख
माझे अतिशय घनिष्ट मित्र, ज्येष्ठ पत्रकार, डिजीटल मिडियाचे संपादक राजा माने यांनी दोन दिवसापूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सहकारी बँक आणि सिंचन घोटाळ्याविषयी जे खुलासे केले ते अतिशय धक्कादायक आहेत. ही मुलाखत ऐकल्यानंतर सिंचन घोटाळ्यातील नेमके सत्य काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात पृथ्वीराज चव्हाण हे अतिशय स्वच्छ चारित्र्याचे, चरित्राचे नेते म्हणून ओळखले जातात. प्रदीर्घ काळ केंद्रातील सत्तेत सहभागी राहिल्यानंतर ते राज्यात मुख्यमंत्री म्हणून परतले. आपल्या हातून कोणतेही चुकीचे काम घडू नये यासाठी त्यांनी डोळ्यात तेल घालून मुख्यमंत्रीपदाची धुरा वाहिली. त्यामुळे अनेकांची गोची झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तर पृथ्वीराज चव्हाण निर्णय घेत नसल्याबद्दल हाताला लखवा मार...
error: Content is protected !!