Friday, May 15

लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Politics Special ; अरे शिकून सवरुनी असा कसा गेला वाया..? -NNL

Politics Special ; अरे शिकून सवरुनी असा कसा गेला वाया..? -NNL

नांदेड, लेख
निवडणूक प्रचाराला चांगलीच सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार पाठविण्याची ही निवडणूक आहे. यातून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोक प्रतिनिधी निवडायचे आहेत. काही पढतमुर्खांना हे अजून नीट समजलेले दिसत नाही. त्यांना वाटत असेल मंदिरात पुजारी पाठवायची ही निवडणूक आहे, म्हणून मंदिरात व मठात सनातनी महाराज लोकांना बोलाऊन पुजापाठ करुन निवडणुकीचा प्रचार सुरु करण्यात येत आहे. सर्व पक्षात नाक खुपसून झाल्यावर सर्वांचा जोरदार ठोसा खाऊन लालबुंद झालेले नाक घेऊन आता अपक्ष म्हणून राखीव मतदार संघात उभा राहिलेल्या एका मागासवर्गीय उमेदवाराने सगरोळी येथील एका मंदिरातून व मठातून आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. म्हणजे असे केल्याने लोक धार्मिक भावनेतून आपल्यालाच मतदान करतील असा गोड गैरसमज या उमेदवाराचा झाला असावा ! या आपल्या देशात दलितांना शिकण्याचा, लिहिण्याचा, रस्त्यावरुन चालण्याचा आ...
Bhaubij (Yamadvitiya) : भाऊबीज (यमद्वितीया) -NNL

Bhaubij (Yamadvitiya) : भाऊबीज (यमद्वितीया) -NNL

नांदेड, लेख
या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती या लेखाच्या माध्यमातून करून घेऊया.  तिथी: कार्तिक शुद्ध द्वितीया इतिहास: या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला; म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव मिळाले. महत्त्व: अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया या दिवशी मृत्यूची देवता ‘यमधर्म’ हिचे पूजन करतात. ‘या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो अन् त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.’ हा दिवस मातेच्या गर्भातून जन्म घेतलेल्या जिवांना एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा व्यक्त क...
Bali Pratipada (Diwali Padwa) : बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा) -NNL

Bali Pratipada (Diwali Padwa) : बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा) -NNL

नांदेड, लेख
अत्यंत दानशूर, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. त्रिपाद भूमी दान मागून वामनाने बलीराजाला जरी पाताळात धाडले असले, तरी सर्वार्थाने त्याचे कल्याणच केले आहे. पृथ्वीतलावर दीपावली साजरी केली जाण्यामागेदेखील या घटनेचा प्रमुख आधार आहे. बलिप्रतिपदा सणाविषयीचे शास्त्र सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून जाणून घेऊया.   तिथी :कार्तिक शुद्ध प्रतिपदा (दिवाळी पाडवा). श्रीविष्णूने ही तिथी बलीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलीप्रतिपदा’ म्हटले जाते. इतिहास :बलीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असे. ‘दान देणे’ हा गुण आहे; पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा आणि कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे अन् तो शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे. स...
Method and Significance of Lakshmi Puja : लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत आणि महत्त्व -NNL

Method and Significance of Lakshmi Puja : लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत आणि महत्त्व -NNL

नांदेड, लेख
आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री  लक्ष्मीपूजन केले जाते. आश्विन अमावास्येचा हा दिवस दीपावलीचा एक महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; परंतु दीपावलीतील ही अमावस्या शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमेप्रमाणेच कल्याणकारी आणि समृद्धिदर्शक आहे. या दिवशी श्री  लक्ष्मीपूजनासोबत अलक्ष्मी नि:सारणही केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करावयाच्या कृतीमागील शास्त्र या लेखातून जाणून घेऊया. इतिहास - लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. सण साजरा करण्याचीपद्धत -प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मं...
Article on the occasion of Diwali…. Abhyangasnan दीपावलीनिमित्त लेख…. अभ्यंगस्नान -NNL

Article on the occasion of Diwali…. Abhyangasnan दीपावलीनिमित्त लेख…. अभ्यंगस्नान -NNL

नांदेड, लेख
गुढीपाडवा, दिवाळी इत्यादी सणांना ‘अभ्यंगस्नान’ करावे असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. या लेखात आपण ‘अभ्यंगस्नान’ म्हणजे काय, त्याची प्रत्यक्ष कृती, त्याने होणारे लाभ, अभ्यंगस्नानात तेल लावण्याचे महत्त्व सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून पहाणार आहोत. अभ्यंगस्नान : अर्थ अ. अभ्यंगस्नान म्हणजे पहाटे उठून डोक्याला आणि शरिराला तेल लावून नंतर कोमट पाण्याने स्नान करणे, आ. शरीराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे आणि नंतर ऊन (गरम) पाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. इ. पिंडाच्या अभ्युदयासाठी केलेले स्नान म्हणजेच अभ्यंगस्नान वर्षभरातअभ्यंगस्नान करण्याचे दिवस अ. संवत्सरारंभ, आ. वसंतोत्सवाचा प्रारंभ दिवस म्हणजे फाल्गुन कृष्ण प्रतिपदा, इ. दिवाळीचे तीन दिवस म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशी अर्थात नरक चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा. अभ्यंगस्...
Adherence to the Code of Conduct : आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या – ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ -NNL

Adherence to the Code of Conduct : आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या – ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ -NNL

नांदेड, लेख
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२४ जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनाच ‘आचारसंहिता’ म्हटले जाते. निवडणूक घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी या आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. आचारसंहिता अधिक विस्तृत असल्याने त्यापैकी निवडणूक काळात राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याबाबत काही महत्त्वाची तत्वे सांगितलेली आहेत. आचारसंहिता काळात काय करावे? निवडणूक घोषित होण्यापूर्वी सुरू करण्यात आलेले कार्यक्रम पुढे सुरू ठेवता येतील. पूर, अवर्षण इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी मदतीचे कार्य सुरू ठेवता येईल. मरणासन्न क...
Adarsh ​​Diwali Special Article ; आदर्श दिवाळी विशेष लेख – NNL

Adarsh ​​Diwali Special Article ; आदर्श दिवाळी विशेष लेख – NNL

लेख, नांदेड
प्रस्तावना - 'तमसो मा ज्योतिर्गमय' या श्लोकाचा अर्थ : 'हे भगवंता ! आपण मला असत्याकडून सत्याकडे,अंधकारातून प्रकाशाकडे न्यावे 'अशी प्रार्थना आहे.प्रत्येक प्राणिमात्रांची धडपड प्रकाशाकडे जाण्याची असते. ज्या स्थितीत आहोत त्याच्या पुढील स्थितीत जाण्यासाठी, प्रगती करण्याकडे असते. अर्थात नकारात्मकते कडून सकारात्मकतेकडे जायचे असते. जीवनात सकारात्मकता शिकवणारा, प्रकाशाकडे वाटचाल करण्यास शिकवणारा सण म्हणजे दिवाळी. सत्याच्या विजयाचे प्रतिक ! - प्रभू श्रीरामचंद्र हे 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून दिवाळीच्या दिवशी अयोध्येत परत आले. प्रभू श्रीरामचंद्राच्या आगमनाने प्रजेला खूप आनंद झाला. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरीत घरोघरी तुपाचे दिवे लावून आनंद व्यक्त करण्यात आला. प्रभू श्रीराम सत्याचे मूर्तिमंत रूप असल्याने त्यांचा विजय म्हणजे सत्याचाच विजय होता. या विजयाचा उत्सव म्हणून आपण दिवाळी दीपोत्...
relationships are at risk ; सत्तेची नशा अशी की नातीगोतीही पणाला लागली -NNL

relationships are at risk ; सत्तेची नशा अशी की नातीगोतीही पणाला लागली -NNL

नांदेड, लेख
सत्ता सुंदरीची नशा कशी असते पहा. एकदा ही नशा माणसाला चढली की, त्यापुढे नाती-गोती, भाव-भावना, सत्य-असत्य कशाचेही भान माणसाला राहत नाही. विधान सभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात जे सध्या चित्र दिसत आहे. त्यातून राजकारणापुढे नात्यागोत्याला कवडीमोल किंमत असते हेच दिसून येते. राजकारणाचा असा हा खेळ, नाही कोणाचा कोणाला मेळ असे सध्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात सध्या विधान सभा निवडणूक सुरु आहे. या निमित्ताने विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीत उतरवत आहेत. राजकारण ही विचाराची लढाई आहे आणि यात विचारावरील निष्ठेला अनन्यसाधारण महत्व आहे अशी सर्वाची समजूत होती. परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण हे केवळ सत्तेसाठी असते. सत्ता मिळविण्याकरिता तुम्ही कोणत्याही थराला गेला तर तुम्हाला माफ आहे. राजकारणात निष्ठेला कवडीमोल किंमत असते असाच संदेश नागरिकात जात आहे. सध्या प्रमुख राजकीय पक्ष आपले उ...
The independence of the judiciary ; न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहावे! – NNL

The independence of the judiciary ; न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहावे! – NNL

लेख, नांदेड, मुंबई
अलीकडेच भारतीय सरन्यायाधीश यांनी त्यांच्या सेवानिवृत्ती ची घोषणा केली त्यामुळे काही बाबींवर प्रकाश टाकणे अगत्याचे वाटते. त्यांनी सेवानिवृत्ती घ्यावी की त्यागपत्र द्यावे? यावर काही व्हिडिओ ऐकण्यात आले ज्यामध्ये त्यांनी राजीनामा द्यावा अशीही अपेक्षा काहींनी व्यक्त केली. हो, हे अगदी खरे आहे, न्यायमुर्तीनी राजीनामाच द्यायला हवा. भारतीय संविधानातील कलम 32 हे अतिशय महत्वाचे आहे. या कलमास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचे ‘हृदय’ आणि ‘आत्मा’ असे म्हटले होते. हे कलम म्हणजे न्यायव्यवस्था (र्क्षीवळलळरीू) होय. भारतीय लोकशाहीचा हा तिसरा आधारस्तंभ होय. संसदेने पारित केलेला एखादा कायदा हा संविधानातील तरतुदींची विसंगत नाही ना? याचा अर्थ लावण्याची जबाबदारी ही न्याय व्यवस्थेची आहे. असे काही घडले तर न्यायव्यवस्था र्‘ीीे र्ोीींीं’ (स्वतः होवून) होऊन याबाबत निर्णय देईल अशी तरतूद घटनेत आहे. अलीकडे भा...
Clean Hands ; स्वच्छ हात: निरोगी जीवनाचा आधार – मिलिंद व्यवहारे – NNL

Clean Hands ; स्वच्छ हात: निरोगी जीवनाचा आधार – मिलिंद व्यवहारे – NNL

लेख, नांदेड
आज दिनांक 15 ऑक्टोबर, जागतिक हात धुवा दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने स्वच्छतेच्या महत्वावर आणि आरोग्यविषयक आदतांवर प्रकाश टाकणारा हा लेख आहे. संयुक्त राष्ट्र संघाने आरोग्य संरक्षित ठेवण्यासाठी आणि अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. हात धुणे, विशेषतः साबणाने, ही साधी क्रिया अनेक आजार टाळण्यास मदत करू शकते. हात धुण्याची सवय ठेवल्याने विषाणू, जिवाणू, आणि परोपजीवांपासून संरक्षण मिळू शकते. अस्वच्छ हातांमुळे होणाऱ्या अतिसार, विषमज्वर, कॉलरा, स्वाइन फ्लू, आणि इतर श्वसन आजारांचे प्रमाण खूप मोठे आहे. 1840 मध्ये डॉ. ईगनाज सेमेलवाईस यांनी हात धुण्याचे महत्व शोधून काढले. त्यांनी हे सिद्ध केले की, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी हात स्वच्छ धुतल्यास बाळंतपणात महिलांच्या मृत्यूचे प्रमाण 50% नी घटले. त्यानंतर हात धुण्याचे महत्व सर्वत्...
error: Content is protected !!