starvation to death : गावाच्या न्यायासाठी सूरज बोने यांनी सुरु केलं प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण

हिमायतनगर,अनिल मादसवार| गावाच्या विकासात झालेल्या कथित अनियमितता, अपूर्ण व चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी मौजे पारवा मोरगाव येथील सूरज बबनराव बोने यांनी आज दिनांक 26 जानेवारीपासून हिमायतनगर तहसील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

पत्रकारांशी बोलताना सूरज बोने यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून, गावाच्या विकासासाठी, न्यायासाठी आणि पारदर्शकतेसाठी आहे. गावातील जनतेचे पैसे व हक्क वाचवण्यासाठी हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.”

मौजे पारवा मोरगाव येथे 2020 ते 2026 या कालावधीत विविध विकासकामे झाली, मात्र त्यातील अनेक कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत, काही कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप आहे, तर काही कामांमध्ये कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले, पण प्रत्यक्षात तसे नसल्याने विकासकामांवर संशय आहे.

⚠️ गंभीर आरोपांची यादी
ग्रामस्थांच्या वतीने मांडण्यात आलेल्या प्रमुख बाबी पुढीलप्रमाणे –  तीन वर्षे उलटूनही वॉटर फिल्टर यंत्रणा कार्यान्वित नाही,  दलित वस्तीतील रस्त्यांची दुरवस्था, पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांना हाल,  एमबी (MB) व अंदाजपत्रकात (Estimate) कथित फसवणूक,  प्रत्यक्ष खर्च कमी, कागदोपत्री खर्च जास्त दाखवला गेल्याचा आरोप उपोषणकर्त्याने केलं आहे. यामुळे गावातील सार्वजनिक निधीचा गैरवापर झाला असून, नागरिकांचे अधिकार धोक्यात आले असल्याचे बोने यांनी सांगितले.

सूरज बोने यांनी आमरण उपोषणाच्या मंचावरून पुढील मागण्या केल्या आहेत , सर्व विकासकामांची सखोल व स्वतंत्र चौकशी व्हावी, दोषी आढळल्यास कडक कारवाई करून रक्कम वसूल करावी, संबंधित सर्व कागदपत्रे – Estimate, MB, Bills सार्वजनिक करावीत असे त्यांनी पत्रकारांसमोर म्हंटले आहे. उपोषण सुरु झाल्यानंतर पंचायत समितीच्या कोणत्याही अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट दिली नसल्याचे सांगितले. 

या प्रकरणी दि. 21 जानेवारी रोजी संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे लेखी मागणी करूनही कोणतीही चौकशी सुरू झाली नाही, त्यामुळे शेवटी प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे बोने यांनी स्पष्ट केले. “हा प्रश्न वैयक्तिक म्हणून न पाहता, संपूर्ण गावाच्या हिताचा प्रश्न म्हणून पाहावा,”असे आवाहन त्यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांना केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button