Chief Minister Samriddh Panchayat Raj Abhiyaan : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी लोकसहभागच किल्ली – पालकमंत्री अतुल सावे
नांदेड, अनिल मादसवार| गावांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी राबविण्यात येत असलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे केवळ शासकीय उपक्रम नसून लोकसहभागातून उभे राहणारे परिवर्तनाचे आंदोलन आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
जिल्हा परिषद नांदेड येथील नूतनीकृत कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार आनंदराव बोंढारकर, तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, नांदेड जिल्हा प...









