Wednesday, May 13

Tag: Chief Minister Devendra Fadnavis

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, देश विदेश
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ;  जलसंवर्धनाचा जागर करत अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना नाशिक| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे झाला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अहिल्यादेवींचे विचार, वारसा आणि विकास हा त्रिसूत्री मंत्र घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थ...
एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र
धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १०१.७७ टीएमसी अधिकचा पाणीसाठा मुंबई| राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०१.७७ टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. गतवर्षी हा साठा ५५१.८६ टीएमसी होता. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या अनियमतेतमुळे पुढील वर्षी टंचाईचा मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सादरीकरणाद्वारे राज्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा आणि एल-निनो प्रभावामुळे संभाव्य परिणामांची माहिती दिली. एल-निनोच्या प्रभावामुळे पाणीसाठ्यात २०१४ मध्ये १२ टक्के तर २०१५ मध्ये सुमारे १४ टक्के घट झाली होती. त्यामुळे दोन्ही वर्षी पाणीटंचाई निर्माण झाली होती. १५ ऑक्टोबर २०१४ रोजी ८७२ टीएमसी...
Budget 2026-27 : विकसित महाराष्ट्र 2047 च्या ध्येयावर आधारित 2026-27 चा अर्थसंकल्प  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Budget 2026-27 : विकसित महाराष्ट्र 2047 च्या ध्येयावर आधारित 2026-27 चा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई| महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा ₹7,69,467 कोटींचा अर्थसंकल्प शासनाने  सादर केला असून तो “विकसित महाराष्ट्र 2047” या दीर्घकालीन रोडमॅपवर आधारित तयार करण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50 हजार प्रोत्साहन देण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान सभेत दुपारी 2 वाजता सन 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, वित्त राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल तसेच वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता यांनी विधानभवन येथील पत्रका...
Ajit Pawar : राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

Ajit Pawar : राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

महाराष्ट्र, पुणे, मुंबई
बारामती| राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजारापू, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहूल कुल, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आदी उपस्थित होते....
Chief Minister Devendra Fadnavis : गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, तेलंगणा, देश विदेश, धार्मिक, महाराष्ट्र
नांदेड,अनिल मादसवार | ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नव्हते, तर सत्य, धर्म, स्वातंत्र्य आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी होते. त्यांच्या बलिदानातून प्रत्येक पिढीला निर्भीडपणे अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळेच त्यांच्या विचारांचा वारसा राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात ते बोलत होते. या भव्य समागमास लाखो भाविकांची उपस्थिती लाभली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, पालकमंत्री अतुल ...
Chief Minister Devendra Fadnavis : “हिंद-दी-चादर” शहीदी समागमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेडमध्ये आगमन

Chief Minister Devendra Fadnavis : “हिंद-दी-चादर” शहीदी समागमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेडमध्ये आगमन

नांदेड, धार्मिक
नांदेड| “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईहून विमानाने नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या आगमनावेळी विमानतळ परिसरात उत्साहाचे वातावरण होते. पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. भागवत कराड, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार तुषार राठोड, राजेश पवार, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ व पुस्तक द...
Chief Minister Devendra Fadnavis : गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करून अधिक कठोर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करून अधिक कठोर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, महाराष्ट्र, मुंबई
नागपूर| राज्यातील गुटखा बंदी अधिक प्रभावी आणि कठोर करण्यासाठी सरकार निर्णायक पावले उचलत असून गुटखा व्यवसायावर आता मकोका लावता यावा यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर, अस्लम शेख, अभिमन्यू पवार, रईस शेख आणि अमीन पटेल यांनी शाळा–महाविद्यालय परिसरात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्री आणि वहनासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लावण्याचा प्रस्ताव विधी विभागाकडे पाठवण्यात आला होता; मात्र कायद्यातील “हार्म आणि हर्ट” या दोन घटकांची पूर्तता नसल्याने तो लागू होऊ शकत नाही. त्यामुळे कायद्यात आवश्यक बदल करून गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल अशा तरतुदी करण्यात येणार आहेत. यानंतर ह...
Chief Minister Devendra Fadnavis : स्पष्ट दृष्टिकोन, जलद निर्णय आणि जबाबदार अंमलबजावणी हे महाराष्ट्राच्या विकासाचे तीन स्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : स्पष्ट दृष्टिकोन, जलद निर्णय आणि जबाबदार अंमलबजावणी हे महाराष्ट्राच्या विकासाचे तीन स्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, महाराष्ट्र
मुंबई| राज्याच्या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीत “स्पष्ट दृष्टिकोन, जलद निर्णयप्रक्रिया आणि जबाबदार अंमलबजावणी” हे तीन महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित "ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025" च्या कार्यक्रमामध्ये क्रेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसारखे अनेक प्रकल्प दशके प्रलंबित होते, परंतु ‘इन्फ्रास्ट्रक्चर वॉर रूम’च्या माध्यमातून निर्णयप्रक्रिया गतिमान करण्यात आली. पूर्वी मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केवळ नियोजनासाठी सहा वर्षे लागली होती. मात्र आम्ही ३७२ किमी मेट्रो नेटवर्कसाठी केवळ ११ महिन्यांत निविदा टप्प्यापर्यंत पोहोचलो, असे त्यांनी सांगितले. सन २०३० पर्यंत महाराष्ट्...
Chief Minister Devendra Fadnavis : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 31,628 कोटींचे पॅकेज  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 31,628 कोटींचे पॅकेज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये 29 जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त 253 तालुके आणि 2059 मंडळांमध्ये मदतीसाठी 65 मिलीमिटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नुकसानग्रस्त भागातील बळीराजाला पुन्हा उभे करण्यासाठी 31 हजार 628 कोटींच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले. या पॅकेजनुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 18 हजार 500 रुपये, हंगामी बागायतीसाठी 27 हजार रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी 32 हजार 500 रुपये मदत दिली जाणार आहे. जाहीर करण्यात आलेली मदत दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न राहणार असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मंत्रिमंडळाच्या बै...
Chief Minister Devendra Fadnavis : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून या अनुषंगाने नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती केली होती. या नामकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या नामकरणासाठीही लवकरच मान्यता मिळणार असल्याची  माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विमानतळाला  दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत राज्य शासनाचा इरादा बदललेला नाही आणि केंद्र शासनाचा देखील वेगळा विचार नाही. असे स्पष्टपणे नमूद करून  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ' केंद्र शासनाने विमानतळ बांधकामाला परवानगी देताना ' नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' अशा नावाने पूर्वी परवानगी दिली होती, त्यामध्ये नामविस्तार होऊन आता "लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमा...
error: Content is protected !!