Thursday, May 21

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Solve the problems : तीर्थक्षेत्र माहूरच्या नागरिकांच्या अडचणी सोडवा ! अन्यथा ६ ऑक्टोबर पासून जिल्हा कचेरी समोर करणार बेमुदत आमरण

Solve the problems : तीर्थक्षेत्र माहूरच्या नागरिकांच्या अडचणी सोडवा ! अन्यथा ६ ऑक्टोबर पासून जिल्हा कचेरी समोर करणार बेमुदत आमरण

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तीर्थक्षेत्र माहूर ता. माहूर येथील नागरिकांच्या विविध अडचणी व समस्या सोडविण्याबाबत संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला. समस्या सोडविण्याचे लेखी अश्वासने देऊन सुद्धा समस्या न सोडविणारे संबधित अधिकारी व पदाधिकारी यांचे निषेधार्थ व त्यांची चौकशी करून त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल व्हावेत व नागरिकांच्या प्रलंबित मागण्याची तातडीने पूर्तता करण्यात यावी. या मागणीसाठी शेकडो नागरीकासह दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १ :०० वा पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषण सुरु करणार आहे. असे निवेदन भारतीय राष्ट्रीय पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना सादर केले आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड, विभाग नियंत्रक रापम विभाग कार्यालय नांदेड तहसीलदार,माहूर, मुख्याधिकारी नगर पंचायत कार्यालय माहूर, आगार प्रमुख रापम आगा...
A.Prataparav Patil Chikhlikar ; आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट जुना कौठा येथील रावणाचे दहन

A.Prataparav Patil Chikhlikar ; आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट जुना कौठा येथील रावणाचे दहन

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l श्री.बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट जुना कौठा विकास नगर नांदेडचा वतीने तीस फूट उंच असलेल्या दहा तोंडी रावणाचे दहन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी हजारो भाविक भक्तांचा उपस्थितीत रावण दहन करण्यात आले. 15 व्या ब्रम्होत्सव निमित्ताने 22सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर दरम्यान ब्रम्होत्सव सेवा,भजन संध्या, बालाजी पालखी परिक्रमा,यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजीत करण्यात आले होते विजया दशमी निमित्ताने 02 ऑक्टोबर रोजी सायंकाळी रावण दहनआमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, नगरसेवक राजू पाटील काळे, नगरसेवक राजू भाऊ गोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, विनोद काकडे, राठोड, यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. श्री भगवान बालाजीच्या मुख्य रथ विजया दशमीचा दिवशी दुपारी 3 वाजता मंदीरा पासून मुख्य मार्गावर निघुन जुना कौठा विठ्ठल मंदिर कडुन परत बालाजी मंदि...
Mahatma Gandhi Jayanti : महात्मा गांधी जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व अभिवादन

Mahatma Gandhi Jayanti : महात्मा गांधी जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व अभिवादन

लातूर, राजकीय
लातूर| गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री,लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी लातूर शहरातील महात्मा गांधी चौक येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हा.चेअरमन विजय देशमुख, माजी उपमहापौर कैलास कांबळे, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके, सी.ए.प्रकाश कासट, इम्रान सय्यद, व्यंकटेश पुरी, अमित जाधव, सुरेश चव्हाण, राम स्वाम...
Ashokrao Chavan : शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही; अशोकराव चव्हाणांचा नांदेड दौरा

Ashokrao Chavan : शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही; अशोकराव चव्हाणांचा नांदेड दौरा

नांदेड, राजकीय
नांदेड | अतिवृष्टी व पूरामुळे नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके, घरे, जनावरे वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी नीळा, आलेगाव, एकदरा, भालकी, चिखली बु., पासदगाव, पुयनी आदी आपद्ग्रस्त गावांना भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला. शासनामार्फत जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना चव्हाण यांनी पीकविमा कंपन्यांच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना योग्य परतावा न मिळाल्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून सुधारणा घडवून आणण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, नांदेड तालुका भाजपच्यावतीने पाच शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आली. निळा गावातील तुकाराम जोगदंड यांना घर पडल्यामुळे २० हजार रुपयांची मदत देण्यात आली. तर आलेगाव आणि एकदरा येथील चार शेतकऱ्यांना जन...
Provide help : शेतकरी व भूमिहीन शेतमजूरांना मदत व रोजगार द्या!

Provide help : शेतकरी व भूमिहीन शेतमजूरांना मदत व रोजगार द्या!

नांदेड, राजकीय
नांदेड (प्रतिनिधी) गत तिन महिन्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी व भूमिहीन शेतमजूरांची दयनीय अवस्था झाली असून, त्यांना तातडीने आर्थिक मदतीसह हाताला काम द्यावे अशी मागणी कामारी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांना सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव मा. भवरे कामारीकर, वैभव नरवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले. शेतजमिनी, घरे, दुकाने व पशुधनाचे झालेले मोठे नुकसान, तसेच भूमिहीन शेतमजुरांवर आलेली उपासमारी याची सविस्तर माहिती देऊन सरसकट आर्थिक मदत व रोजगार हमी कामाची मागणी करण्यात आली. या निवेदनावर लक्ष्मणराव मा. भवरे, वैभव नरवाडे, नथुराम कांबळे, भगवान शिंगणकर, बाबासाहेब नरवाडे, विनोद नरवाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत....
heavy rainfall : अतिवृष्टी बाधीत शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत द्या

heavy rainfall : अतिवृष्टी बाधीत शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत द्या

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व ढगफुटीमुळे बाधीत झालेल्या शेतकर्‍यांच्या शेतीचे व ईतर नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी 50 हजार रूपयाची नुकसान भरपाई देवून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी निवेदन देवून केली आहे. जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या ढगफुटी व मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी होवून खरीप हंगामातील शेती बाधीत झाली असून शेतातील सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, हळद, केळी, फळबाग पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अनेकांच्या घराची पडझड झाली आहे. पावसामुळे जमिनी खरडून गेलेल्या आहेत तसेच गुरे, ढोरे, वाहून गेल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासन निर्णय क्रमांक सीएलएस- 2022/प्र.क्र.297/म-3 नुसार शासनाने प्रचलित दरावून अध...
Immediately Support : आश्वासन नको, तात्काळ शेतकर्‍यांना मदत करा – स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधवराव पा. देवसरकर

Immediately Support : आश्वासन नको, तात्काळ शेतकर्‍यांना मदत करा – स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधवराव पा. देवसरकर

नांदेड, राजकीय
नांदेड| संपूर्ण मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यावर अतिवृष्टीचे संकट ओढवले असून शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतमाल पाण्यात वाहून गेला, जनावरांचा मृत्यू झाला, तर अनेक गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी घुसून संसार उद्ध्वस्त झाला आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांतच शेतकर्‍यांच्या माथी दुर्दैव कोसळले असून शेतकरी हताश झाले आहेत. या परिस्थितीत सरकार केवळ आश्वासन देत आहे, मात्र प्रत्यक्षात मदतीचा ठोस निर्णय घेतलेला नाही, अशी टीका स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी केली आहे. शेतकर्‍यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे. नुकसानग्रस्तांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी. गोरगरिबांना अन्नधान्य व निवार्‍याची सोय करून दिली पाहिजे. सरकारने वेळ न दवडता तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अतिवृष्टीमुळे शेतीमाल, जनावरे व घरे उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी पूर्णपणे संक...
MP Nagesh Patil Ashtikar  : हदगावात पावसाने घातले थैमान; खासदार नागेश पाटील आष्टीकर घटनास्थळी दाखल

MP Nagesh Patil Ashtikar : हदगावात पावसाने घातले थैमान; खासदार नागेश पाटील आष्टीकर घटनास्थळी दाखल

नांदेड, राजकीय
हदगाव, शेख चांदपाशा| सलग अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे हदगाव शहरातील मौलाना गल्ली परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. रस्ते, गल्ल्या व नाल्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक भयभीत झाले होते. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. या बिकट परिस्थितीत खासदार नागेश पाटील आष्टीकर स्वतः घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांचे हाल, त्यांची हतबलता जवळून अनुभवत लोकांना धीर दिला. आणि “कसलंही संकट असो… मी तुमच्यासोबत आहे. कुठलीही अडचण आली तर मला तात्काळ सांगा,” असा विश्वास व्यक्त केला. यावेळी खासदार आष्टीकर यांनी तात्काळ नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना कामाला लावले. तसेच उपविभागीय अधिकारी (SDM) हदगाव यांना घटनास्थळी बोलावून घेतले. नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर तात्काळ उपाययोजना म्हणून नव्याने बांबू अगोदर टाकण्याच्या सूचन...
Citizens should be careful : नागरिकांनी काळजी घ्यावी, कामाशिवाय घराबाहेर पडू नये – आ. प्रतापराव पाटील चिखलीकार

Citizens should be careful : नागरिकांनी काळजी घ्यावी, कामाशिवाय घराबाहेर पडू नये – आ. प्रतापराव पाटील चिखलीकार

नांदेड, राजकीय
लोहा| जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शनिवारी भल्या पहाटे पासून लोहा कंधार तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सकाळीच अनेक गावात पुर परिस्थिती उदभवली काही गावांचे संपर्क तुटले. शिवाय शनिवारी दुपारी पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. प्रशासन खबरदारी घेत आहे मी व अधिकारी अनेक ठिकाणी गेलो तेथील उदभवलेल्या पूर परिस्थितीची पाहणी केली. लोकांच्या अडीअडचणी सोडविल्या काही ठिकाणी लोकांचे स्थलांतर केले. अजून पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अश्या परिस्थितीत लोहा - कंधार सह जिल्ह्यातील नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये आम्ही सोबत आहोत. काहीही समस्या असेल तर कळवावे असे आवाहन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. शनिवारी ( ता.२७ सप्टेंबर) सकाळपासून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा कंधार तालुक्यातील ज्या गावात पूर परिस्थिती निर्माण झा...
Ravi Rathod : कामगारांना लुटणाऱ्या दलालांचा समाचार घेणार – मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांचा इशारा

Ravi Rathod : कामगारांना लुटणाऱ्या दलालांचा समाचार घेणार – मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांचा इशारा

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| तालुक्यात दलाला मार्फत बोगस बांधकाम व इतर कामगारांची बनावट कागदपत्राच्या आधारे नोंदणी होत असल्याने मूळ कामगार लाभापासून वंचित राहत असून खऱ्या कामगारांना साहित्य मिळवून देतो तुमचा अर्ज भरून देतो. म्हणून हजारो रुपयांची लूट होत असून, ही लूट थांबवून खऱ्या कामगारांना न्याय मिळावा. आणि दलाला पासून सुटका व्हावी यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी मौजे पाचुंदा येथे बैठक घेऊन मागणी केली आहे. गोरगरीब कामगारांना लुटणाऱ्या दलालांचा समाचार घेऊ आणि खऱ्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाभरात बैठका घेऊन कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मौजे पाचुंदा येथे झालेल्या बैठकीत कामगारांना दिले. माहूर तालुक्यातील प्रभू श्रीराम मंदिर पाचुंदा येथे झालेल्या बैठकीत मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी बांधकाम कामगाराच्या समस्या जाणून घेतल्या बैठकीला शेकडो बा...
error: Content is protected !!