Wednesday, May 13

कृषी

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

District Superintendent of Agriculture Kalsait :जमिनीत जैविक सूक्ष्म जीवाचा अधिवास वाढवण्याची गरज : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कळसाईत – NNL

District Superintendent of Agriculture Kalsait :जमिनीत जैविक सूक्ष्म जीवाचा अधिवास वाढवण्याची गरज : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कळसाईत – NNL

कृषी, नांदेड
नांदेड| जमिनीतील रासायनिक खतांचा होणारा अतिवापर टाळून जमिनीमध्ये जैविक सूक्ष्म जीवाचा अधिवास वाढणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी केले. जागतिक मृदा दिनानिमित्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालय व कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथे मृदा दिन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच 5 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी. आर. कळसाईत तर प्रमुख मार्गदशक म्हणून तालुका कृषी अधिकारी चातरमल, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, डॉ. महेश अंभोरे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी प्रकाश पल्लेवाड यांची उपस्थिती होती. जैविक संघ ट्रायकोडर्मा, मेटज्ञराझियम, निंबोळ...
Farmer Koso away from agricultural schemes : कृषी योजनांपासून शेतकरी कोसो दूर; प्रभारी कुषी अधिकाऱ्याची उदासीन भूमिका ठरते कारणीभूत -NNL

Farmer Koso away from agricultural schemes : कृषी योजनांपासून शेतकरी कोसो दूर; प्रभारी कुषी अधिकाऱ्याची उदासीन भूमिका ठरते कारणीभूत -NNL

कृषी, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील प्रभारी कुषी अधिकारी किनवट तर कृषी सेवक तालुक्याच्या ठिकाणावरून गाडा हाकत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणा मुळे तालुक्यात कृषी योजनेचा बट्ट्‌याबोळ होत असून अनेक शेतकरी कृषी विषयक माहिती,शासकीय योजनेपासून वंचित असल्याचा आरोप तालुक्यातील शेतकऱ्याकडून होत आहे तालुक्यात योजनेची माहिती शेतकऱ्यांना पुरवली जात नाही.कुषी कार्यालय भाड्याच्या घरात शहराच्या बाहेर असल्याने कर्मचारी कधी येतात-जातात याकडे कोणाचेही लक्ष नाही,याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याची खंतही शेतकऱ्यानी व्यक्त केली आहे. तालुक्याचा नदीकाठील भाग सोडला तर बहुतांश शेती कोरडवाहू असल्याने शासनाच्या सुधारित तंत्रज्ञानाच्या आधारावर येथील शेतकऱ्यांना अनेक योजना शासन स्तरावर राबविल्या जातात मात्र या सर्व योजनेची प्रत्यक्षात योग्य प्रकारे अंमलबजावणीची जबाबदारी ज्...
Collecter Abhijit Raut : नांदेड जिल्हा निर्यातक्षम केळी उत्पादक शेतकऱ्यांचा हब बनविणार- अभिजीत राऊत -NNL

Collecter Abhijit Raut : नांदेड जिल्हा निर्यातक्षम केळी उत्पादक शेतकऱ्यांचा हब बनविणार- अभिजीत राऊत -NNL

नांदेड, कृषी
नांदेड| अलिकडच्या काळात शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पद्धती सोडून निर्यातक्षम केळी उत्पादकतेवर भर द्यावा. तसेच शेतीसह शेतमाल प्रक्रिया उद्योगाकडे वळावे. उत्पादित केलेला पक्का शेतमाल निर्यात करण्याकडे भर द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच सहकार व पणन विभाग अंतर्गत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी व आत्मा विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने केळी उत्तम कृषी पद्धती या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मॅग्नेट प्रकल्प पुण्याचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, प्रकल्प संचालक आत्मा शिरफुले, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ प...
Forest Department Kumbhakarni in sleep : तूर,हरबरा पिकात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ ; वनविभाग कुंभकर्णी झोपेत -NNL

Forest Department Kumbhakarni in sleep : तूर,हरबरा पिकात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ ; वनविभाग कुंभकर्णी झोपेत -NNL

कृषी, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या मौजे रुई येथील अल्पभूधारक शेतकरी बाळु तळनकर यांच्या शेतातील सोनेरी फुलांनी बहरत असलेले तुर पीक व हरबरा पिक वन्यप्राण्याने नष्ट केल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तूर,हरबरा पिकाची पाहणी करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी पिडीत शेतकरी बाळु तळनकर यांनी केली आहे. सध्या रब्बी हंगामात शेतकर्‍यांनी शेतात तुर पिकासह हरभरा,गहू पिकांची पेरणी केलेली आहे.अशात वन्य प्राणी तुर पिकावर ताव मारुण हरभरा, गहू पिक वाढण्यापूर्वीच नष्ट करीत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या त्रासाला शेतकरी कंटाळले आहे.मागील आठवड्यात रुई येथील अल्पभुधारक बाळु तळनकर यांच्या शेतातील तुर व हरबरा पिकाचे रोही व रानडुक्कराने नुकसान केले असून हातातोंडासी आलेल्या तुर पीकांचे मोठे नूकसान केले.सदरील प्रकार पिडीत अल्पभूधारक शेतकरी बाळु तळनकर व त्या...
Crop competition for Rabi season crops for farmers : शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पिकासाठी पीक स्पर्धा -NNL

Crop competition for Rabi season crops for farmers : शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पिकासाठी पीक स्पर्धा -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास नक्कीच मदत होईल. तसेच शेतकऱ्यांकडून अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषिसहायक, कृषिपर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क ...
forest dam at Osmannagar : सरपंच सौ.शोभाबाई शेषेराव काळम यांच्या पुढाकारातून उस्माननगर येथे वनराई बंधारा -NNL

forest dam at Osmannagar : सरपंच सौ.शोभाबाई शेषेराव काळम यांच्या पुढाकारातून उस्माननगर येथे वनराई बंधारा -NNL

कृषी, नांदेड
उस्माननगर| तालुका कृषि अधिकारी कंधार अंतर्गत आणि कृषी सहायक अधिकारी यांच्या संयुक्तपणे मौजे उस्माननगर ता.कंधार येथे वनराई बंधारा सरपंच सौ.शोभाबाई शेषेराव काळम यांच्या शेतातील नाल्यावर वनराई बंधारा उभारण्यात आला. वनराई बंधारा कामासाठी गावातील लोकांचा लोकसभाग घेण्यात आला. त्यासाठी गावातील सरपंच प्रतिनिधी शेषेराव व्यंकटराव काळम, नवनाथ श्रीराम काळम, सदाशिव भाऊराव घोरबांड रवि बाबाराव ढाले ,कृषि सहाय्पक एस .डी. उबाळे यांनी परिश्रम करुन पाण्याच्पा वाहात्या नाल्यावर शिमिटच्या रिकाम्या बँग मध्ये रेती भरून वनराई बंधारा उभारला. त्यामुळे पाणी अडवूण त्या पाण्याचा उपयोग रब्बी पिकासाठी व जनावरासाठी होईल असे मत सदाशीव घोरबांड यांनी व्यक्त केले व महाराष्ट्र शासन कृषि विभाग तालुका कृषि कार्यालय यांच्या कडून सामाजिक उपक्रम कार्याचे कौतुक केले आहे....
farmer identification number : शेतकरी ओळख क्रमांकासाठी जिल्ह्यात 16 डिसेंबरपासून मोहीम -NNL

farmer identification number : शेतकरी ओळख क्रमांकासाठी जिल्ह्यात 16 डिसेंबरपासून मोहीम -NNL

नांदेड, कृषी
नांदेड| कृषि क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणाम कारकरित्या लाभ देणे सुलभ व्हावे यासाठी राज्यात ॲग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात यासाठी 16 डिसेंबरपासून मोहिम राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोहिमेच्या दिवशी उपस्थित राहून आपला शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. शेतकरी ओळख क्रमांकामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा होणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करुन लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येणार आहे. यामुळे सर्व पात्र लाभार्थी समाविष्ट करुन घेण्यास सहाय्य मिळेल. पिकासाठी कर्ज मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृ...
Creation of website for Farmer Identification Number : शेतकरी ओळख क्रमांकासाठी संकेतस्थळाची निर्मिती -NNL

Creation of website for Farmer Identification Number : शेतकरी ओळख क्रमांकासाठी संकेतस्थळाची निर्मिती -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| भारत सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संकल्पनेनुसार शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी या संकेतस्थळाचा URL www.mhfr.agristack.gov.in याचा वापर करता येईल. या संकेतस्थळावर करावयाच्या कार्यवाहीचे सादरीकरण दिले आहे. त्यानुसार या संकेतस्थळाचा वापर करुन नागरिकांनी स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक करावा. तसेच शेतकरी ओळख निर्माण करण्याची कार्यवाही मोठया प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रचार व प्रसार करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताची आधार संलग्न माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच, भू संदर्भिकृत भूभाग असणारे गाव नकाशे यांचा माहिती संच या बाबीचा समावेश यामध्ये असणार आहे. शेतकऱ्यांचा माहिती संच निर्माण करण्यासाठी मोहीम स्वरुपात शेतक...
Vishnupuri Dam ; रब्बी हंगामासाठी विष्णुपुरी धरणातून शेतकऱ्यांना मिळणार पाणी – NNL

Vishnupuri Dam ; रब्बी हंगामासाठी विष्णुपुरी धरणातून शेतकऱ्यांना मिळणार पाणी – NNL

नांदेड, कृषी
नांदेड l रब्बी हंगामासाठी विष्णुपुरी धरणातून पाणी पली सोडण्यात यावी यासाठी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित शेतकरी पुत्र आमदार आनंदराव बोंढारकर यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. यावेळी रब्बी हंगामासाठी तातडीने पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. येत्या दोन दिवसात रब्बी हंगामासाठी पाणी सोडले जाईल अशी माहिती यावेळी पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिली आहे. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम शेतकरी पुत्र आमदार आनंदराव बोंढाराकर यांनी केले आहे. यावेळी कार्यकारी अभियंता गलधर, उपअभियंता संतोष नाईक, उप अभियंता शिवाजी नरमिटवार शाखा अभियंता उपस्थित होते. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रब्बी हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विष्णुपुरी प्रकल्पातून पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी आ. आनंदराव बोंढारकर यांच्याकडे व...
Cattle census started in the district : जिल्ह्यात पशुगणना सुरु ; नागरिकांनी गणनेत सहभागी होवून माहिती देण्याचे सहकार्य करावे -NNL

Cattle census started in the district : जिल्ह्यात पशुगणना सुरु ; नागरिकांनी गणनेत सहभागी होवून माहिती देण्याचे सहकार्य करावे -NNL

नांदेड, कृषी
नांदेड, अनिल मादसवार| केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक 21 वी पशुगणना 25 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होत आहे. नांदेड जिल्ह्यात या कामासाठी 308 प्रगणक व 79 पर्यवेक्षक यांची नियुक्ती पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आलेली आहे. या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन, पशुधनाची माहिती घेणार आहेत. प्रत्येक गाव व शहरातील प्रगणक नागरिकांशी संवाद साधून माहिती गोळा करणार आहेत. तरी नागरिकांनी या गणनेत सहभागी होऊन योग्य माहिती प्रगणकास देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे. ग्रामीण भागात प्रमुख कृषीपूरक व्यवसाय म्हणून पशुधनास संबोधले जाते. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. दूध, अंडी, लोकर आदींच्या उत्पादनामुळे पोषण सुरक्षेसोबत ग्रामीण उपजीवीकेलाही चालना मिळते. पशुपालन क्षेत्राचा शाश्वत विकास घडविण्यासाठी शास...
error: Content is protected !!