Wednesday, May 13

कृषी

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Rain with hail : राज्यात 27-28 डिसेंबर दरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज -NNL

Rain with hail : राज्यात 27-28 डिसेंबर दरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज -NNL

नांदेड, कृषी, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| 27-28 डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल. शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे. 28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यात यवत...
Brahmakumari Shital Didi : शेती, शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर सेंद्रिय, शाश्वत यौगिक शेतीकडे वळणे गरजेचे – ब्रम्हकुमारी शितल दीदी -NNL

Brahmakumari Shital Didi : शेती, शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर सेंद्रिय, शाश्वत यौगिक शेतीकडे वळणे गरजेचे – ब्रम्हकुमारी शितल दीदी -NNL

कृषी, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| सद्यस्थितीला होत असलेल्या रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीचे व मानवी आरोग्याचे नुकसान होते आहे. शेती व शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर सेंद्रिय व शाश्वत यौगिक शेतीकडे वळणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी जागृत होऊन प्राकृतिक पद्धतीने शेती करावी. यासाठी यौगिक शेती करुन जीवन आनंदमय बनविण्याचा संकल्प सर्व शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन ब्रम्हकुमारी शितल दीदी यांनी केले. त्या हिमायतनगर येथील ब्रम्हाकुमारीज सेवा केंद्रच्या वतीने आयोजित राष्ट्रीय किसान दिनानिमित्त शेतकरी बांधवांचा सन्मान व मार्गदर्शन कार्यक्रमाच्या मंचावरून बोलत होत्या. राष्ट्रीय किसान दिन कार्यक्रमाची सुरुवात भुमातेचे पूजन करून झाली. यावेळी उपस्थित कार्यक्रमात शेतीच्या स्वदेशी पद्धती आणि कमी खर्चात प्रदूषणमुक्त, सकस उत्पादन आणि दर्जेदार अन्न देणार उत्पादन कसे मिळवता येईल आणि आपल्या मातृभूमीला...
Mla shrijaya chavhan ; पशुपालक -शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज दुग्धविकासासाठी ३ कोटीचा निधी द्यावा -आ. अ‍ॅड.श्रीजया चव्हाण -NNL

Mla shrijaya chavhan ; पशुपालक -शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज दुग्धविकासासाठी ३ कोटीचा निधी द्यावा -आ. अ‍ॅड.श्रीजया चव्हाण -NNL

कृषी, नागपूर, नांदेड
नांदेड/नागपूर। विदर्भ - मराठवाड्यातील शेतकऱ्यांना व पशुपालकांना शेतीशिवाय इतर उत्पन्नाचे खात्रीशीर स्त्रोत उपलब्ध व्हावे, यासाठी विदर्भ - मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट केलेल्या 19 जिल्ह्यांसाठी पुरवणी मागणीद्वारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघाच्या आमदार अ‍ॅड.श्रीजया चव्हाण यांनी केली आहे. भोकर विधानसभा मतदार संघातून विजयी झालेल्या आ. अ‍ॅड.श्रीजया चव्हाण यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पशुपालक -शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे. यावेळी आ. अ‍ॅड.श्रीजया चव्हाण यांनी पशुसंवर्धन विभागाच्या पुरवणी मागणीत बोलतांना पशुपालक -शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले आहे. यावेळी आ. अ‍ॅड.श्रीजया चव्हाण म्हणाल्या की,विदर्भ - मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट केलेल्या 19 जिल्ह्...
Sugarcane fire ; ऊस जळालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत घ्या अन्यथा आंदोलन छेडू, गजानन पाटील चव्हाण -NNL

Sugarcane fire ; ऊस जळालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत घ्या अन्यथा आंदोलन छेडू, गजानन पाटील चव्हाण -NNL

कृषी, नांदेड
नायगाव। तालुकातील मौजे बैठक बिलोली शिवारात येथील शेतकरी बाबुराव भीमराव नकाते, रामराव नकाते, राहुल नकाते, यांच्या पाच एकरवर ऊस जळून खाक झाल्याने ही आग 18/ 12 2024 रोजी लागली होती अद्याप कारखानदारक शेतकीय अधिकारी ऊस नेला नाही संबंधित तहसिलदार, विद्युत वितरण कंपनी सह प्रशासनाने शेतकऱ्यांचा मावेजा नुकसान भरपाई दिली नसल्याने याबाबत शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी. अन्यथा आपण आंदोलन छेडणार असल्याचा इशारा गजानन पाटील चव्हाण यांनी दिला आहे. ज्यांचं जळतंय त्यालाच कळतंय अशी खरी असलेली मन खरीच ठरते, जगाला साखर देणारा शेतकऱ्यांना वेळेवर भाकर मिळत नाही कारण जळालेला उसाचे वजन हलके हलके झाले आहेत तरीही झोपेचे सोंग का संबंधित वर्ग घेत आहेत. झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण असा सवाल गजानन चव्हाण यांनी केला आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघातल्या कारखानदार किमान 4800 ते 5000 रुपयांनी प्रति टन खरेदी के...
Release water from Isapur dam : इसापुर धरणाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडा…. लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी -NNL

Release water from Isapur dam : इसापुर धरणाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडा…. लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी -NNL

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| इसापुर धरणाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडण्याची मागणी परोटी तांडा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. मराठवाडा व विदर्भाच्या सीमेलगत वाहणारी पैनगंगा नदी यंदा डिसेंबर महिन्यातच कोरडी पडली असून या नदीच्या लगत असलेल्या हदगाव, हिमायतनगर, किनवट तालुक्यातील गावासह अन्य गावच्या हजारो हेक्‍टर वरील जमीन व जमिनी वरील पिके पाण्या अभावी धोक्यात आली आहे. या नदी लगतच्या हजारो हेक्टर वरील शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेतली असून पाण्या अभावी रब्बी पिके जाण्याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. तर रब्बी पिकासह जनावराचा पाण्याचा पुढील प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात नदीपात्र कोरडेठाक पडलेली दिसत असुन यंदा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर न झाल्याने म्हणावे तसे नदी पात्रात पाणी नाही. त्यामुळे या नदीपात्रा लगत असलेल्या हजारो हेक्टर वरील ओ...
Dr. Shankarao Chavan Agricultural Exhibition : माळेगाव यात्रेमध्ये डॉ.शंकरराव चव्हाण कृषि प्रदर्शन व कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार वितरण समारंभ होणार -NNL

Dr. Shankarao Chavan Agricultural Exhibition : माळेगाव यात्रेमध्ये डॉ.शंकरराव चव्हाण कृषि प्रदर्शन व कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार वितरण समारंभ होणार -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| महाराष्ट्रासह मराठवाड्यात महत्त्वपूर्ण असणाऱ्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेदरम्यान दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत डॉ. शंकरराव चव्हाण भव्य कृषि प्रदर्शन व डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ पुरस्काराचे, शेतकरी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती कृषि विभागाने दिली आहे. यामध्ये मोठ्यासंख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. तसेच स्टॉल नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 29 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या खंडोरायाच्या यात्रेनिमित्त कृषिप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील प्रदर्शनात जिल्ह्यातील फळे, मसाला पिके, भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील फळे, भाजीपाला व मसाला पिकाचे उत्कृष्ट नमुने आणून ठेवावे, प्रदर्शनात ठेवलेल्या फळे, मसाला पिके व भाजीपाल्याच्या नमुन्यास प्रत्येक वाणातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक का...
Agristack campaign started in Nanded district from Monday ; नांदेड जिल्‍हयात सोमवार पासून ॲग्रिस्टॅक मोहिमेस सुरुवात -NNL

Agristack campaign started in Nanded district from Monday ; नांदेड जिल्‍हयात सोमवार पासून ॲग्रिस्टॅक मोहिमेस सुरुवात -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| कृषि क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ देणे सुलभ व्हावे यासाठी राज्यात ॲग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात यासाठी 16 डिसेंबरपासून मोहिम राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोहिमेच्या दिवशी उपस्थित राहून आपला शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. शेतकरी ओळख क्रमांकामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान ,पीककर्ज , पीक विमा, शेतीअनुदान इत्‍यादी विविध योजनांचा लाभ सुलभतेने मिळवता येणार आहे. सोमवार १६ डिसेंबर २०२४ रोजी जिल्‍हा भरात या मोहिमेस सुरुवात होणार आहे. प्रत्‍येक तालुक्‍यातील एका गावात स्‍थानिक लोकप्रतिनिधी, प्रभावशाली व्‍यक्‍ती व संबंधीत उपविभा...
Adv Nilesh Helonde Patil : शेतकऱ्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत प्राधान्याने पोहचण्यासाठी प्रयत्न करा – ॲड निलेश हेलोंडे पाटील -NNL

Adv Nilesh Helonde Patil : शेतकऱ्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत प्राधान्याने पोहचण्यासाठी प्रयत्न करा – ॲड निलेश हेलोंडे पाटील -NNL

कृषी, नांदेड
नांदेड, अनिल मादसवार| शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आहे. तो जगलाच पाहिजे त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना शासन राबवत आहे. या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहचण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करा. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आपलं कुटुंब समजून त्यांच्या पर्यंत जावून आवश्यक मदत करून त्यांना आधार द्या, असे प्रतिपादन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड निलेश हेलोंडे पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपवनसंरक्षक केशव वाबळे, उपजिल्हाधिकारी रोहयो ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. आर. कळसाईत, कौशल्य विकास विभ...
50 percent concession : कर्जाची एकरकमी परतफेड करणाऱ्यांना लाभार्थ्यांना थकीत व्याजात 50 टक्के सवलत -NNL

50 percent concession : कर्जाची एकरकमी परतफेड करणाऱ्यांना लाभार्थ्यांना थकीत व्याजात 50 टक्के सवलत -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज रकमेत एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत (ओटीस) देण्याबाबत सुधारित एकरकमी योजना 31 मार्च 2025 पर्यत लागू करण्यात आली आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेवून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन. झुंजारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड- 431605 किंवा दूरध्वनी क्रमांक (02462) 220865 वर संपर्क साधावा, असे महामंडळाच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. उद्योग भवन येथे सोमवारी निर्यात प्रचालन कार्यशाळेचे आयोजन जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड मार्फत निर्यात प्रचालन कार्यशाळा सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी उद्योग भवन...
812 crore compensation to Nanded district : सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी 812 कोटी नुकसान भरपाई मंजूर -NNL

812 crore compensation to Nanded district : सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी 812 कोटी नुकसान भरपाई मंजूर -NNL

कृषी, नांदेड
नांदेड, अनिल मादसवार| माहे सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे 33 टक्केच्या वर नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रासाठी शासनाकडून 812 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रीया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तालुकानिहाय बाधित शेतकरी संख्या व नुकसान भरपाईची रक्कम कोटी रुपयात आहे. नांदेड तालुक्यासाठी 34 हजार 641 बाधित शेतकऱ्यांसाठी 29 कोटी 85 लाख रुपये, अर्धापूर तालुक्यासाठी 32 हजार 448 बाधित शेतकऱ्यांसाठी 32 कोटी 97 लाख रुपये, कंधार तालुक्यासाठी 73 हजार 650 बाधित शेतकऱ्यांसाठी 71 कोटी 27 लाख रुपये, लोहा तालुक्यासाठी 80 हजार 840 बाधित शेतकऱ्यांसाठी 84 कोटी 40 लाख रुपये, बिलोली तालुक्यासाठी 36 हजार 99 बाधित शेतकऱ्यांसाठी 46 कोटी 47 लाख रुपये, न...
error: Content is protected !!