Thursday, May 14

कृषी

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Vasantrao Naik ; वसंतराव नाईक यांना भारतरत्न द्या- जिल्हाधिकारी यांना निवेदन

Vasantrao Naik ; वसंतराव नाईक यांना भारतरत्न द्या- जिल्हाधिकारी यांना निवेदन

नांदेड, कृषी
नांदेड l महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांना भारतरत्न द्या या मागणीचे निवेदन नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना यांना आज देण्यात आले. यावेळी जगद्गुरु संत सेवालाल महाराज फाउंडेशन नांदेड, डॉक्टर मथुरा दास बजाज उद्यान समिती दक्षिणमुखी हनुमान मंदिर नांदेड, वीज कामगार को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेड, माजी अध्यक्ष राजकुमार जाधव वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना,केंद्रीय मानवाधिकार संघटन जिल्हाध्यक्ष, भारतीय बंजारा कर्मचारी संस्था,अखिल भारतीय बंजारा परिषद, गोर सीकवाडी तसेच गोर सेना या संघटनेतर्फे मागणी करण्यात आली आहे यात मुख्य भूमिका राजकुमार जाधव नांदेड यांची असून सर्व संघटनांनी त्यांना सहकार्य करण्याचे व पाठिंबा देऊन हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक भारताचे रत्न यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी निवेदन देण्यात आले. ते निवेदन आदरणीय ...
Tehsildar Kishore Yadav : पानंद रस्ते घेणार मोकळा श्वास – तहसीलदार किशोर यादव

Tehsildar Kishore Yadav : पानंद रस्ते घेणार मोकळा श्वास – तहसीलदार किशोर यादव

कृषी, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमीत व बंद झालेले गाडी रस्ते, पांदण रस्ते, शेत- शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे पायवाट (Panand roads will get a breath of fresh air) मोकळे करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी १०० दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केलेला आहे. राज्यातील सर्व स्थानिक महसूल प्रशासनाला सदर कालावधीत या बाबत तंतोतंत नियोजन करून प्रभावीपणे कार्यवाही करण्यासंबंधीचे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना प्राप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गाव नकाशात नोंद असतानाही काही शेतकऱ्यांचा विरोध व रस्त्यावरील अतिक्रमणामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. अशा शेतकऱ्यांनी दि.२५ जाने.२०२५ पर्यंत तहसील कार्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाण्यासाठी, श...
Mahareshim Abhiyan : महारेशीम अभियान रथाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

Mahareshim Abhiyan : महारेशीम अभियान रथाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड, कृषी
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील महारेशीम अभियानाची (Mahareshim Abhiyan) सुरुवात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रथाला हिरवी झेंडी दाखवून केली आहे. सन 2025-26 मध्ये महारेशीम अभियान अंतर्गत तुती लागवड, मनरेगा सिल्क, समग्र दोन योजनेअंतर्गत तसेच वैयक्तिक नवीन तुती लागवड करणास उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी दिनांक 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महा रेशीम अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे . नवीन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, रामकृष्ण इमारत, दुसरा मजला, एम एफ होंडा शोरूमच्या बाजूला, जॉन डियर सर्विस सेंटरच्या समोर, हिंगोली रोड नांदेड येथे संपर्क करावा. तसेच तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधून नवीन तुत...
farmer died : बोरगडीत सर्पदंशाने एका शेतकर्‍याचा मृत्यू

farmer died : बोरगडीत सर्पदंशाने एका शेतकर्‍याचा मृत्यू

नांदेड, कृषी
हिमायतनगर| तालुक्यातील बोरगडी येथे शेतात मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना रविवार दिनांक १९ सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटूंब उघड्यावर पडले असून शासनाने मयताच्या कुटूंबीयास अर्थिक मदत देवून दिलासा द्यावा. अशी मागणी केली जात आहे. बोरगडी येथील महेश्वर आडेलू शेनेवाड वय ५० वर्ष हे आपले शेत सर्वे नंबर ९५ मध्ये पेरणी केलेल्या रब्बी हंगामातील मक्याला पाणी देण्यासाठी गेले होते. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तनकटात लपलेल्या अंदाज न आल्याने विषारी सापावर त्यांचा पाय पडल्याने सापाने कडाडून चावा घेतला. गंभीर जखमी शेतकऱ्यांस उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मयत महेश्वर आडेलू शेन्नेवाड वय ५० वर्ष यांच्या पश्चा...
E-KYC : बँकेमधील ई – केवायसी मध्ये सुसूत्रता आणावी

E-KYC : बँकेमधील ई – केवायसी मध्ये सुसूत्रता आणावी

कृषी, नांदेड
नांदेड/नायगाव| ई -केवायसी (E-KYC) साठी नायगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये तालुक्यातील अनेक शेतकरी, महिला कडाक्याच्या थंडीमध्ये रांगा लावून बसत आहेत. अनेक नागरिकांच्या आठ ते दहा दिवस बँकेच्या चकरा मारून सुद्धा केवायसी होत नसल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. बँकेतील ई- केवायसी सुसूत्रता आणावी व नागरिकाची गैरसोय टाळावी अशी आवाहन शेतकरी पुत्रांनी दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर (Pandurang Shinde Manjaramkar) यांनी म्हटले आहे. या निवेदनामध्ये खातेदाराचे होल्ड उठवण्यात यावे, शेतकऱ्यांना शाखेमध्येच पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, सुशिक्षित बेरोजगार युवकांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे , विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून द्यावे अश्या विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी हिंदू युवा परिषदचे रणजित देशमुख, छावा संघटनेचे युवा प्रदेशा...
Ratnakar Patil ; सायाळ येथील प्रगतिशील शेतकरी रत्नाकर पाटील यांना राष्ट्रपतीकडून प्रजासत्ताक दिनी निमंत्रण

Ratnakar Patil ; सायाळ येथील प्रगतिशील शेतकरी रत्नाकर पाटील यांना राष्ट्रपतीकडून प्रजासत्ताक दिनी निमंत्रण

कृषी, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे सायळ येथील शेतकरी रत्नाकर पाटील यांनी 'जैव ऊर्जा आणि सेंद्रीय शेती' या क्षेत्रात केलेले उलेखनिय कार्य आणि योगदानामुळे त्यांना २६ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात भारताच्या महामहीम राष्ट्रपती महोदय यांचेतर्फे विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. तळागाळातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कायम कटिबद्ध असलेल्या रत्नाकर पाटील यांना मिळालेल्या या सनमानाबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. महामहीम राष्ट्रपती मुर्मू यांच्या माध्यमातून मिळालेल्या या मान्यतेसाठी रत्नाकर पाटील यांनी भारतीय पोस्ट ऑफिस नांदेड, सह्याद्री डीडी वाहिनी प्रतिनिधी व भारत सरकारचे सर्व कर्मचारी यांचे आभार मानले आहेत. त्यांना प्रमाणपत्र आणि काही मूल्यवान साहित्य सन्मान म्हणून पाठविण्य...
EKYC : अतिवृष्टी अनुदानसाठी इ के वाय सी करुन घ्या – तहसीलदार किशोर यादव

EKYC : अतिवृष्टी अनुदानसाठी इ के वाय सी करुन घ्या – तहसीलदार किशोर यादव

नांदेड, कृषी
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यात १ ते ३ सप्टेंबर २०२४ यावर्षी झालेल्या अतिवृष्टी मध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाचे नुकसान पंचनामे केले होते. त्या अनुषंगाने शासन स्तरावरून अतिवृष्टी नुकसान रक्कम ३५ कोटी ११ लाख ६८ हजार ४०८ रूपये माहुर तालुक्यासाठी मंजूर झाल्याने सदरील अनुदान रक्कम डी. बी. टी प्रणाली द्वारे शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार असल्याने शेतकर्‍यांनी इ के वाय सी करुन घ्यावे असे आवाहन तहसीलदार किशोर यादव (Tahsildar Kishor Yadav) यांनी केले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी बाधित तालुक्यात एकुण शेतकरी संख्या २६ हजार १७२ आहेत,त्या पैकी दि.९ रोजी पर्यंत शेतकरी ई पोर्टलवर १६ हजार ४०९ शेतकऱ्यांनी आपली माहिती अपलोड केली आहे. परंतु अजून १० हजार १४४ शेतकऱ्यांनी माहीती अपलोड केलेली नाही. माहीती अपलोड क...
Heavy Rain ; अतिवृष्टी बाधित झालेली हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता

Heavy Rain ; अतिवृष्टी बाधित झालेली हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने नुकसान भरपाईपोटी अनुदान वर्ग केले. परंतू तलाठी स्तरावर लापरवाही झाल्याने डीबीटी प्रणालीद्वारे आजही शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. तलाठी ग्रामपंचायत अधिकार्‍यांकडे बोट दाखवतात, तर ग्रामपंचायत अधिकारी तलाठ्यांच्या चुकांकडे अंगुलीनिर्देश करतात. यांच्यातील सारीपाठामुळे आता ई-केवायसी आणि त्यांनी केलेल्या चुकांच्या दुरुस्ती करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत बाधित शेतकर्‍यांच्या शेताचे पंचनामे करण्यात आलीत. अगदी अल्प शेतकर्‍यांची व्हीके नंबर प्राप्त झाली असून उर्वरीत बहूतांश शेतकरी आजही अनुदानापासून वंचित ठेवल्या जात आहे. शेतकऱ्यांनी माहीती अपलोड करुन व्हीके नंबर प्राप्त करुन घेण्यासाठी माहूरच्या तहसिलदारांनी...
soybean : सोयाबीन खरेदीतील अडचणी तातडीने दूर कराव्यात – पणन मंत्री जयकुमार रावल -NNL

soybean : सोयाबीन खरेदीतील अडचणी तातडीने दूर कराव्यात – पणन मंत्री जयकुमार रावल -NNL

कृषी, मुंबई
मुंबई| राज्यात नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (एनसीसीएफ) मार्फत करण्यात येणारी सोयाबीन खरेदी बारदाना अभावी रखडू नये, शेतकऱ्यांना यासाठी कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. बारदान तुटवडा सोयाबीन खरेदीत अडचण ठरू नये यासाठी तात्काळ उपाय योजना करावी. सोयाबीनची खरेदी वेळेत करून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघाने खरेदी रक्कम तीन ते सात दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. अशा सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केल्या. अडचणीतील तात्पुरती उपाययोजना म्हणून सोयाबीन खरेदीसाठी सुस्थितीत असलेले बारदाण शेतकऱ्यांकडून स्विकारले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. हंगाम २०२४-२५ अंतर्गत सोयाबीन हमी भावाने खरेदीबाबतच्या अडचणींवर उपाय योजना आणि खरेदीच्या कामकाजाचा आज पणन मंत्री श्री. रावल यांनी मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी आमदार ...
812 crore approved : सप्टेंबरमधील बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून ८१२ कोटी मंजूर -NNL

812 crore approved : सप्टेंबरमधील बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून ८१२ कोटी मंजूर -NNL

नांदेड, कृषी
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील माहे सप्‍टेबर 2024 मधील अतिवृष्‍टी व पुरामुळे बाधित शेतक-यांना मदतीसाठी शासनाने ८१२ कोटी मंजुर केले आहे. नांदेड जिल्‍ह्यात सप्‍टेबर २०२४ या महिन्‍यात अतिवृष्‍टीमुळे पिक नुकसान झालेल्‍या ७,८३,९१५ शेतकर्‍यांना मदतीसाठी शासनाने ८१२ कोटी ३८ लक्ष इतकी रक्‍कम मंजूर केली आहे. ही रक्‍कम बाधित शेतकरी यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्‍यात येणार आहे. त्‍यासाठी आता पर्यंत जिल्‍हृयातील ३,८३,२९७ इतक्‍या शेतकर्‍यांना ४१७ कोटी ५२ लक्ष इतक्‍या रकमेचे वाटप करण्‍यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्‍यात आली आहे. माहिती भरण्‍यात आलेल्‍या शेतकऱ्याचे संदर्भ क्रंमांक ( व्ही.के. नंबर ) त्‍या त्या गावाच्या तलाठयांना देण्‍यात आले आहेत. ( व्ही.के. नंबर ) या संदर्भ क्रमांकाद्वारे सेतू सुविधा/ आपले सरकार केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणा-या शेतकर्‍यांच्या खात्‍य...
error: Content is protected !!