Friday, May 15

कृषी

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Director Sanika Patil : दुधडच्या नाफेड खरेदी केंद्रावर ३५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी – संचालिका सानिका पाटील

Director Sanika Patil : दुधडच्या नाफेड खरेदी केंद्रावर ३५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी – संचालिका सानिका पाटील

कृषी, नांदेड
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे दुधड येथील नाफेड खरेदी केंद्रावर ३५ हजार १०५ क्विंटल सोयाबीन ची खरेदी करण्यात आली आहे. अशी माहीती खरेदी केंद्राच्या संचालिका सानिका बंडू पाटील यांनी दिली आहे. तालुक्यातील दुधड एन. सी. सी. एफ. प्रभाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने साई कृषी देवना फार्मवर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड तर्फे सोयाबीन ऑनलाईन शेतकरी होते. २ हजार चारशे त्यापैकी २ हजार तिनशे विस शेतकऱ्यांनी सोयाबीन दिले आहे. या सोयाबीन खरेदी केंद्रात एकूण खरेदी ३५ हजार एकशे पाच क्विंटल झाली असून ही खरेदी १ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ ची पुर्ण झाली असल्याची माहीती सानिका पाटील यांनी दिली असून या कामी बंडू पाटील दुधडकर, कैलास पाटील दुधडकर, धिरज शिरफूले, समीर धनवे यांनी परिश्रम घेतले आहेत....
Explanation of Marketing Department : सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाकडून नव्याने मुदतवाढ नाही; पणन विभागाचे स्पष्टीकरण

Explanation of Marketing Department : सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाकडून नव्याने मुदतवाढ नाही; पणन विभागाचे स्पष्टीकरण

कृषी, नांदेड, मुंबई
मुंबई| महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसाचा कालावधी दि. १३ जानेवारी २०२५ रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने एकूण २४ दिवसांची मुदतवाढ दि. ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिली होती. काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात २४ दिवस व तेलंगणामध्ये १५ दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितल्याचे वृत्त प्रसृत झाले. तथापि सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाने दि. ६ फेब्रुवारी २०२५ नंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचे या अनुषंगाने राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे....
State level selection of farmers : रब्बी हंगाम पीक स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरावर निवड

State level selection of farmers : रब्बी हंगाम पीक स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरावर निवड

कृषी, नांदेड, मुंबई
नांदेड| नुकताच राज्यस्तरीय पिकस्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, स्पर्धेत रब्बी ज्वारी व करडई या पिकाचे उत्पन्न व उत्पादन बाबतीत योग्य नियोजन करून भरघोस पिक घेऊन नांदेड जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी राज्यस्तरावर क्रमांक पटकावले आहेत. राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते. ...
Registration is mandatory for private animal servants : खासगी पशुसेवकांना नोंदणी करणे बंधनकारक

Registration is mandatory for private animal servants : खासगी पशुसेवकांना नोंदणी करणे बंधनकारक

कृषी, नांदेड
नांदेड| जिल्हात प्रजनन क्षम पशुंसाठी कृत्रिम रेतनाची सुविधा व अन्य सुविधा पुरविणाऱ्या सर्व खाजगी पशुसेवकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी,असे आदेश सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी जारी केले आहे.त्यामुळे सर्व खाजगी पशुसेवकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी,असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात प्रजनन क्षम पशूंसाठी कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम रेतन करणारे खाजगी पशु सेवक मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील सर्व खासगी कृत्रिम रेतन सेवा पुरविणाऱ्या तंत्रज्ञ, गोठीत रेत मात्रा वितरक व रेत बँकांनी पशुसंवर्धन उपायुक्त किंवा गोजातीय प्राधिकरण यांच्याकडे नाव नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे आदेश काढण्यात आले आहे. कृत्रिम रेतन तंत्रज्ञ म्हणून नोंदणी करण्यासाठी भारतीय पशुवैद्यक परिषदेने मान्यता दिलेल्या विद्यापीठातून पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी, भारत सरकारच्या मैत्री भारत...
Sugarcane Burnt ; शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून राख…माहूर तालुक्यातील मलकागुडा येथील घटना

Sugarcane Burnt ; शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून राख…माहूर तालुक्यातील मलकागुडा येथील घटना

नांदेड, कृषी
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। तालुक्यातील मलकागुडा येथील शेतकरी व उद्योजक नितीन पाटील कन्नलवार यांच्या शेतावरील १० एकर पैकी तीन एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून राख झाले आहे.सदरील घटनेमुळे शेतकर्‍यासह अनेकांनी हळहळ व्यक्त करीत महावितरणाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. माहूर तालुक्यातील महावितरणचे विद्युत पुरवठा जाळे पूर्णतः जीर्ण अवस्थेत आले असून त्यामुळे अनेक ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे.परंतु महावितरण कंपनीला विद्युत खांबावरील जीर्ण अवस्थेत आलेले तार बदलण्याची गरज वाटत नाही,ते नवलच म्हणावं लागेल, नितीन पाटील कन्नलवार यांच्या दहा एकर शेतावर उभा असलेल्या हिरव्या गार ऊसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन एकर क्षेत्रावरील ऊस जळून राख झाले. लागलेल्या आगीची वार्ता मिळताच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे,सामाजिक कार्यकर्ते अमजद खानयांचेसह अनेकांनी घटन...
Soybean purchase extended by six days : सोयाबीन खरेदीला सहा दिवसाची मुदतवाढ – पणन मंत्री जयकुमार रावल

Soybean purchase extended by six days : सोयाबीन खरेदीला सहा दिवसाची मुदतवाढ – पणन मंत्री जयकुमार रावल

कृषी, मुंबई
मुंबई| राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून 31 जानेवारी नंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू रहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला आम्ही प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मान्य केला असून सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिली (Soybean purchase extended by six days) आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. मंत्री श्री.रावल म्हणाले की, राज्यात 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आली असल्याने आज ती मुदत संपली होती. सोयाबीन खरेदीची मुदत वाढावी अशी राज्यातील लोक प्रतिनिधी व शेतकऱ्यांची मागणी होती, ही मागणी लक्षात घेता यासाठी आमचा प्रत्यक्ष पाठपुरावा सुरू होता. आज ती मुदतवाढ मिळा...
The University honored all the farmers : जीवन साधना गौरव पुरस्कार विद्यापीठाने शेतकऱ्याला देऊन समस्त शेतकऱ्यांचा सन्मान केला

The University honored all the farmers : जीवन साधना गौरव पुरस्कार विद्यापीठाने शेतकऱ्याला देऊन समस्त शेतकऱ्यांचा सन्मान केला

कृषी, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शेतीनिष्ठ शेतकरी कृषीभूषण सूर्यकांत देशमुख यांना ‘जीवन-साधना गौरव’ (The University honored all the farmers) पुरस्काराने सन्मानित करून समस्त शेतकऱ्यांचा आणि शेतात कष्ट करणाऱ्यांचा सन्मान केला आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे सहकार विभागाचे कॅबिनेट मंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री मा.ना. बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आज दि.३० जानेवारी रोजी सन २०२३-२४ वर्षासाठीचे पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी परभणी जिल्ह्यातील झरी येथील सूर्यकांतराव देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते ‘जीवन साधना गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप शाल, ग्रंथ, विद्यापीठ स्मृतीचिन्ह, मानपत्र व २५ हजार रुपये रकमेचा धना...
Minister of State Meghna Bordikar : महिलांना भरारी घेण्यासाठीकृषी नवीन प्रगतीचे क्षेत्र :राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

Minister of State Meghna Bordikar : महिलांना भरारी घेण्यासाठीकृषी नवीन प्रगतीचे क्षेत्र :राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

नांदेड, कृषी
नांदेड| कृषी क्षेत्रामध्ये आवश्यक असलेला नीटनेटकेपणा, योग्य वेळेची निवड,नवनवीन प्रयोग, बाजाराचा अभ्यास व तंत्रज्ञानाचा वापर या बाबींचा आता महिलांनी देखील अभ्यास करावा. कृषी क्षेत्र देखील महिलांसाठी प्रगतीची नवी दिशा ठरू शकते असे प्रतिपादन,राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज येथे केले. नांदेड जिल्हयातील कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शेतीमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. मात्र साह्यभूत भूमिका सोडून आता या क्षेत्रातही महिलांनी अधिक सक्रिय होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले .कृषी विज्ञान केंद्र सगरोळी सारख्या केंद्रांनी आता या दृष्टीने देखील प्रयत्न करावे. अशा महिलांना आणखी प्रशिक्षित करावे, असे आवाहनही त्यांन...
Marketing Minister Jayakumar Rawal : गरज भासल्यास केंद्राकडे खरेदीची मुदत वाढवून मागणार – पणन मंत्री जयकुमार रावल

Marketing Minister Jayakumar Rawal : गरज भासल्यास केंद्राकडे खरेदीची मुदत वाढवून मागणार – पणन मंत्री जयकुमार रावल

कृषी, मुंबई
मुंबई| राज्यात नोंदणी झालेल्या 7 लाख 64 हजार 731 शेतकऱ्यांपैकी 3 लाख 69 हजार 114 शेतकऱ्यांकडून 7 लाख 81 हजार 447 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली असून ही खरेदी इतर राज्याच्या तुलनेने सर्वाधिक आहे. देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या राज्यांना मागे टाकत देशांमध्ये सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्राने केली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल (Marketing Minister Jayakumar Rawal) यांनी दिली. याबाबत माध्यमांशी बोलताना पणन मंत्री श्री.रावल म्हणाले, अनेक जिल्ह्यांनी आपले खरेदी उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला अडचण येऊ नये यासाठी वेगाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया करण्याची तसेच दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पोहोचेल यासंदर्भात वेगाने कार्यवाही करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. 31 जानेवारी 2025 पर्यंत खरेदी चालू राहणार असल्याने सोयाबीन खर...
Program of Water Reservoirs : लघु पाटबंधारे योजनेची सातवी प्रगणना तर जलसाठ्यांच्या दुसऱ्या प्रगणनेचा कार्यक्रम

Program of Water Reservoirs : लघु पाटबंधारे योजनेची सातवी प्रगणना तर जलसाठ्यांच्या दुसऱ्या प्रगणनेचा कार्यक्रम

कृषी, नांदेड
नांदेड| केंद्र शासनाकडून राष्ट्रव्यापी लघुसिंचन योजनांची (0-2000 हेक्टर सिंचन क्षमता) (Program of Water Reservoirs) सातवी प्रगणना व जलसाठ्यांची दुसरी प्रगणना करण्यात येत आहे. यात पूर्ण झालेल्या भूपृष्ठाखालील, भूपृष्ठावरील, नागरी आणि ग्रामीण भागातील जलसाठे, कृषि व मृदसंधारण विभागाकडील तसेच व भूजल सर्वेक्षण यंत्रणेसंबंधित योजनांचा समावेश होणार आहे. याप्रगणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन निर्णयानुसार जिल्हा व तालुका स्तरावर संनियंत्रण पुढीलप्रमाणे समिती गठित करण्याचे आदेशीत केले आहे. यंत्रणेतील सर्व कार्यरत प्रगणक यांची सविस्तर माहिती प्राधान्याने जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा सदस्य सचिव (जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती- 7 वी प्रगणना) मृद व जलसंधारण विभाग नांदेड या कार्यालयास सादर करावी, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी ए. एस. कांबळे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनग...
error: Content is protected !!