देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले। येथून जवळच असलेल्या मो लिंबा येथील रोहित्र जळाल्याने जनता ऐन पावसाळ्याच्या दिवसात तीन दिवस पासून विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत. लाईनमेनशी गावकऱ्यांनी संपर्क साधला असता सध्या रोहित्र उपलब्ध नसुन, आल्या नंतर बसवण्यात येईल असे सांगितले असता लाईनमेन मात्र उंटावर बसून शेळ्या हाकण्याचे कामं करत असल्याचे दिसून येत आहे.

देगलूर तालुक्यातील मौजे लिंबा गावं मन्याड नदीच्या काठावर वसलेले असून, गावासभोताली शेती झाडांनी वेढ घातल्याने सततच्या पावसामुळे दिवसा चालने मुश्किल आहे. अस असताना ऐन पावसाळ्यात विद्युत पुरवठा बंद पडल्याने जनता जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. विजेअभावी पिण्याच्या पाण्याची सोय व सांडपाणी कसे करावे असा सवाल गावकऱ्यांना भेडसावत आहे. आजपर्यंत जेव्हा जेव्हा वारा पाऊस पडतो तेंव्हा तेंव्हा हमखास बती गुल होतेच. त्यासाठी कोणत्याही अभियंताने जातीने लक्ष घालून कायम स्वरुपी विद्युत पुरवठा खंडित झाला नाही पाहिजे यांचा विचार करून वीजपुरवठा सुरळीत केला नाही.

त्यामुळे गावकऱ्यांना मुलांचे शिक्षण मोबाईल चार्जिंग अंधारात किडूकमिडूक वर पाय ठेवून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो लाईनमन स्व तरटे सोडले तर सगळेच लाईनमन शहरात बसून उंटावरून शेळ्या हाकत असल्यानेच गावकऱ्यांना अंधारात चाचपडत राहण्याची वेळ आली आहे. इजा सहन करावा लागतो तेव्हा वरिष्ठांनी यांची दखल घेऊन लवकरात लवकर रोहित्र बसून विद्युत पुरवठा सुरळीत करावा असे गावकऱ्यांची मागणी आहे.



