Mahavitaran ; देगलूर तालुक्यातील लिंबा गावं वीज पुरवठा खंडित झाल्याने तीन दिवस पासून अंधारात -NNL
देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले। येथून जवळच असलेल्या मो लिंबा येथील रोहित्र जळाल्याने जनता ऐन पावसाळ्याच्या दिवसात तीन दिवस पासून विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत. लाईनमेनशी गावकऱ्यांनी संपर्क साधला असता सध्या रोहित्र उपलब्ध नसुन, आल्या नंतर बसवण्यात येईल असे सांगितले असता लाईनमेन मात्र उंटावर बसून शेळ्या हाकण्याचे कामं करत असल्याचे दिसून येत आहे.
देगलूर तालुक्यातील मौजे लिंबा गावं मन्याड नदीच्या काठावर वसलेले असून, गावासभोताली शेती झाडांनी वेढ घातल्याने सततच्या पावसामुळे दिवसा चालने मुश्किल आहे. अस असताना ऐन पावसाळ्यात विद्युत पुरवठा बंद पडल्याने जनता जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. विजेअभावी पिण्याच्या पाण्याची सोय व सांडपाणी कसे करावे असा सवाल गावकऱ्यांना भेडसावत आहे. आजपर्यंत जेव्हा जेव्हा वारा पाऊस पडतो तेंव्हा तेंव्हा हमखास बती गुल होतेच. त्यासाठ...
