नांदेडराजकीय

Amit Shah : बाळासाहेब ठाकरे असते तर सिंदूर ऑपरेशनसाठी त्यांनी मोदींचे गळाभेट घेऊन अभिनंदन केले असते – अमित शहा

नांदेड|  देवेंद्र भाऊ मराठवाड्यातून दुष्काळ नष्ट करून नंबर १ महाराष्ट्र करतील असे उद्गार नांदेडच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहां यांनी काढले. भारतीय सेनेने पहेलगाम हल्ल्यातील शहिदांच्या बदल घेत ऑपरेशन सिंदूर राबून दहशतवाद्यांना शोधून मारले. नांदेड गुरु गोविंद सिंग यांची भूमी आहे, इथून पाकिस्तानपर्यंत आवाज पोहोचेल असा प्रचंड आवाज आला पाहिजे असे म्हणत ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी सिंदूर ऑपरेशनसाठी त्यांनी मोदींचे गळाभेट घेऊन अभिनंदन केले असते. उद्धव ठाकरे विरोधकांची भाषा बोलत असून, धोका देऊन त्यांनी आघाडी सरकार बनविले होते असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

1002910364 copy Amit Shah : बाळासाहेब ठाकरे असते तर सिंदूर ऑपरेशनसाठी त्यांनी मोदींचे गळाभेट घेऊन अभिनंदन केले असते - अमित शहा

नांदेड येथे आयोजित विशाल जाहीर सभेत उपस्थितांशी संवाद साधत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, देवेंद्र फडणवीस एकमेव असे आहेत जे पाच वर्ष काम करून पुन्हा निवडून आले आहेत. तसेच यावेळी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उल्लेख करताना अमित शहा म्हणाले, मंचावर उपस्थित भाजपचे कार्यकारी अध्यक्ष व भावी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण. त्यामुळे भाजपचे भावी अध्यक्ष रवींद्र चव्हाण असणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

मी नांदेडच्या भूमीवर आलो आहे, सर्व प्रथम रेणुका देवी यांना प्रणाम करत मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो, असे म्हणत अमित शहा यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी आपले देह त्याग करण्यासाठी या भूमीची निवड केली होती, असेही ते यावेळी म्हणाले. याच भूमीचे वरिष्ठ नेता शंकरराव चव्हाण यांचे देखील त्यांनी स्मरण केले.

DSC 5363 Amit Shah : बाळासाहेब ठाकरे असते तर सिंदूर ऑपरेशनसाठी त्यांनी मोदींचे गळाभेट घेऊन अभिनंदन केले असते - अमित शहा

ऑपरेशन सिंदूर करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले
मला फार काही बोलायचे नाही. परंतु काही दिवसांपूर्वी 22 तारखेला पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांचा खात्मा केला होता. 10 वर्षांपूर्वी येथे कॉंग्रेसची सत्ता होता. पण जेव्हापासून मोदी सरकार आले तेव्हा आपण उरीमध्ये स्ट्राइक केली आणि आता ऑपरेशन सिंदूर करत त्यांच्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरने संपूर्ण जगाला एक संदेश दिला आहे की भारताचे सैन्य आणि जनता आणि सीमेशी छेडछाड करू नये नाहीतर परिणामांना सामोरे जावे लागते.

मोदीजींनी या ऑपरेशनला नाव दिले सिंदूर
9 आतंकवादी स्थानांना आपण 4 तारखेला उद्ध्वस्त केले. 9 तारखेला पाकिस्तानने ड्रोनने हल्ला केला परंतु आपण त्यांचे मिसाईल हवेतच नष्ट केले. आपल्या सैन्याने त्यांचे एयर बेस उद्ध्वस्त करण्याचे काम केले. मोदीजींनी या ऑपरेशनला नाव दिले सिंदूर आणि संपूर्ण जगाला संदेश दिला की आमच्या माता भगिनींच्या सिंदूरला जर कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम आम्ही दाखवून देणार.

31 मार्च 2026 या देशातून नक्षलवाद संपुष्टात आणला जाईल
आता आपल्याला असा भारत बनवायचा आहे की विकासासोबत शक्तिशाली देश असेल. जेव्हा ऑपरेशन सिंदूर तिकडे सुरू होते तेव्हा अजून एक ऑपरेशन सुरू होते. ब्लॅक फॉरेस्ट नावाचे ऑपरेशन सुरू होते. छत्तीसगडमध्ये 5000 फूट उंच डोंगरावर नक्षलवादी अड्डे उध्वस्त करण्यात आले. 31 नक्षली मारले गेले व त्यानंतर आणखी मारले गेले. आता मी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर येऊन सांगून जातो की 31 मार्च 2026 या देशातून नक्षलवाद संपुष्टात आणला जाईल.

IMG 20250526 165 Amit Shah : बाळासाहेब ठाकरे असते तर सिंदूर ऑपरेशनसाठी त्यांनी मोदींचे गळाभेट घेऊन अभिनंदन केले असते - अमित शहा

उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू जल करार रद्द केला. मोदी यांनी स्पष्ट केले की रक्त आणि पाणी एकसाथ नाही वाहणार. तसेच पाकिस्तानसोबतचे सगळे व्यापारी मार्ग बंद केले. ‘ट्रेड आणि टेरर’ एकसाथ नाही चालणार. आणि पुन्हा जर पाकिस्तानने काही केले तर त्यांच्या पिढ्या लक्षात ठेवतील. ऑपरेशन सिंदूरच्या नंतर जेव्हा मोदींनी निर्णय घेतला की हा देशाचा मुद्दा आहे तेव्हा देशाचे खासदार मिळून जगाच्या वेगवेगळ्या देशात जाऊन पाकिस्तानचा आतंकवादी चेहरा उघडकीस आणणार. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की ही कोणाची वरात चालली आहे. या उद्धव सेनेला काय झाले आहे? एकेकाळी हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा होता. आज बाळासाहेब असते तर ऑपरेशन सिंदूरसाठी मोदीजींची गळाभेट घेतली असती. परंतु हे उद्धव सेना यात यांचे देखील खासदार विविध देशात सर्व दलांच्या बैठकीसाठी गेली आहे, तरी देखील यावर नाव ठेवण्याचे काम करत आहे.

देवेंद्र भाऊ मराठवाड्यातून दुष्काळ नष्ट करतील
पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, मराठवाड्यात देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठे कार्यक्रम सुरू केला आहे. येथील दुष्काळी भागांना पाणीपुरवठा करण्याचा. 2019 मध्ये 40 हजार कोटींच्या निधीतून मराठवाडा वॉटर ग्रिड प्रोजेक्ट चालू केला. 11 प्रमुख बांधांना पाईपलाईनने जोडून मराठवाड्याच्या प्रत्येक गावात पाणी पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. मधल्या काळात धोका देत आघाडी सरकार सत्तेवर आली आणि त्यांनी संपूर्ण काम थांबवले. आता देवेंद्र भाऊ पुन्हा मुख्यमंत्री बनले आहेत, या 5 वर्षात मराठवाड्याच्या प्रत्येक गावात पाणी पोहोचवण्याचे काम करणार आहे. सम्राट अशोकाच्या काळापासून नेहमीच दुष्काळ सहन करणारा हा प्रदेश पाण्याने बहरून येईल.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर 1 बनेल
अमित शहा म्हणाले, मोदीजींनी महान मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम केले आहे. एवढ्या वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली जात होती. शरद पवार एवढे वर्ष केंद्रात होते परंतु त्यांनी मराठी भाषेसाठी काहीच केले नाही. मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम केले आहे. येत्या दिवसात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रा पुन्हा एकदा नंबर 1 बनेल. मोदींनी ठरवले आहे की 2047 मध्ये विकसित भारत बनेल आणि मला पूर्ण विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी, टिळक आणि सावरकरांच्या या भूमीचे सर्वात मोठे योगदान असेल. देशात सर्वात आधी विकसित महाराष्ट्र बनेल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!