Amit Shah : बाळासाहेब ठाकरे असते तर सिंदूर ऑपरेशनसाठी त्यांनी मोदींचे गळाभेट घेऊन अभिनंदन केले असते – अमित शहा
नांदेड| देवेंद्र भाऊ मराठवाड्यातून दुष्काळ नष्ट करून नंबर १ महाराष्ट्र करतील असे उद्गार नांदेडच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहां यांनी काढले. भारतीय सेनेने पहेलगाम हल्ल्यातील शहिदांच्या बदल घेत ऑपरेशन सिंदूर राबून दहशतवाद्यांना शोधून मारले. नांदेड गुरु गोविंद सिंग यांची भूमी आहे, इथून पाकिस्तानपर्यंत आवाज पोहोचेल असा प्रचंड आवाज आला पाहिजे असे म्हणत ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी सिंदूर ऑपरेशनसाठी त्यांनी मोदींचे गळाभेट घेऊन अभिनंदन केले असते. उद्धव ठाकरे विरोधकांची भाषा बोलत असून, धोका देऊन त्यांनी आघाडी सरकार बनविले होते असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
नांदेड येथे आयोजित विशाल जाहीर सभेत उपस्थितांशी संवाद साधत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, देवेंद्र फडणवीस एकमेव असे आहेत जे पाच वर्ष काम करून पुन्हा निवडून आले आहे...
