Farmers Leader : शेतकरी नेते प्रल्हाद पाटील थेट बांधावर – तुटपुंजी मदत मान्य नाही थेट मुख्यमंत्र्यांना इशारा
हदगाव, गौतम वाठोरे| ऑगस्ट महिन्यापासून तालुक्यामध्ये सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पैनगंगा नदी कयाधू नदी लाखाडी नदी या तिन्ही नदीला महापूर आला असून त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनी खरडून गेले आहे. यामध्ये शेतकऱ्याचे शेती उपयोगी साहित्य वाहून गेले आहे. तर गावांमध्ये पूर येऊन नागरिकांच्या घरात पाणी जाऊन अनेकांचे संसार उपयोगी साहित्य यामध्ये वाहून गेले आहे.
ऑगस्ट महिन्यापासून सतत धार पाऊस असल्यामुळे तालुक्यातील सर्वच शेतकरी हवालदिल झाले आहे तर शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले आहे अशामध्ये सरकार तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसत आहे सदरील मदत शेतकऱ्यांना मान्य नसून हेक्टरी ५० हजार रुपये मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते प्रल्हाद पाटील हडसणीकर यांनी थेट बांधावरून मुख्यमंत्री यांच्याशी केली आहे केली आहे.
काल त्यांनी हदगांव तालुक्यातील रुई धान...









