Farmer Suicide : मारतळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या — सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे घेतले टोकाचे पाऊल
उस्माननगर (माणिक भिसे) नापिकी, अतिवृष्टी आणि वाढते कर्ज यामुळे शेतकरी वर्गात वाढत चाललेले नैराश्य पुन्हा एकदा उघड झाले आहे. लोहा तालुक्यातील मारतळा येथील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर गोविंद तरफेवाड (वय ४०) यांनी दि. २८ ऑक्टोबर मंगळवारी रात्री स्वतःच्या घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
घटनेनंतर पत्नी व शेजाऱ्यांनी तत्काळ गळफास काढून ज्ञानेश्वर यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर तरफेवाड हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र, मारतळा शाखेकडून पीककर्ज घेतले होते. मागील काही वर्षांपासून सततची नापिकी आणि अतिवृष्टीमुळे शेतीतील उत्पादन घटल्याने...









