Ashok chavhan : ‘बाभळी’बाबत खा. अशोकराव चव्हाण यांनी घेतली विखे पाटील यांची भेट
नांदेड| बाभळी बंधाऱ्यातील महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी वाचवण्यासाठी उपलब्ध पर्यायांवर विचारविनिमय करण्यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी आज राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली.
विधानभवनात झालेल्या या भेटीप्रसंगी आ. राजेश पवार, आ. जितेश अंतापूरकर, आ. श्रीजया चव्हाण व भाजपचे नांदेड महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर उपस्थित होते. जलसंपदा विभागाच्या सचिवांसह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या चर्चेत खा. अशोकराव चव्हाण यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी काही पर्याय सुचवले. तेलंगणाला त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे याविषयी दुमत नाही. मात्र एकीकडे तेलंगणातील श्रीराम सागर प्रकल्पातून पाणी समुद्रात वाहून जात असताना महाराष्ट्राला आपल्या हक्काचे पाणी सर्वोच्च न्यायालयाच्या बंधनामुळे अडवता येत नाही, असे खा. अशोक चव्हाण म्हणाले.
...









