देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर शहरातील मोंढा परिसरात असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे स्थलांतर महावितरण कार्यालयाच्या बाजूस देगलूर-उदगीर मुख्य रस्ता तुकाराम नगरी येथे करण्यात आले.

कार्यक्रमास शाखेचे उद्घाटक म्हणून उपमहा प्रबंधक प्रियाकुमार सरिगाला यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक महाप्रबंधक, सुरज यमयार , तहसीलदार भरत सूर्यवंशी, सहाय्यक गटविकास अधिकारी शाखा व्यवस्थापक सुनील मेटकर, दत्तात्रय कुरुंदे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार , प्रसिद्ध उद्योजक शेख आयुब सेठ आमोदी, डॉ. विनायक मुंडे, संतोष नारलावार, दत्ता गुरुजी पिंडकुरवार, अब्दुल वाजिद, आदींची उपस्थित होते.

या उद्घाटक दिनी ४ महिला बचत गटांना १८ लक्ष रुपये किमतीचे मंजुरी पत्र उपमहाप्रबंधक प्रिया कुमार सारिगाला, सहाय्यक महाप्रबंधक, सुरज यमयार, तहसिलदार भरत सूर्यवंशी यांच्या देण्यात आले. यावेळी उपमहाप्रबंधक म्हणाले की स्टेट बँक ऑफ इंडिया ही दैनंदिन जीवनाशी निगडित बँक असून सर्वसामान्य जनतेची बँक म्हणून ओळखली जाते. गृह कर्ज ,व्यवसाय कर्ज, शेतकरी कर्ज अशा अनेक प्रकारच्या कर्ज सुविधा येथे उपलब्ध आहेत.


शाखा व्यवस्थापकांनी दररोज दोन नवीन ग्राहक बँकेशी जोडण्याचे आवाहनही त्यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील एकमेव मुख्य रस्त्यावर असलेली बँक असून या बँकेचा उपयोग सर्वसामान्य जनतेला नक्कीच होईल असे ते म्हणाले. तर तहसीलदार भरत सूर्यवंशी म्हणाले की एसबीआय म्हणजे सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे. दैनंदिन जीवनात आपणाला अनेक खाजगी बॅंका उपलब्ध आहेत परंतु एसबीआय ही अशी बँक आहे की इथे आल्यानंतर आपणाला विश्वास निर्माण होतो.

कार्यक्रमाची प्रस्तावना शाखा व्यवस्थापक सुनील मेटकर यांनी बँकेविषयी कविता सादर करून केली. सूत्रसंचालन पुरुषोत्तम प्रजापती तर आभार अक्षय मारवाडवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी बँकेचे कर्मचारी बालाजी केळकर, ओम स्वामी, मोहनीश देशपांडे, मनोज कावळे, आकाश गुंडलवार, शेख मोहम्मद अली, संदीप दाऊबे इ. परिश्रम घेतले.

