चोरंबा येथे लपींग आजाराने दोन जणावरे दगावली -NNL

अर्धापूर| तालुक्यातील चोरंबा येथील एका शेतकऱ्यांचे गाय व गोरे लंपींग आजाराची लागण होऊन उपचाराअभावी मृत्यू पावले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून,दोन मुक्या प्राण्यांना जीव गमावावा लागला आहे. परीसरात या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अर्धापूर तालुक्यात नव्याने समावेश झालेल्या चोरंबा (ना )येथील गजानन सुभाषराव लांडगे वय (४२) यांना ६६ आर जमीन आहे,शेतीला जोडधंदा म्हणून गाय,म्हैस शेतात होती,तर शेतीच्या कामासाठी गोरे होते. आजाराने ग्रस्त असल्याने या जनावरांना चाभरा येथे उपचार केले, निदान लागले नाही,अंगावर गाठी असल्याने लंपींग आजाराने गाय व गोरे याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, दोन मुक्या प्राण्यांना जीव गमावावा लागला आहे.

याप्रकरणी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी लक्ष देऊन माहिती घेतली आहे.या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत संबंधित विभागाने करावी व परीसरात उपचार त्वरित करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे,या घटनेमुळे संबंधित अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button