A helping hand for flood-affected Maharashtra : एक हात मदतीचा पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी

नांदेड| भारतातील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. पावसाळा हा शेतकऱ्यांसाठी आशेचा ऋतू असतो, पण त्याच पावसाचे रौद्ररूप धरणीमाते वर संकट कोसळणे. राज्यात यावर्षी अनेक जिल्ह्यांमध्ये नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, खेडी पाण्याखाली गेलीत, शेतमाल व जनावरांचे प्रचंड नुकसान झाले. या आपत्तीमुळे शेतकरी आणि त्यांची कुटुंबे मानसिक, आर्थिक व सामाजिक अडचणीत सापडली आहेत.

पूरस्थितीत शेतकऱ्यांची स्थिती
1. शेतीचे नुकसान – पिके पाण्याखाली गेल्याने हंगामभराचे श्रम वाया गेलेत.
2. जनावरांचा बळी – गायी, म्हशी, बकऱ्या, बैल यांचे जीवित वाचवणे कठीण झालेले आहे.
3. घरांची पडझड – मातीची घरे, झोपड्या वाहून गेलीत, अनेक कुटुंब बेघर झालेत.
4. आरोग्य धोक्यात – पूरपाण्यामुळे, दूषित पाणी यामुळे साथीचे रोग पसरण्याची संभावना नाकारता येत नाही.
5. मानसिक ताण – उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाल्यामुळे शेतकरी नैराश्यच्या विळख्यात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

मुख्यमंत्री सहायता निधी — आशेचा किरण
 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी  आपत्तीग्रस्तांना तसेच दुर्बल घटकांना तातडीची मदत देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीची व्याप्ती वाढवलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.

समाजाची सामूहिक जबाबदारी:
फक्त शासनाची मदत पुरेशी ठरत नाही. पूरस्थिती हा संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे.
सामान्य नागरिक – आपल्याला शक्य तितक्या प्रमाणात आर्थिक मदत करावी.
उद्योगपती व व्यापारी वर्ग – यांनी  मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा.
सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटना – पूरग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष मदत करावी.
विद्यार्थी व युवक मंडळे – कपडे, औषधे, अन्नधान्य संकलन मोहिमा राबवावी.

योगदान कसे द्यावे?
1. ऑनलाईन योगदान – मुख्यमंत्री सहायता निधीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन योगदान द्यावे.  www.cmrf.maharashtra.gov.in
2. धनादेश – Chief Ministers Relief Fund
 Account No 10972433751 IFSC Code SBIN0000300
3. वस्तुरूपात मदत – अन्नधान्य, औषधे, कपडे, चारा इत्यादी.
4. स्वयंसेवा – बचाव व पुनर्वसन कार्यात प्रत्यक्ष सहभाग.

मदत का आवश्यक आहे?
शेतकरी व कुटुंबियांच्या जगण्याला आधार देण्यासाठी.
पिके, घरे व जनावरांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी.
गावोगावी शिक्षण व आरोग्यसेवा पुन्हा उभारण्यासाठी.
पूरबाधित नागरिकांचा मानसिक आधार व आत्मविश्वास वाढविण्यासाठी.
     
पूरग्रस्त शेतकरी आज अडचणीत आहे. आपल्या कष्टाने तोच समाजाला अन्नधान्य पुरवतो, पण आपत्तीच्या वेळी त्याच्या घरात उपासमारीची वेळ येते. म्हणूनच मुख्यमंत्री सहायता निधी हा केवळ सरकारी उपक्रम नसून समाजाच्या सहभागाचा आधारस्तंभ आहे. “शेतकऱ्यांचे दुःख कमी करण्यासाठी दिलेली मदत ही केवळ देणगी नसून भविष्यातील समाजाला उभारण्याचे कार्य आहे.” आपण सर्वांनी या कार्यात हातभार लावणे हीच खरी देशसेवा आहे. अधिक माहितीसाठी जिल्हास्तरीय कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे किंवा टोल फ्री क्रमांक 18001232211 येथे संपर्क साधावा..
गजानन वानखेडे, समाजसेवा अधीक्षक (वै), मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, मो.न. ९९२१९८६०४७

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button