Help farmers : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या

नांदेड| गेल्या पंधरा दिवसात नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे आणि फळबागांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करा अशी मागणी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांनी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली आहे. आज मुंबईत आ. बोंढारकर यांनी ना. कोकाटे यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.

नांदेड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातही या पावसाचा मोठा फटका बसला आहे . बेमोसमी पावसामुळे उन्हाळी पिकांना प्रचंड फटका बसला तर फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे शिवाय पशुधनही या दगावले आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीपूर्वीच हवालदिल झाला आहे.

सततच्या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, ज्वारी ,मका, बाजरी, आंबा , भुईमूग, हळद आणि इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे .अशा परिस्थितीत नैसर्गिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावेत यासाठी आदेशित करावे आणि पंचनामे सादर होताच शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आ. बोंढारकर यांनी केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button