Wednesday, May 27

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Marketing Federation : पणन महासंघामार्फत कडधान्य, तेलबियांची खरेदी

Marketing Federation : पणन महासंघामार्फत कडधान्य, तेलबियांची खरेदी

नांदेड, कृषी
नांदेड| हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व NCCF च्यावतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची (मुंग,उडीद, सोयाबीन व तुर ) खरेदी करण्यात येणार आहे. आधारभूत दराने खरेदी करण्याकरीता ई-पिक पाहणी असलेला 7/12 उतारा आवश्यक आहे. तसेच सदर खरेदी प्रक्रिया ही शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीव्दारे पार पाडली जाणार आहे. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्याकरीता महाराष्ट्र्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पुर्ण करावी, असे आवाहन पणन महासंघामार्फत करण्यात आले आहे....
safely rescued : बेटमोगरा शिवारात अडकलेल्या व्यक्तीला रात्री 11 वाजता काढले सुखरूप बाहेर

safely rescued : बेटमोगरा शिवारात अडकलेल्या व्यक्तीला रात्री 11 वाजता काढले सुखरूप बाहेर

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| मुखेड तालुक्यातील माऊली येथील मौला नबीसाब शेख हा व्यक्ती मौजे बेटमोगरा शिवारामध्ये 28 ऑगस्ट रोजी अडकला होता. हा व्यक्ती बेटमोगरा येथे किराणा खरेदीसाठी आला होता. सायंकाळी माऊलीकडे जात असताना उच्या पुलाजवळ पाणी आल्याने पुलाला लागून असलेल्या शेडमध्ये त्यांनी आश्रय घेतला. परंतु पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यांनी संपूर्ण रात्रभर शेडमध्येच आश्रय घेतला व मोठ्या हिंमतीने तिथेच थांबला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने एसडीआरएफ टीमने संबंधित व्यक्ती पर्यंत पोहोचून त्याला सुरक्षित रात्री 11 वा. बाहेर काढले. या बचाव कार्याचा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले ही वेळोवेळी आढावा घेत होते. एसडीआरएफ टीमचे नेतृत्व श्री. राठोड आणि संकपाळ यांनी करुन मोठ्या धाडसाने हे रेस्क्यूऑपरेशन केले. ही बाब स्थानिक प्रशासनाला समजली तेंव्हा देगलूर उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार मुखेड यांच...
Nanded administration : नांदेड प्रशासनाची तत्परता ! पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी व्यवस्था

Nanded administration : नांदेड प्रशासनाची तत्परता ! पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी व्यवस्था

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी बिलोली तालुक्यातील मौजे नागनी येथील मांजरानदी पात्राचे पाणी गावात शिरून काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागनी गावातील महिला व नागरिक यांना कुंडलवाडी येथे के रामलू मंगल कार्यालय येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. येथे प्रशासनाच्यावतीने त्याच्या निवास व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बऱ्याच गावात पुराचे पाणी आले. अनेक नागरिकांना स्थानिक प्रशासनाच्या वतीने बचाव कार्य करुन सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. नांदेड येथील सीआरपीएफ च्या मदतीने नायगाव तालुक्यातील कुंचेली येथील 80 नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केले आहे. मदतकार्य - नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासन नेहमी दक्ष असून सतत तत्परतेने कार्यवाही करत आहे. 28 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टी...
Strong resentment : पूरग्रस्तांमध्ये पालकमंत्र्यांविरोधात तीव्र नाराजी

Strong resentment : पूरग्रस्तांमध्ये पालकमंत्र्यांविरोधात तीव्र नाराजी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, गोविंद मुंडकर| बिलोली तालुका नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अतुल सावे यांनी रविवारी दौरा केला. मात्र, कुंडलवाडी येथील के. रामलू सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पूरपीडित नागरिकांशी संवाद साधला गेला नाही, यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या स्थलांतरित ग्रामस्थांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली की – 👉 “सामान्यासाठी पालकमंत्री नाहीत, ते फक्त पुढे पुढे करणाऱ्यांसाठीच आहेत... आम्हाला दिलासा नव्हे तर दिखावा दिसत आहे.” पूरग्रस्तांचे म्हणणे आहे की प्रत्यक्ष मदत, अन्नधान्य, निवारा व वैद्यकीय सुविधा तातडीने मिळणे गरजेचे असताना, केवळ औपचारिक दौऱ्यांनी प्रश्न सुटत नाहीत. खरी मदत आणि आधार आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच...
Kandhar Flood : कंधार तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी ; दोन तलाव फुटले : जगतुंग तलाव तुडुंब, ४४ जनावरे वाहून गेले

Kandhar Flood : कंधार तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी ; दोन तलाव फुटले : जगतुंग तलाव तुडुंब, ४४ जनावरे वाहून गेले

नांदेड, महाराष्ट्र
कंधार, सचिन मोरे| गेल्या ४८ तासापासून कंधार तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यातील चिखली,बोरीचा तलाव फुटला तर ४४ जनावरे वाहून गेले.दोन गावे पुराच्या पाण्याने वेढलेले आहेत.बाधित गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. तसेच तालुक्यातील अतिवृष्ठीमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली त्यामुळे शेतकऱ्याचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दि.७ आगस्ट च्या रात्रीपासून कंधार तालुक्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे, जवळपास ३० ते ३५ गावात पूर परिस्थितीत निर्माण झाली आहे. तर तालुक्यातील चिखलीचा भवानी तलाव व बोरीचा तलाव फुटला असून नंदनवनच्या तलावास धोका निर्माण झाल्यामुळे सांडवा खोदण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. तालुक्यातील २१ पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावचा संपर्क तुटला. लिंबोटी धरणाचे १५ दरवाजे उघडल्यामुळे पुराचे पाणी मन्याडीत ...
Prataprao Patil Chikhlikar ; लोहा कंधार तालुक्यात पुरामुळे मोठे नुकसान तात्काळ मदत व पंचनामे करा– आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर

Prataprao Patil Chikhlikar ; लोहा कंधार तालुक्यात पुरामुळे मोठे नुकसान तात्काळ मदत व पंचनामे करा– आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर

कृषी, नांदेड
लोहा l लोहा शहरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुराने हाहाकार उडाला जुन्या शहरासह गोल्डन सिटी, सिध्दार्थनगर येथे घरात पाणी गेले काही भागात दुचाकी, चार चाकी, पाण्याचे टँकर वाहून गेले.अनेकांच्या घरात पाणी साचले या भागात सकाळीच आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भेट दिली लोकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच जायकवाडी भागात पाहणी केली त्यानंतर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तहसील कार्यालयात तहसीलदार, मुख्याधिकारी व कर्मचारी यांनी बैठक घेतली व पूरग्रस्त भागात जेवण व्यवस्था ,राहण्याची व्यवस्था तसेच पंचनामे करण्याचा सूचना दिल्या. लोहा शहरात शुक्रवारी भल्या पहाटे दोन वाजल्या पासून ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार उडाला.सकाळी साडे पाच सहा वाजे पर्यंत झालेल्या पावसामुळे जुन्या शहराला पुराचा वेढा पडला तर शहरातून वाहणाऱ्या दोन्ही नदीला पूर आला जुन्या भागातील कलालपेठ, साठे गल्ली, विस्तारीत पवार गल्लीच...
Eng. Degalurkar ; डाॅ. आंबेडकरांच्या मार्गानेच आमचे भले होऊ शकते असा संदेश अण्णाभाऊंनी दिला – इंजि. देगलूरकर

Eng. Degalurkar ; डाॅ. आंबेडकरांच्या मार्गानेच आमचे भले होऊ शकते असा संदेश अण्णाभाऊंनी दिला – इंजि. देगलूरकर

नांदेड, सोशल वर्क
कहाळा l विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गाने गेल्यामुळेच आमचे भले होऊ शकते असा संदेश साहित्य सम्राट डाॅ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या अखेरच्या काळात दिला असून आपण सर्वांनी त्याच मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन सुप्रसिद्ध साहित्यिक लेखक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते इंजि. देगलूरकर यांनी दिला. सुगाव ता. लोहा जि. नांदेड येथे आयोजित डाॅ. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. गावातील ज्येष्ठ नागरिक बालाजी पांडुरंग चिंचाळे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आपल्या प्रबोधनपर भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांची सुरुवात साम्यवादी विचारांनी झाली असली तरी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते आंबेडकरवादाकडे वळले होते, म्हण...
Minister Atul Save : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : पालकमंत्री अतुल सावे

Minister Atul Save : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करुन अहवाल शासनाकडे सादर करावा. जेणेकरुन नुकसानग्रस्तांना तातडीने नुसान भरपाई देण्यात येईल, असे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत पालकमंत्री अतुल सावे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार रविंद्र चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकार...
MLA Bhimrao Keram : संपूर्णता अभियान सन्मान व आकांक्षा हाटचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घाटन

MLA Bhimrao Keram : संपूर्णता अभियान सन्मान व आकांक्षा हाटचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| केंद्र सरकारच्या नीती आयोगामार्फत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियानात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा सन्मान आमदार भिमराव केराम यांच्या हस्ते एन. के. गार्डन किनवट येथे करण्यात आला. नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत समावेशित 500 तालुक्यात जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात आले होते. यात किनवट तालुक्याने 6 पैकी 4 निर्देशक संतृप्त केले आहेत. किनवट तालुक्याने राज्यातील 27 तालुक्यातुन तिसरे स्थान प्राप्त करून यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते तालुकास्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तत्कालीन गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांना पदक व प्रशस्तीपत्र तर संबंधित विभागप्रमुख, अधिकारी व गावपातळीवरील कर्मचारी यांचा आज प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार भीमराव केराम,...
Government hostel : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शासकिय वसतिगृह प्रवेश

Government hostel : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शासकिय वसतिगृह प्रवेश

करियर, नांदेड
नांदेड| इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत लातूर प्रादेशिक विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्याजमाती व विशेष मागास प्रवर्गातील 12 वी उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींचे शासकिय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोई-सुविधा मोफत पुरविण्यात येतात. तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत भोजनभत्ता व निवासभत्ता पुरविण्यात येतो. सन 2025-26 साठी शासकिय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम या योजनेतंर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश अर्ज 1 ते 18 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर स्विकारले जाणार आहेत. संबंधित जिल्हास्तरावरील वसतिगृहात प्रवेशाबाबत इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या सं...
error: Content is protected !!