Wednesday, May 27

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Illegal sand mining : बेकायदेशीर मरुम उत्खनन अडकले ईटीएस मोजणीच्या फेऱ्यात !

Illegal sand mining : बेकायदेशीर मरुम उत्खनन अडकले ईटीएस मोजणीच्या फेऱ्यात !

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालुक्यातील रुई व मालवाडा शिवारात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरूम उत्खनन झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर तहसील प्रशासनाणे प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे केले असता, सदर उत्खनन पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट निष्पन्न झाले आहे.तसा अहवाल ही तलाठी यांनी तहसीलदार यांना दिला आहे मात्र कार्यवाही चे बिराड ईटीएस (रोव्हर) मोजणीच्या फेऱ्यात अडकले आहे. मालवाडा शिवार गट क्र. ६३ मधील सरकारी गायरान जमिनीतूनही परवानगीशिवाय मुरूम उत्खनन सुरू असल्याचे ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर स्पष्ट झाले आहे.तर रुई येथील गट क्र,५७ मधून ३०० ब्रॉस रॉयल्टी वर दोन पोकलंड च्या सह्हयाने उत्खनन करून १२ हायवा ने दिवस रात्र वाहतूक करण्यात आली आहे.याची सचित्र तक्रार असून ही महसूल प्रशासन या कडे गांभीर्याने घेत नसल्याने गुत्तेदारास मुभा मिळत आहे. दोन्ही प्रकर...
Mahavitaran : हिमायतनगरात गणेशोत्सवात महावितरणचा लपंडाव; भक्तांचा तीव्र संताप

Mahavitaran : हिमायतनगरात गणेशोत्सवात महावितरणचा लपंडाव; भक्तांचा तीव्र संताप

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर, अनिल मादसवार| गणेशोत्सवाला सुरुवात होऊन दोन दिवस झाले असतानाच शहरात सतत पावसाचे वातावरण असूनही गणेशभक्तांमध्ये उत्साह कायम आहे. युवकांसाठी या उत्सवाला वेगळे महत्त्व असताना, महावितरण विभागाकडून मात्र वारंवार विजेचा लपंडाव सुरू आहे. “केवळ हिंदू सण आलेकीच वीजपुरवठा खंडित होतो का?” असा थेट सवाल गणेशभक्त युवकांकडून विचारला जात आहे. हिमायतनगर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून, पोलीस ठाणे हद्दीत शहरातील सुमारे २५ गणेश मंडळांमध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजता आणि संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत गणपती बाप्पाची मनोभावे महाआरती आणि प्रसाद वितरण कार्यक्रम होतो. मात्र या धार्मिक सोहळ्यांदरम्यान वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा भक्तांच्या संतापाचा विषय ठरत आहे. गणेशभक्तांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवसभरात १० ते १५ वेळा वीजपुरवठा खंडित होत असून, त्यामुळे गणेश मं...
traffic check campaign : हिमायतनगरात गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिसांकडून वाहतूक तपासणी मोहीम

traffic check campaign : हिमायतनगरात गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिसांकडून वाहतूक तपासणी मोहीम

क्राईम, नांदेड
हिमायतनगर (अनिल मादसवार) येथील पोलिसांकडून दररोज विना परवाना, विना लायसन्स, ट्रिपल सीट, बिना नंबर प्लेट, टुकार तसेच अल्पवयीन मुलांकडून चालविल्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम राबवित कडक कारवाई करण्यात येत आहे. गणेशोत्सव कोणतेही गालबोट न लागता, शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. येथील श्री परमेश्वर मंदिरासमोर सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेत अवघ्या दोन दिवसांत १० ते १५ वाहनांवर कारवाई करून १२ हजार रुपयांहून अधिक दंड आकारण्यात आला. ही कारवाई ट्रॅफिक मशीनच्या सहाय्याने करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर काही वाहने पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. पोलिस निरीक्षक अमोल भगत यांनी आवाहन केले की, नागरिकांनी कोणतेही अनधिकृत वाहन चालवू नये. कायद्याची वचक राहणे आवश्यक असून उत्सव आनंदात व सुरक्षिततेत साजरा होण्यासाठी सर्वांनी सहकार्य कराव...
Manjara river : मांजरा नदी किना-यावरील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली,अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले

Manjara river : मांजरा नदी किना-यावरील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली,अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले

तेलंगणा, नांदेड, महाराष्ट्र
बिलोली/नांदेड, गोविंद मुंडकर| बिलोली तालुक्यात दि. २७ ऑगस्टच्या मध्यरात्री पासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्वच नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. अशातच तेलंगानातील निजामसागर धरणातून सोडलेल्या २७ गेटमधील निसर्गाच्या पाण्यामुळे बिलोलीच्या सिमेवरुन वाहणाऱ्या मांजरा नदीला पुर आला आहे. या पुरामुळे मांजरा व मन्याड नदी काठावर असलेल्या गावांसह हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नासाडी झाली आहे. धोक्याच्या पातळीवरून वाहणा-या मांजरा नदीच्या पुर परिस्थिती बाबत खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मांजरा व मन्याड नदी काठावरील काही गावातील नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविले असून प्रशासन या पुर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बिलोली तालुक्याच्या सिमेवरुन वाहणाऱ्या मांजरा व मन्याड नदी पात्राच्या पाणी पातळीत गेल्या दोन दिवसांत लक्षणीय वाढ झाली आहे. तेलंगणातील मांजरा नदी पात्राव...
Godavari river bridge ; गोदावरी नदी असलेला नाव घाट पुलावरून पाणी, वाहतूक बंद,मुझामपेठ भागातील नदीकाठच्या नागरीकांचे स्थलांतर

Godavari river bridge ; गोदावरी नदी असलेला नाव घाट पुलावरून पाणी, वाहतूक बंद,मुझामपेठ भागातील नदीकाठच्या नागरीकांचे स्थलांतर

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड l जुन्या नांदेडात जाणाऱ्या येणाऱ्या गोदावरी नदी असलेला नाव घाट पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजुंनी मनपाच्या वतीने बॅरिकेड्स लावुन दोन्ही बाजुंनी बंद करण्यात आली. तर धनेगाव/मुजामपेठ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या नदीकाठच्या जुने व नवे मुजामपेठ येथील जवळपास शंभर निवासस्थानी पाणी शिरल्याने व प्रवाहात वाढ झाल्याने जिल्हा परिषद शाळा जूने मुजामपेठ व नविन मुजा मपेठ येथे कुटूंब स्थलांतरित करण्यात आली असून राहण्याची व जेवणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालय धनेगाव /मुजामपेठ यांच्या कडून करण्यात आली आहे, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ व नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी पाहणी केली आहे. दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे विष्णुपुरी जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने व संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या धनेगाव/ मुजामपेठ ग्रामपंचायत कार्यालय अंतर...
CIDCO ; संततधार पावसामुळे सिडको परिसरातील अनेक निवासस्थानी पाणीच पाणी,आ.हेमंत पाटील, आ.बोढारकर, उपमहापौर विनय पाटील गिरडे,संजय घोगरे यांनी केली पाहणी

CIDCO ; संततधार पावसामुळे सिडको परिसरातील अनेक निवासस्थानी पाणीच पाणी,आ.हेमंत पाटील, आ.बोढारकर, उपमहापौर विनय पाटील गिरडे,संजय घोगरे यांनी केली पाहणी

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड l सिडको हडको परिसरातील भागात दोन दिवसांपासून झालेल्या संततधार व 28 ऑगस्ट रोजी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे सिडको हडको परिसरासह विविध भागातील निवासस्थानी व सिडको भागातील एन.डी.42 भागातील जवळपास दोनशे घरात पाणी शिरल्याने परिसरातील नागरिकांनी घरातील पाणी काढले ,या परिसरातील मुख्य नाला व नालेसफाई न केल्याने, नव्याने मलसिरण लाईन तुंबलेल्या असल्याने पाणी घरात शिरले असल्याचा आरोप केला यावेळी शिवसेना आ.हेमंत पाटील, नांदेड दक्षिण आमदार आनंदराव पाटील बोढारकर व शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या सह भाजपा शहर उपाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांनी पाहणी मनपा आयुक्त यांच्याशी संवाद साधला यावेळी लोकप्रतिनिधी अगोदर व मनपा अधिकारी नंतर आल्याचे पाहावयास मिळाले. वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड दक्षिण महानगर यांच्या वतीने मनपा सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन पंचनामा करून तात्काळ आर्थिक...
Municipal Commissioner ; महापालिकेत पाणी पुरवठा विभागाचा मनपा आयुक्तांनी घेतला आढावा

Municipal Commissioner ; महापालिकेत पाणी पुरवठा विभागाचा मनपा आयुक्तांनी घेतला आढावा

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरास सुरळीत पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीकोणातुन आज दि.२८.०८.२०२५ रोजी *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांनी पाणी पुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरातील पाणी पुरवठा प्रथम प्राधाण्याने सुरळीत करण्याच्या सुचना यावेळी आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यामध्ये काबरा नगर, डंकीन, सिडको व असदवन येथील जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणाऱ्या पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार सद्यस्थितीमध्ये झोन क्र.१ तरोडा-सांगवी, झोन क्र.४ वजिराबाद व झोन क्र.६ सिडको-हडको-कौठा या भागामध्ये दोन दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच झोन क्र.२ अशोक नगर, झोन क्र.३ शिवाजी नगर व झोन क्र.५ इतवारा-देगलुर नाका या भागातील जलकुंभावरुन तीन दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहि...
Rural Hospital Bhokar ; हत्तीरोग रुग्ण यांना दिव्यांग प्रमाणपत्र करिता ग्रामीण रुग्णालय भोकर येथे तपासणी शिबीर संपन्न

Rural Hospital Bhokar ; हत्तीरोग रुग्ण यांना दिव्यांग प्रमाणपत्र करिता ग्रामीण रुग्णालय भोकर येथे तपासणी शिबीर संपन्न

आरोग्य, नांदेड
भोकर l हत्तीरोग रुग्ण यांची तपासणी करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येत असून नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, डॉ. राजाभाऊ बुट्टे निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार, डॉ अमृत चव्हाण जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड, डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या नियोजनानुसार दि. 28 ऑगस्ट रोजी हत्तीरोग रुग्ण तपासणी शिबीर ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दिव्यांग बोर्ड असल्याने येथे शिबीर आयोजित करण्यात आले. हत्तीरोग नियंत्रण उपपथक भोकर, किनी, उमरी, धर्माबाद अंतर्गत गावातीत हत्तीरोग रुग्ण यांना तपासणी करण्यात बोलवण्यात आले होते. डॉ. संतोष अंगरवार सर्जन यांनी 19 हत्तीरोग रुग्ण यांची तपासणी केली त्यांना वर्गवारीनुसार ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यावेळी ग्रामीण रुग्णालय भोकरचे आरोग...
Raje Madhukarrao Deshmukh ; राजे मधुकरराव देशमुखांनी सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक अवकाश समृद्ध केला बालाजी इबीतदार यांचे प्रतिपादन

Raje Madhukarrao Deshmukh ; राजे मधुकरराव देशमुखांनी सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक अवकाश समृद्ध केला बालाजी इबीतदार यांचे प्रतिपादन

नांदेड, करियर
नांदेड l राजे मधुकरराव देशमुख हे बहुआयामी लेखक होते. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. त्यांचे शिकार या विषयावरचे लेखन अद्वितीय असून प्रत्यक्ष जंगलात भटकंती करून त्यांनी हे लेखन केले आहे. राजे देशमुख यांनी केवळ साहित्याच्याच प्रांतात कार्य केले नसून त्यांनी माहूर परिसराचा सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक अवकाश समृद्ध केला. असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबीतदार यांनी केले. श्री जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या शिकारी लेखक राजे मधुकरराव देशमुख यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त उद्घाटक म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जयकुमार भोपी हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक देवीदास फुलारी, उद्योगपती गजानन मुधोळ पाटील, राजकुमार भोपी, कवयित्री सुधाताई नरवाडकर , कवी बापू दासरी, गुरुमाऊली लक्ष्मीबाई, स्वाती आडे आणि मुक्ता ...
Nanded ; मसाप शाखा नांदेडच्या वतीने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप : विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर फुलले हास्य

Nanded ; मसाप शाखा नांदेडच्या वतीने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप : विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर फुलले हास्य

नांदेड, करियर
नांदेड l मराठी साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक साहित्यिकांच्या वतीने संकलित करण्यात आलेल्या निधीतून मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड च्या वतीने मुखेड तालुक्यातील रावणगाव आणि हसनाळ येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले . साहित्यिक देवीदास फुलारी , मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबितदार, उपाध्यक्ष दिगंबर कदम , कार्यवाह प्रा. महेश मोरे , सह कार्यवाह राम तरटे , कवी शिवाजी जोगदंड आदींची उपस्थिती होती. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने या भागातील रावणगाव , हसनाळ आदी गावांना पुराच्या पाण्याचा प्रचंड फटका बसला होता. घरांची पडझड झाली . नागरिकांचे जनजीवन उध्वस्त झाले . खाण्यापिण्याचाही प्रश्न निर्माण झाला. पुराच्या पाण्यात संसार उपयोगी साहित्य वाहून गेले . याचवेळी विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यावरही पुराच्य...
error: Content is protected !!