Wednesday, May 27

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

flood situation : पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ६६ नागरिकांना सुखरूपपणे काढले बाहेर

flood situation : पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ६६ नागरिकांना सुखरूपपणे काढले बाहेर

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| पुरपस्थितीमुळे जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार माजला होता. मदतीसाठी सर्व यंत्रणा धावपळ करीत असताना नांदेड जिल्ह्यातील होमगार्डची टीम सुद्धा तत्परतेने धाऊन गेली. त्यांनी ६९ नागरिकांना पुरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले. जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी तातडीने बचाव व मदत कार्य हाती घेतले. जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून होमगार्डची एक टिम धर्माबाद येथे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे रवाना करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक कार्यालय यांना दिले.त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अधिकारी व ९ जवान यांची टिम तत्परेने दि २९ रोजी धर्माबाद येथे रवाना झाली. त्या मध्ये प्र. केंद्र नायक संतोष जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पलटन नायक बशिरोद्दीन शेख, होमगार्ड जवान सय्य...
Give special package : नांदेड जिल्ह्याला ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी साठी विशेष पॅकेज द्या – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

Give special package : नांदेड जिल्ह्याला ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी साठी विशेष पॅकेज द्या – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड, राजकीय
लोहा| ढगफुटीच्या सदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी झाली. लोहा कंधार सह अन्य तालुक्यात पुरामुळे शेतीचे, मानवी वस्तीचे, छोटे मोठे दुकानदार यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीचे नियम।बाजूला ठेवून नांदेड जिल्ह्यासाठी मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करावे. तसेच नदीकाठच्या शेतीसाठी विशेष बाब म्हणून, शेतकऱ्यांना मदत करावी. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्याकडे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे. लोहा कंधार तालुक्यात २८ व २९ ऑगस्ट रोजी मागील चार फिवसा ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली त्यामुळे पूरपरिस्थिती उदभवली शेती, दुकाने,अनेक गावातब घराचे मोठे नुकसान झाले. जीवनोपयोगी साहित्य पाण्यात गेले, जनावरे वाहून गेली.अनेक ठिकाणी रेसक्यु करून नागरिकांचें जीव वाचविण्यात आले.आमदार प्रतापराव प...
Prof. Devkar : भक्तीमार्गाने चालल्यास जीवनाचे कल्याण निश्चित – प्रा. देवकर

Prof. Devkar : भक्तीमार्गाने चालल्यास जीवनाचे कल्याण निश्चित – प्रा. देवकर

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर| “प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात भक्तीमार्गाला महत्त्व दिले पाहिजे. साधुसंतांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण जीवन जगलो तर भविष्यात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने सांप्रदायिक भक्तीमार्गाने चालत राहावे,” असे प्रतिपादन प्राचार्य मारोती देवकर यांनी केले. कारला पी. येथील सार्वजनिक गणपती मंडळाच्या वतीने संगीत क्षेत्रातील कलावंत सचिन बोपीलवार यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना प्रा. देवकर म्हणाले की, “संत महंतांच्या विचारांनी व प्रेरणेने आपण वागत राहिलो तर समाजाप्रती आपली भावना वेगळी राहील. हरिनामाचा भक्तीमार्ग धरल्यानेच जीवनाचे कल्याण साध्य होऊ शकते. संतांच्या शिकवणुकीतूनच प्रत्येक व्यक्ती चांगल्या मार्गाने जगू शकते.” ते पुढे म्हणाले की, “बोपीलवार परिवाराने तीन पिढ्यांपासून सांप्रदायिक वारसा जपला असून, त्यांच्या भक्तीमार्गामुळेच आज त्यांनी यशाचे ...
Houses collapse : मुसळधार पावसामुळे वारंगटाकळी येथे घरांची पडझड; घरगुती साहित्यांचे नुकसान

Houses collapse : मुसळधार पावसामुळे वारंगटाकळी येथे घरांची पडझड; घरगुती साहित्यांचे नुकसान

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला आहे. वारंगटाकळी गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांना तडे गेले असून, एका शेतकऱ्याचे राहते घर कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून पावसाळ्यात कुटुंबांना इतरत्र आसरा घ्यावा लागत आहे. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शेतकरी केशव कदम यांचे घर रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे अचानक कोसळले. घरातील साहित्य पाण्याखाली गेले असून, कुटुंबीयांना तातडीने घराबाहेर पडावे लागल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. वारंगटाकळी व परिसरातील अनेक कच्ची घरे पडझड झालेली असून काही घरांना तडे गेले आहेत. तरीही महसूल प्रशासनाने पंचनामे स...
gang stealing cattle : लाडका शिवारात गुरे चोरणारी टोळी शेतकऱ्यांनी पकडली ; चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

gang stealing cattle : लाडका शिवारात गुरे चोरणारी टोळी शेतकऱ्यांनी पकडली ; चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| कंधार तालुक्यातील लाडका येथील शेतकऱ्यांच्या आखाड्यावरील म्हशी चोरून नेणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी पाठलाग करून पकडत उस्माननगर पोलिसांच्या हवाली केले असून, या गुन्ह्यात सामील असलेल्या चार आरोपी विरोधात उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. कंधार तालुक्यातील लाडका येथील शेतकरी तानाजी शेषराव शिंदे यांचा लाडका शिवारात आखाडा आहे दिनांक ३० रोजी रात्री ते घरी आले असताना ही संधी साधून त्यांच्या म्हशी चोरटे चोरून घेऊन जात होते ही बाब हळदा येथील बालाजी गोविंद शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती तात्काळ शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर ते लगेच आखाड्यावर आले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चार इसम हे चोरीच्या उद्देशाने म्हशी सोडून घेऊन जात अस...
Leopard : सोनारी परिसरात बिबट्याचा वावर…. शेताच्या बांधावर येऊन मेंढी केली फस्त

Leopard : सोनारी परिसरात बिबट्याचा वावर…. शेताच्या बांधावर येऊन मेंढी केली फस्त

नांदेड, कृषी
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे वाळकेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष अंभोरे यांची मेंढी बिबट्याने फस्त केल्याची घटना आज दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यास वनविभागाने नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली जात आहे. वाळकेवाडी. ता. हिमायतनगर येथील अल्पभूधारक शेतकरी श्री सुभाष अंभोरे यांची शेत जमीन सोनारी बीट असलेल्या वनक्षेत्राच्या लगत आहे. ते सहकुटुंब सहपरिवार शेतातच वास्तव्यास राहत असतात. त्यांच्या शिवाय इतर काही शेतकरी कुटुंब सुद्धा वन्य प्राण्यापासून शेतीचे जतन करण्यासाठी शेतातच निवासाला राहत असतात. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांच्याकडे काही मेंढ्या असून, ते मेंढ्या चारण्यासाठी नियमित सकाळी आठच्या सुमारास मेंढ्या शेतीच्या बांधावर सोडतात. चारत असताना एका मेंढीवर बिबट्याने हल्ला करून ती फस्त केली. सदर बाबतीत वन विभागाकडे नुकसान भरपाईसाठी आण...
Amarnath Rajurkar : कायापालट उपक्रमाची तुलना जगातील कोणासोबतही होऊ शकत – अमरनाथ राजूरकर

Amarnath Rajurkar : कायापालट उपक्रमाची तुलना जगातील कोणासोबतही होऊ शकत – अमरनाथ राजूरकर

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| गेल्या ६३ महिन्यापासून अखंडितपणे सुरू असलेल्या धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या कायापालट उपक्रमाची तुलना जगातील कोणासोबतही होऊ शकत नसल्यामुळे त्यांचे करावे तितके कौतुक कमी असल्याचे प्रतिपादन भाजपा महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी केले. सोमवारी ४८ भ्रमिस्टांची कटिंग दाढी करून त्यांचा कायापालट करण्यात आला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजपा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे भाजपा अध्यक्ष अमरनाथ राजुरकर, डॉ. संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख,लायन्स उप प्रांतपाल योगेश जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महानगर नांदेड , लायन्स क्लब नांदेड सेंट्रल , सन्मित्र फौंडेशन, अमरनाथ यात्री संघाच्या वतीने कायापालट उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी राबविण्यात येतो.जेष्ठ समाजसेवक ॲड.सी. बी.दागडिया यांनी उपक्रमाची माहिती दिली. सोमवारी सकाळी सहा वाजता स...
Wamanrao patil wadgaonkar : वामनराव पाटील वडगावकर यांचा राष्ट्रवादी (अजित पवार गटात) जाहिर प्रवेश

Wamanrao patil wadgaonkar : वामनराव पाटील वडगावकर यांचा राष्ट्रवादी (अजित पवार गटात) जाहिर प्रवेश

नांदेड, राजकीय
नांदेड/हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर भाजपाचे माजी तालुका सरचिटणीस व आमदार बाबुराव कदम यांचे विश्वासू कट्टर समर्थक वामनराव पाटील वडगावकर यांनी भाजपाला रामराम ठोकत व आमदार कोहळीकर यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजितदादा पवार गटात) जाहिर प्रवेश केला आहे. हा प्रवेश आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष एकनाथ पाटील जाधव, तालुकाध्यक्ष अभिषेक लुटे यांच्या मार्गदर्शनाखाली वामनराव पाटील वडगावकर यांनी पक्षाचा झेंडा स्वीकारला. याचसोबत अभिलाष जयस्वाल, उबाठा गटाचे अमोल धुमाळे, प्रहारचे कार्यकर्ते संतोष टोकलवार, गणेशराव पाटील विरसनीकर, दत्तरामजी माने चाथारीकर, शरदचंद्र पवार गटाचे आकाश सूर्यवंशी आदीसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्...
Ashokrao Chavan : अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले – खा. अशोकराव चव्हाण

Ashokrao Chavan : अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले – खा. अशोकराव चव्हाण

नांदेड, राजकीय
नांदेड| यंदाच्या खरिप हंगामात मे ते ऑगस्ट या चारही महिन्यात नांदेड जिल्ह्याला प्रतिकूल निसर्गाचा जबर फटका बसला. जिल्ह्यातील ९३ पैकी ८८ मंडळात अतिवृष्टी झाल्याने पिकांची परिस्थिती होत्याचे नव्हते झाल्यासारखी आहे. रस्ते, पूल, घरे, पशुधनासह शेतीचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पाहता जिल्ह्याला भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. शनिवारी व रविवारी दोन दिवस त्यांनी नांदेड शहर व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना नांदेड जिल्ह्यातील एकंदर परिस्थिती अतिशय भीषण असल्याचे ते म्हणाले. नांदेड जिल्ह्यातील ५३ महसुली मंडळांमध्ये किमान ३ किंवा त्याहून अधिक वेळा अतिवृष्टी झाली. सोयाबीन व कपाशी या दोन प्रमुख पिकांसह...
Traffic rules : टायगर ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने वाहातुकीचे नियम रस्ता जनजागृती अभियान

Traffic rules : टायगर ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने वाहातुकीचे नियम रस्ता जनजागृती अभियान

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| कायदा हा सर्वांसाठी समान असून तो जनहितासाठी असतो. त्याचे पालन करणारा प्रत्येक ऑटो रिक्षा चालक खरा कर्तव्यदक्ष चालक ठरतो, या उद्देशाने टायगर ऑटो रिक्षा चालक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने वाहतूक नियम जनजागृती व रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम रविवारी वजीराबाद चौकात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अजय साखळे, जमादार शिंदे व माने उपस्थित होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ऑटो रिक्षा चालक हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून, त्यांच्या प्रतिमेत सकारात्मक बदल घडवणे आणि कायद्याबद्दल आदर निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे. यावेळी सर्व रिक्षाचालकांनी हातात फ्लेक्स घेऊन वाहतूक नियमांचे पालन करण्...
error: Content is protected !!