Tuesday, May 26

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Guardian Minister Atul Save : अतिवृष्टीग्रस्त बाधितांना लवकरच मदत केली जाईल -पालकमंत्री अतुल सावे

Guardian Minister Atul Save : अतिवृष्टीग्रस्त बाधितांना लवकरच मदत केली जाईल -पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्ह्यात मागील महिण्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचे पंचनामे प्रशासनाने करुन त्यांचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासन सकारात्मक असून लवकरच बाधितांना मदत उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस पथकाने धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी ...
Stormy winds destroy sparrow nests : वादळी वाऱ्याने चिमण्यांची घरे उध्वस्त; हिमायतनगर तालुक्यात पक्षीप्रेमींमध्ये चिंता

Stormy winds destroy sparrow nests : वादळी वाऱ्याने चिमण्यांची घरे उध्वस्त; हिमायतनगर तालुक्यात पक्षीप्रेमींमध्ये चिंता

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर (अनिल मादसवार) नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामुळे झाडांवर टांगलेली चिमणी पाखरांची घरटी उध्वस्त झाली. पिलांसाठी सुरक्षितता व खाद्य-पाण्याची सोय म्हणून चिमण्या पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात घरटी (खोपा) बांधतात. मात्र, निसर्गाच्या या चक्रव्यूहात केवळ दहा दिवसांचेच आयुष्य या पिलांना लाभले काय..? असा हृदयस्पर्शी प्रश्न चिमणीप्रेमी व पक्षीसंवर्धन कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे उध्वस्त झालेली घरटी पाहून पक्षीप्रेमींच्या डोळ्यात चिंता व दु:ख उमटले असून, भविष्यात अशा नाजूक जीवांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे....
hunger strike : हिमायतनगरच्या वार्ड क्रमांक 16 मधील समस्याग्रस्त नागरिकांचे आमरण उपोषण सुरु

hunger strike : हिमायतनगरच्या वार्ड क्रमांक 16 मधील समस्याग्रस्त नागरिकांचे आमरण उपोषण सुरु

नांदेड, व्हिडीओ, सोशल वर्क
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 16 मध्ये कार्लेकर हॉटेल जवळील नाल्याचे बांधकाम तसेच प्रभागातील रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. परिसरात पावसाचे व नाल्याचे पाणी शिरणार नाही याची कायमस्वरूपी सोय करावी. या मागणीसाठी स्थानिक युवकांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मागील तीन महिन्यांपासून नागरिकांकडून वारंवार तक्रारी व निवेदनं दिली जात असूनही नगरपंचायती कडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. थोडा पाऊस झाला तरी परिसरात पाणी साचून ते थेट घरात घुसते. त्यामुळे घरगुती साहित्याचे नुकसान होऊन नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागतात, अशी माहिती समोर आली आहे. अतिवृष्टीच्या काळात खासदार नागेश पाटील व नगराध्यक्ष अब्दुल अखिल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या...
bombardment movement : नांदेड महापालिकेवर शिवसेनेचा( ठाकरे) जोरदार बोंब मारो आंदोलन

bombardment movement : नांदेड महापालिकेवर शिवसेनेचा( ठाकरे) जोरदार बोंब मारो आंदोलन

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड महानगर शिवसेनेच्या वतीने महापालिकेसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांच्या पुढाकारातून जोरदार आंदोलन करून महापालिकेचा तीव्र निषेध करण्यात आला. महापालिकेच्या गलतान कारभारामुळे शहरातील गोरगरीब जनतेच्या घरात पाणी शिरले. हजारो लोकांच्या घरातील संसार उपयोगी वस्तूचे नुकसान झाले. पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबास रुपये 25000 आर्थिक मदत द्यावी. घरकुल महा घोटाळ्याचे इडीमार्फत चौकशी करण्यात यावी. कचरा उचलण्याचे शहरातील 100 कोटीचे टेंडर 250 कोटीला दिले. 150 कोटीचे वाटेकरी कोण त्याचा जबाब विचारण्यासाठी शहरातील शेकडो शिवसैनिकांनी पूरग्रस्त महिला व नागरिकांनी महापालिकेला घेराव घालून जोरदार आंदोलन केले. यावेळी शहरातील पूरग्रस्त महिला. ज्येष्ठ शिवसैनिक शिवसेना पदाधिकारी महानगरपालिकेच्या गलतान कारभाराच्या विरोधात जोरदार निषेध व्यक्त करून जोरदार घोषणाब...
Thift arested : स्थानिक गुन्हे शाखेने मंदिर चोरी व घरफोडी प्रकरणातील दोन आरोपीना केले जेरबंद, ₹32,000 रोख जप्त

Thift arested : स्थानिक गुन्हे शाखेने मंदिर चोरी व घरफोडी प्रकरणातील दोन आरोपीना केले जेरबंद, ₹32,000 रोख जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील भाग्यनगरातील संगमेश्वर मंदिर व लहुजी नगर, बारड येथील घरफोडी प्रकरणातील दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून ₹32,000 रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीं मध्ये सुरज रामकिशन घेणे (वय 24, रा. लक्ष्मीनगर, मालटेकडी रोड, नांदेड, ह.मु. नागाराम झोपडपट्टी, निजामाबाद), अक्षय उर्फ भोप्या सुरेश कांबळे (वय 23, रा. आंबेडकर नगर, जनता कॉलनी, नांदेड) यांचा समावेश असून, आरोपींनी कबुली दिली की, त्यांनी अंदाजे दोन महिन्यांपूर्वी संगमेश्वर मंदिर व बारड येथील घरफोडीतून चोरी केली होती. ही कारवाई अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि उदय खंडेराय यांच्या नेतृत्वात पोउपनि नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाने केली. आरोपींना मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी भाग्यनगर पोलीस स्टेशनकडे सुपूर्द कर...
Police Action : घरफोडी करणारी अंतरजिल्हा टोळी नांदेड पोलिसांच्या जाळ्यात

Police Action : घरफोडी करणारी अंतरजिल्हा टोळी नांदेड पोलिसांच्या जाळ्यात

नांदेड, क्राईम
नांदेड| ग्रामीण हद्दीतील पद्मजा सिटी येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडने तीन सराईत आरोपींना जेरबंद केले. या आरोपींकडून नगदी 11,37,000 रुपये, सोन्याचे अंदाजे 145 तोळे दागिने (किंमत 16,63,000 रुपये) तसेच ब्रिझा कार असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली तर उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलींद सोनकांबळे व त्यांच्या पथकाने केली. यातील आरोपी शेख शफी उर्फ शफी बिल्डर (रा. उमर कॉलनी, नांदेड), शेख अमेर उर्फ एडी अम्मू (रा. घरकुल, गोवर्धन घाट, नांदेड), नंदकिशोर वामन देवसरकर (रा. देवसरी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) यांना अटक करण्यात आली असून, आरोपींनी कबुली देताना, त्यांनी पद्मजा सिटीतील घरफोडी नियोजनबद्ध पद्धतीने केल्याच...
Danger of electric wires : कामारी गावात विजेच्या तारांचा धोका; अन्यथा २५ सप्टेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा

Danger of electric wires : कामारी गावात विजेच्या तारांचा धोका; अन्यथा २५ सप्टेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे कामारी येथे ठिकठिकाणी विजेच्या तारांचे जाळे खाली लोंबकळत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना थेट डोक्याला लागतील इतक्या खालपर्यंत तारा आल्या असून, ग्रामस्थांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. तात्काळ मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या २५ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा अशोक पाटील यांनी दिला आहे. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून वाकलेले विद्युत खांब, जिर्णावस्थेत असलेल्या तारांमुळे वारंवार विज खंडित होणे व ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे बिघाड यामुळे गावातील विद्युत उपकरणेही वारंवार खराब होत आहेत. प्रशासन व महावितरण यांना वारंवार विनंती करूनही याची दखल घेतली जात नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. हि बाब लक्षात घेऊन गावातील उपसरपंच अशोक पाटील शिरफुले कामारीकर यांनी स्पष्ट इशार...
Marathi language : मराठी भाषेच्या प्रचारासाठी निबंध लेखन व मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा स्पर्धेचे आयोजन

Marathi language : मराठी भाषेच्या प्रचारासाठी निबंध लेखन व मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा स्पर्धेचे आयोजन

करियर, नांदेड, मुंबई
नवी दिल्ली| मराठी भाषेचा प्रसार आणि विकास व्हावा यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली आणि राज्यमराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध लेखन आणि मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 01 ऑक्टोंबर २०२५ आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकी २५ रुपये शुल्क आकारले जाईल, आणि दोन्ही परीक्षा प्रत्येकी दोन तासांच्या असतील. स्पर्धेत विविध वयोगटांसाठी तीन गट आणि वैविध्यपूर्ण विषय ठेवण्यात आले आहेत. गट क्र. १ (१२ ते १६ वर्षे, १५०-५०० शब्द) मध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर - एक अलौकिक व्यक्तिमत्त्व, ‘खेळामुळे मिळणारे जीवनाचे धडे, ‘माझी आई सर्वकाही हे विषय आहेत. गट क्र. २ (१७ ते ३० वर्षे, ५००-१००० शब्द) मध्ये ‘यशासाठी आहार आणि विहार, ‘फेक बातम्या व सूचनांचा अतिभार - एक गंभीर विषय’...
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची 17 सप्टेंबर पासून प्रत्येक गावात सुरूवात

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची 17 सप्टेंबर पासून प्रत्येक गावात सुरूवात

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| राज्यात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” या महत्त्वाकांक्षी अभियानाची सुरूवात बुधवार 17 सप्टेंबर 2025 पासून होत आहे. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे अर्धापूर तालुक्यात मौ. पिंपळगाव (म.) येथे ग्रामसभेत उपस्थितीत राहून मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानाचे उद्घाटन करुन या अभियानाची सुरूवात करणार आहेत. जिल्हयातील प्रत्येक गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन 17 सप्टेंबर रोजी करण्यात आले असून एका गावात स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरूवात करणार आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात गावस्तरावरील प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार...
Maharashtra Gramin Bank : महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकऱ्यांच्या थकीत कर्जासाठी शेतकरी नवसंजीवनी व शेतकरी समाधान योजना जाहीर

Maharashtra Gramin Bank : महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकऱ्यांच्या थकीत कर्जासाठी शेतकरी नवसंजीवनी व शेतकरी समाधान योजना जाहीर

कृषी, नांदेड
नांदेड| थकीत पिककर्जदारसाठी तसेच शेतीविषयक इतर कर्जदारासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्यावतीने शेतकरी नवसंजीवनी व शेतकरी समाधान योजना जाहीर केली आहे. ही योजना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन त्यांच्यावरील थकीत कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन बँकेचे जिल्हा समन्वयक तथा क्षेत्रीय व्यवस्थापक व जिल्हा उपनिबंधक नांदेड सहकारी संस्था यांनी संयुक्तपणे केले आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून विविध भागात आलेला ओला किंवा कोरडा दुष्काळ, कोविड महामारी तसेच काही ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीमुळे बँकेचे बरेचसे शेतकरी थकीत झाले असून त्यांची आर्थिकपत खालावली आहे. आपल्या जिल्ह्यात या कारणास्तव शेतकरी त्यांच्या पीक कर्ज नूतनीकरण करण्यात तसेच शेतीविषयक इतर कर्जाची परतफेड करण्यास अ...
error: Content is protected !!