The goal of the Sangh : समाज सुसंघटित करून भारताला परमवैभव प्राप्त करून देणे हेच संघाचे ध्येय
हदगांव, गौतम वाठोरे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हदगाव नगराचा विजयादशमी उत्सव स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा येथे संपन्न झाला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्थापनेला या विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण होत असून, स्वाभाविकच त्याचा उत्साह संपूर्ण स्वयंसेवकांमध्ये आहे.
संघाच्या या शंभर वर्षाच्या प्रवासात संपूर्ण हिंदू समाजाचे आणि स्वयंसेवकांच्या परिवाराचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. समाजाच्या सहकार्यामुळेच हा शताब्दी प्रवास यथोचित झाला आहे. परंतु संघाचे कार्य अविरत अखंडपणे चालणारे आहे. मातृभूमीला परम वैभवसंपन्न करण्यासाठी सर्वांना सोबत मिळून काम करावे लागणार आहे. संघाच्या पंच परिवर्तनातून समाज परिवर्तन आपल्याला घडवून आणायचे आहे असे वक्तव्य उत्सवाचे प्रमुख वक्ते आत्माराम बावस्कर यांनी यावेळी केले.
यावेळी व्यासपीठावर डॉ.सौ. जयश्री पवार ( योगतज्ञ ) व श्री जगदीश तावडे ( जिल्हा कार्यवाह ) हे उपस...









