Thursday, May 14

लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

समाजात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य नांदू द्या… NNL

समाजात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य नांदू द्या… NNL

नांदेड, लेख
बदलापूर येथील घटनेने महाराष्ट्रातील तमाम जनतेचे विशेषतः महिला व मुलींचे मन सुन्न करून टाकले आहे. पोलिसांचा समाजावर असलेला वचक दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित खटल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे . त्यामुळे सर्वसामान्य जनता पोलीस प्रशासन व न्यायव्यवस्था या दोन्हीच्या बाबतीत वारंवार अविश्वास दाखवत असते. तरीही बदलापूरच्या घटनेत न्यायालयाने पोलीस प्रशासनावर कडक शब्दात ताशेरे ओढले. सद रक्षणायः खलनिग्रहणायः या ब्रीदवाक्याची आठवण करून द्यायची वेळ आली आहे, अशा कठोर शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांवर ताशेरे ओढले. पोलीस प्रशासन आपल्या कामात कुठेतरी कमी पडत आहे, याची जाणीव सर्वांनाच झालेली आहे. उच्च न्यायालय पोलीसांवर ताशेरे ओढत आहे, ही नवी बाब नाही तरी परंतु वारंवार पोलिसांना जागे करावे लागते ही वेळ न्यायालयावर किंवा राज्य शासनावर का येते ? याचा विचार प...
Baswantrao Mundkar : स्वातंत्र्य चळवळीतले “बाप” माणूस- बसवंतराव मुंडकर -NNL

Baswantrao Mundkar : स्वातंत्र्य चळवळीतले “बाप” माणूस- बसवंतराव मुंडकर -NNL

नांदेड, लेख
स्वतःसाठीच तर सगळे जगतात पण दुसऱ्यासाठी ही जगता आलं पाहिजे... आपलंही आयुष्य देश सेवेसाठी परमेश्वराकडे मागता आलं पाहिजे... आपलं जीवन हे आपल्यासाठी नसून आपल्या देशासाठी आहे आणि या देहाचा वापर सत्कार्यासाठी लागावे या उदात्त हेतूने प्रेरित होऊन गोवा मुक्ती संग्रामात धाडसाने झोकून देऊन गोवा मुक्तीसाठी झटलेले स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत असताना त्यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील अनेक उपेक्षित स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण व्हावे हा या लेखणाचा शुद्ध हेतू..... भारत स्वतंत्र झाला मात्र गोवा हा पोर्तुगीज यांच्या ताब्यात होता. तेथील हिंदू वरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत असताना अनेक ठिकाणी हत्याकांड,जबरदस्ती धर्मांतर या बाबीमुळे अनेकांच्या मनात असंतोष निर्माण केलेले होते . समता, बंधुता आणि न्याय भूमिका अंगी कारणारे तसेच सर्वांसाठी स्वात...
Shri Krishna Janmashtami ; श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व  – NNL

Shri Krishna Janmashtami ; श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व  – NNL

धार्मिक, लेख
पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. त्याने बालपणापासून आपल्या असाधारण कर्तृत्वाने भक्तांवरील संकटे दूर केली. प्रतिवर्षी भारतामध्ये मंदिरे, धार्मिक संस्था येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. उत्सव साजरा करतांना प्रांता-प्रांतानुसार उत्सव साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. उत्सवाच्या निमित्ताने बरेच लोक एकत्र येऊन भक्तीभावाने हा उत्सव साजरा करतात. यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी 6 सप्टेंबर या दिवशी आहे.या लेखात आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचे  महत्त्व पहाणार आहोत.   1. महत्त्व - जन्माष्टमीला श्रीकृष्णतत्त्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. या तिथीला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप, तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीकृष्णतत्त्वाचा अधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते. मासिक पाळी, अशौच आणि स्पर्...
PM- Kisan’ and ‘Namo Shetkari : पीएम- किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ -NNL

PM- Kisan’ and ‘Namo Shetkari : पीएम- किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ -NNL

लेख
देशासह राज्याची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. शेतकरी सशक्त आणि बळकट झाले पाहिजेत हीच केंद्र व राज्य शासनाही भूमिका आहे. याच भूमिकेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान, तर राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ‘ नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली. यामुळे राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचा संदेश दिला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरिता केंद्रशासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि राज्य शासनाच्यावतीने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील  पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 36 हजार 816 कोटी 85 लाख रुपये जमा करण्यात आले आ...
Significance of Rakshabandhan festival : रक्षाबंधन सणाचे महत्त्व  -NNL

Significance of Rakshabandhan festival : रक्षाबंधन सणाचे महत्त्व  -NNL

नांदेड, लेख
श्रावण पौर्णिमेला येणार्‍या रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो. सहस्रो वर्षांपासून चालत आलेल्या रक्षाबंधन या सणामागील इतिहास, शास्त्र, राखी सिद्ध करण्याची पद्धत आणि या सणाचे महत्त्व सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून विशद केले आहे. 1. इतिहास - पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले व नारायणाची मुक्तता केली. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. ‘बारा वर्षे इंद्र आणि दैत्य यांच्यात युद्ध चालले. आपली 12 वर्षे म्हणजे त्यांचे 12 दिवस. इंद्र थकून गेला होता आणि दैत्य वरचढ होत होते. इंद्र त्या युद्धातून स्वतःचे प्राण वाचवून पळून जाण्याच्या सिद्धतेत होता. इंद्राची ही व्यथा ऐकून इंद्राणी गुरूंना शरण गेली. गुरु बृहस्पति ध्यान ला...
Significance of Narli Purnima : नारळी पौर्णिमेचे महत्त्व -NNL

Significance of Narli Purnima : नारळी पौर्णिमेचे महत्त्व -NNL

नांदेड, लेख
प्रस्तावना : वरुणदेवतेची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर सदैव रहावी, यासाठी समुद्रकिनारी रहाणारे आणि समुद्राच्या माध्यमातून आपला चरितार्थ चालवणारे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करतात. ही पूजा करण्यामागील शास्त्र  या लेखातून स्पष्ट केले आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. नारळी पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व ! - पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती अधिक प्रमाणात येते, तर अमावास्येला ओहोटी अधिक प्रमाणात येते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला प्रार्थना करून फुले आणि श्रीफळ अर्पण करतात. पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत होऊन त्याने त्याची मर्यादा ओलांडू नये, अशी त्याला प्रार्थना केली जाते. समुद्र शांत झाल्यानंतरच मासेमार आणि जहाजांद्वारे समुद्री प्रवास अन् व्यापार करणारे लोक त्यांची निहित कर्मे पूर्ण करू शकतात. सूर्याच्या उष्णते...
Creation, Scope and Importance of Sanskrit Language : संस्कृत भाषेची निर्मिती, व्याप्ती आणि महत्त्व ! -NNL

Creation, Scope and Importance of Sanskrit Language : संस्कृत भाषेची निर्मिती, व्याप्ती आणि महत्त्व ! -NNL

लेख, नांदेड
दरवर्षी श्रावण पौर्णिमेला 'संस्कृत दिन' ही साजरा केला जातो. संस्कृत ही ईश्वरानेच निर्माण केलेली भाषा आहे. जगातील सर्वच भाषांची ती जननी आहे. संस्कृतचे महत्त्व आज पाश्चात्त्यांनीही ओळखले आहे. पाश्चात्त्य संगणकशास्त्रज्ञ अशा भाषेच्या शोधात होते की, जिचा संगणकीय प्रणालीत वापर करून, तिचे जगातील कोणत्याही आठ भाषांत तत्क्षणीच रूपांतर होईल. त्यांना तशी भाषा संस्कृत’च आढळली. संस्कृत ही संगणकीय प्रणालीसाठी उपयुक्त असणारी जगातील सर्वोत्तम भाषा आहे. वेद, उपनिषदे, गीता आदी मूळ धर्मग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. ज्या देववाणी संस्कृतने मानवाला ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवला, त्या देववाणीलाच कृतघ्न मानव विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील अनेक राजकीय नेते नष्ट करायला सरसावले आहेत, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न केले पाहिजेत. संस्कृत भाषेचे सौंदर्य आणि थो...
स्वर्गीय बसवंतराव मुंडकर: एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व -NNL

स्वर्गीय बसवंतराव मुंडकर: एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व -NNL

नांदेड, लेख
नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील स्वर्गीय बसवंतराव परमेश्वरराव मुंडकर हे प्रभावी व्यक्तिमत्व. बसवंतराव मुंडकर यांचे जीवन हे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि स्वातंत्र्याच्या लढ्यातील योगदानामुळे प्रेरणादायी ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी कार्य... बसवंतराव मुंडकर यांचे प्रमुख कार्य शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांनी कृषी सुधारणा, सहकार सोसायटीच्या माध्यमातून, कर्जाच्या सोयी, आणि योग्य दरांसाठी शेतकऱ्यांना संघटित केले. त्यांच्या नेतृत्वात बिलोली तालुक्यात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विविध चळवळी सुरू झाल्या, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आधार मिळाला. युवा वर्गासाठी प्रेरणा.. बसवंतराव मुंडकर यांचे कार्य तत्कालीन युवांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांनी आपल्या समवयस्क मित्रांना आणि किशोर व युवकांना सामा...
Movement Warrior: Baswantrao Mundkar : चळवळी योद्धा: बसवंतराव मुंडकर -NNL

Movement Warrior: Baswantrao Mundkar : चळवळी योद्धा: बसवंतराव मुंडकर -NNL

नांदेड, लेख
स्वातंत्र्य संग्रामाच्या विविध चळवळींमध्ये योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य योद्ध्यांची स्मृती आजही आपल्या मनामध्ये अजरामर आहे. अशा एका महान योद्ध्याचे नाव म्हणजे स्वर्गीय बसवंतराव मुंडकर. त्यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आला, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील होट्टल या ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध मान्यवर वक्त्यांनी गोवा मुक्ती संग्रामातील आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या सहभागाचे सविस्तर विश्लेषण केले. स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांच्या कार्यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या चळवळींनी आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांनी आपल्या आयुष्यात अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये आप...
I don’t know what the school : शाळा कसली असती हे माहीत नाही..लेखक…. राजीव तिडके -NNL

I don’t know what the school : शाळा कसली असती हे माहीत नाही..लेखक…. राजीव तिडके -NNL

नांदेड, लेख
शाळा कसली असती हे माहीत नाही....पेन वहीच्या तर आई वडिलांनाही कधी संबंध आला नाही... शिकलेल्या माणसाजवळ बसायचीही हिंमत (लायकी) नाही. असं स्वतःला समजणारी माणसे नंदीवाले समाजाची तेलगू भाषिक आहेत. आणि महादेवावर श्रध्दा ठेवणारी आहेत... परंतु इतर समाजाची लोक कधी रागावतील या भितीपोटी ती महादेवाच्या मंदिरातही कधी दिसली नाहीत. तर मग शाळेत तरी कसे दिसतील... चोरी चपाटी, गुंडगिरी अशा गोष्टींपासून कोसो दूर राहणाऱ्या वस्तीतील दोन बायका रस्त्यात पाणी पिऊन रिकाम्या बिसलेरी बाॅटल वेचत असताना त्यांची ही मुलगी दुर्गंधीयुक्त नालीजवळ गडबडा लोळत असतांना पाहिलो आणि थबकलो.. शाळेत जाते का? आम्हाला कशाची शाळा असते...? शाळेत आली तर ही पोलिस होऊ शकते. पण आम्हाला कोण शिकवणार शाळा? मी आहे की... कुठे रहाता? बालाजी मंदिराजवळ .... अजून कुणी लेकरं हाईत का शाळेत न जाणारी? हाईत की ८-९ तुमची शाळा कुठं हाय? त्या जु...
error: Content is protected !!